शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

पितृपंधरवड्यात मेथी, ढेमस खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

नागपूर : गेल्या तीन आठवड्यांपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले असून ...

नागपूर : गेल्या तीन आठवड्यांपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले असून गृहिणींचा स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे. रविवारी होलसेल बाजारात मेथीचे भाव १०० रुपयांवर तर किरकोळमध्ये १३० ते १४० रुपये किलो भाव होते. तसेच ढेमस होलसेलच्या ४० रुपयांच्या तुलनेत किरकोळमध्ये ६० रुपये भाव होते. याशिवाय पालक आणि अन्य भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. रविवारी किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलोचे वांगे ६० रुपयांवर तर कोथिंबीरचे भाव १०० रुपयांवर पोहाेचले होते. पितृपंधरवड्यात सर्वच भाज्या भाव खात आहेत. गृहिणी भाज्या खरेदीकडे कानाडोळा करून स्वयंपाकघरात कडधान्याचा उपयोग करीत आहेत.

बाजारात पत्ता कोबी ४० तर फूल कोबीचे भाव ६० रुपयांवर पोहोचले आहेत. पावसामुळे शेतातच भाज्या खराब झाल्या आहेत. भाज्यांची तोडणी करणे शक्य नसल्याने पालेभाज्या शेतातच खराब होत आहेत. वांगी तोडणी थांबली आहे. वांगी स्थानिक शेतकऱ्यांकडून कमी तर नाशिक येथून मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. बाजारात वांगी स्थानिक शेतकऱ्यांकडूनच विक्रीसाठी येतात. पण पावसामुळे शेतकऱ्यांवर बंधन आले आहे. किरकोळमध्ये सर्व भाज्या प्रति किलो ४० रुपयांवर पोहोचल्या आहेत. होलसेल बाजारातही भाज्यांचे भाव वाढल्याची माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट (कॉटन मार्केट) असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.

भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)

भाजीपालाबाजारातील दर घराजवळ

वांगी४०-५० ६०

कोथिंबीर७०-८० १००

हिरवी मिरची २५ ४०

टोमॅटो१२-१५ ३०

कारले३०-४० ६०

चवळी शेंग २५-३० ४०

गवार शेंग ४० ६०

पत्ता कोबी २० ४०

फूल कोबी ४० ६०

कोहळ २५ ४०

लवकी १५ ३०

पालक३०-४० ६०

मेथी १०० १४०

सिमला मिरची २५-३० ४०

तोंडले २५ ४०

दोडके ४० ६०

बीन्स ८० १००

काकडी१५-२० ३०

मुळा २० ३०

गाजर२५-३० ४०

बटाटे१२-१५ ३०

पुरवठा कमी; मागणी वाढली

गेल्या काही दिवसांपासून होलसेल बाजारात भाज्यांचा पुरवठा कमी असून तुलनेत किरकोळमध्ये मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव अचानक वाढले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणांमध्येही भाज्यांचे भाव जास्तच होते. नवीन भाज्यांची आवक ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होणार असून तोपर्यंत गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील.