शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

खुल्या जागेवर कचरा टाकल्यास दंड

By admin | Updated: October 21, 2015 03:38 IST

महापालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवर कचरा टाकणे, जमा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर आहे.

स्मार्ट सिटी : उपविधी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणारनागपूर : महापालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवर कचरा टाकणे, जमा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर आहे. यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ही बाब विचारात घेता यावर नियंत्रण घालण्यासाठी महापालिका उपविधी तयार करण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाणार असल्याने खुल्या जागेवर कचरा टाकण्याऱ्यांना दंड बसणार आहे. शहरातील कचरा दररोज उचलला जातो. परंतु अनेक लोकांना खुल्या जागेवर कचरा टाकण्याची सवय आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू असताना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा टाकण्यावर नियंत्रण घालण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेने उपविधी तयार केले आहे. सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शासन मंजुरीनंतर खुल्या जागेवर कचरा टाकण्यांना शास्ती लागणार आहे.२० जानेवारी २०१५ च्या सर्वसाधरण सभेत या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती. हा उपविधी प्रकाशित करून यावर नागरिकांकडून आक्षेप वा सूचना मागविण्यात आल्या होत्या. परंतु यावर नागरिकांकडून आक्षेप वा सूचना न आल्याने हा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.उपविधीतील तरतुदीनुसार सार्वजनिक वा खासगी खुल्या जागेवर कोणत्याही स्वरूपाचा कचरा, धूळ, राख वा विटाचे तुकडे टाकल्यास महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार संबंधिताना महापालिके च्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावता येईल. संबंधितावर पोलिसात तक्रार दाखल करता येईल. यात कारखान्यातील दूषित पाणी, सांडपाणी वा गोठ्यातील दूषित पाणी याचा समावेश आहे. कायद्यानुसार परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची राहणार असल्याने शहर स्वच्छ राहण्याला मदत होणार आहे. (प्रतिनिधी)