शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट करूनही लोक ऐकत नाही, त्यामुळे अशा घटना घडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये दरड कोसळून अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुंबईतील चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये दरड कोसळून अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत सगळीकडूनच हळहळ व्यक्त होत असताना राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र याचे खापर नागरिकांवरच फोडले. वारंवर अलर्ट करूनदेखील लोक ऐकत नाहीत. त्यामुळे अशा घटना घडतात, असे वक्तव्य त्यांनी रविवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान केले.

मुंबईत लोकांची संख्या वाढत असून डोंगरावरदेखील लोक घरे, झोपड्या बांधत आहेत. पावसामुळे धोका होऊ शकतो याचा इशारा वारंवार देण्यात आला होता. मात्र लोकांनी ऐकले नाही. काल पहाटेपासून मुंबईत ३४५ मिमी पावसाची नोंद झाली. इतक्या पावसात अशा घटना होणे हीदेखील सामान्य बाब असल्याचेदेखील वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत घोषित केली आहे. तातडीची मदत म्हणून १० हजारांची मदत आणि पंचनामे केल्यानंतर घराच्या डागडुजीसाठीही मदत करण्यात येणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.