शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

बॉम्बस्फोटानंतर केला जावयाला फोन अन् ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:08 IST

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवून १८९ जणांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी कमाल अहमद ...

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवून १८९ जणांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी कमाल अहमद अंसारीने नंतर आपल्या जावयाला फोन करून ही माहिती कळविली. तोच धागा पकडून एटीएसने त्याच्या मुसक्या आवळल्या अन् त्याला फाशी यार्डमध्ये पोहचवले. येथे सहा वर्षांपासून सरकारी भत्त्यावर जगणाऱ्या कमालवर कोरोनाने घाव घातला अन् सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

गेल्या नऊ दिवसांपासून मेडिकलमध्ये कोरोनाचा उपचार घेत असलेला दहशतवादी कमाल अंसारी (५०) याचा सोमवारी पहाटे १ च्या सुमारास मृत्यू झाल्याने अंगावर शहारे आणणाऱ्या मुंबई स्फोट मालिकेच्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेला आल्या. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी ११ जुलै २००६ ला मुंबईच नव्हे, तर देश हादरवला होता. सायंकाळच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये अवघ्या ११ मिनिटांत सात बॉम्बस्फोट घडवून त्यांनी १८९ जणांचे बळी घेतले, तर ८२४ प्रवाशांना जीवघेण्या जखमा दिल्या होत्या. या स्फोटाचा तपास त्यावेळी मुंबई पोलिसांच्या मदतीने दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सुरू केला. तपासासाठी सात पथके नेमली. रॉ तसेच सीबीआयचीही मदत घेण्यात आली होती. तपास पथकांनी सुमारे ४०० जण ताब्यात घेतले. एका प्रेशर कूकर विक्रेत्याने आरोपींचा धागा दिला. त्यानंतर १८ ते २० जुलैला बिहारचा रहिवासी कमाल अहमद अंसारी याच्या तपास पथकाने मुसक्या आवळल्या. साखळी स्फोटाच्या थराराची कथा कमालने त्याचा जावई मुमताज चाैधरीला फोन करून ऐकवली होती. हे टेलिफोनवरील संभाषण हाती लागल्यानेच कमालच्या मुसक्या आवळल्या अन् नंतर एका पाठोपाठ १३ जणांना अटक करण्यात आली. त्यात इंडियन मुजाहिदीनचे काही दहशतवादीही होते.

जिहादच्या नावाने ब्रेन वॉश केल्यानंतर मूळचा बिहारचा रहिवासी असलेला कमाल अहमद अंसारी सैतानच बनला होता. त्यानेच आपल्या साथीदारांच्या माध्यमातून मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवल्याचे तपास पथकाला सांगितले होते. पुढे मोक्का न्यायालयाने २०१५ मध्ये १३ आरोपींपैकी कमाल अंसारीसह पाच जणांना फाशी, तर सात जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.

----

२०१५ पासून नागपुरात

फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने कमाल अंसारी याला २०१५ मध्येच मुंबईतून नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हलविवण्यात आले होते. तेव्हापासून तो येथेच होता. त्याला कधी फासावर टांगले जाईल, याबाबत कुणाकडेच माहिती नव्हती. मात्र, कोरोनाने त्याला ९ एप्रिलला विळखा घातला अन् अवघ्या नऊ दिवसांत त्याच्याभोवतीचा पाश घट्ट करीत सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

----