शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

पितृपंधरवड्यात मेथी, ढेमस खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

नागपूर : गेल्या तीन आठवड्यांपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले असून ...

नागपूर : गेल्या तीन आठवड्यांपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले असून गृहिणींचा स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे. रविवारी होलसेल बाजारात मेथीचे भाव १०० रुपयांवर तर किरकोळमध्ये १३० ते १४० रुपये किलो भाव होते. तसेच ढेमस होलसेलच्या ४० रुपयांच्या तुलनेत किरकोळमध्ये ६० रुपये भाव होते. याशिवाय पालक आणि अन्य भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. रविवारी किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलोचे वांगे ६० रुपयांवर तर कोथिंबीरचे भाव १०० रुपयांवर पोहाेचले होते. पितृपंधरवड्यात सर्वच भाज्या भाव खात आहेत. गृहिणी भाज्या खरेदीकडे कानाडोळा करून स्वयंपाकघरात कडधान्याचा उपयोग करीत आहेत.

बाजारात पत्ता कोबी ४० तर फूल कोबीचे भाव ६० रुपयांवर पोहोचले आहेत. पावसामुळे शेतातच भाज्या खराब झाल्या आहेत. भाज्यांची तोडणी करणे शक्य नसल्याने पालेभाज्या शेतातच खराब होत आहेत. वांगी तोडणी थांबली आहे. वांगी स्थानिक शेतकऱ्यांकडून कमी तर नाशिक येथून मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. बाजारात वांगी स्थानिक शेतकऱ्यांकडूनच विक्रीसाठी येतात. पण पावसामुळे शेतकऱ्यांवर बंधन आले आहे. किरकोळमध्ये सर्व भाज्या प्रति किलो ४० रुपयांवर पोहोचल्या आहेत. होलसेल बाजारातही भाज्यांचे भाव वाढल्याची माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट (कॉटन मार्केट) असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.

भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)

भाजीपालाबाजारातील दर घराजवळ

वांगी४०-५० ६०

कोथिंबीर७०-८० १००

हिरवी मिरची २५ ४०

टोमॅटो१२-१५ ३०

कारले३०-४० ६०

चवळी शेंग २५-३० ४०

गवार शेंग ४० ६०

पत्ता कोबी २० ४०

फूल कोबी ४० ६०

कोहळ २५ ४०

लवकी १५ ३०

पालक३०-४० ६०

मेथी १०० १४०

सिमला मिरची २५-३० ४०

तोंडले २५ ४०

दोडके ४० ६०

बीन्स ८० १००

काकडी१५-२० ३०

मुळा २० ३०

गाजर२५-३० ४०

बटाटे१२-१५ ३०

पुरवठा कमी; मागणी वाढली

गेल्या काही दिवसांपासून होलसेल बाजारात भाज्यांचा पुरवठा कमी असून तुलनेत किरकोळमध्ये मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव अचानक वाढले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणांमध्येही भाज्यांचे भाव जास्तच होते. नवीन भाज्यांची आवक ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होणार असून तोपर्यंत गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील.