शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

विनाकारण त्रास द्याल तर दंड

By admin | Updated: April 26, 2017 01:40 IST

स्वत:ला वीज ग्राहकांचे प्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्या काही जणांनी अर्जदार वीज ग्राहकाला हाताशी धरून

 ग्राहक मंचचा दणका : कथित वीज ग्राहक प्रतिनिधींना चपराक नागपूर : स्वत:ला वीज ग्राहकांचे प्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्या काही जणांनी अर्जदार वीज ग्राहकाला हाताशी धरून यापुढे महावितरण विरोधात खोटी तक्रार दाखल केल्यास कंपनी किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हेतूपुरस्पर त्रास दिल्याबद्दल तक्रारदार वीज ग्राहक व त्याच्या प्रतिनिधीला नुकसान भरपाईपोटी दंड ठोठावण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल महावितरणच्या नागपूर येथील ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांना फुस लावून तसेच त्यांना आमिष दाखवून महावितरण विरोधात नुकसान भरपाईच्या खोट्या तक्रारी दाखल होत असल्याचे समोर आले आहे. महावितरण कंपनी आणि वीज कर्मचाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी दाखल करून वीज ग्राहकाला नुकसान भरपाई मिळावी म्हणून खोट्या तक्रारी दाखल करून त्यात पैसे कमाविण्याचा उद्योग काही कथित ग्राहक प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे. यासंदर्भात ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल झालेल्या एका प्रकरणावर नुकतीच सुनावणी झाली असून, त्यात महावितरणतर्फ़े करण्यात आलेल्या युक्तिवादात ग्राहक प्रतिनिधींनी सादर केलेले पुरावे हे खोटे असल्याचे आढळुन आले. यावेळी ग्राहकाने आपली महावितरण विरोधात कुठलीही तक्रार नसून आपण कुठलीही नुकसान भरपाई मागत नसल्याचे लिखित बयाण मंचापुढे दिले. यावर ग्राहक तक्रार निवारण मंचने निकालात नमूद केल्याप्रमाणे, ग्राहकाने कागदपत्रांची पूर्तता केली नाही तरीही नुकसान भरपाईसाठी ग्राहक प्रतिनिधीने अर्ज केला आहे, ग्राहक प्रतिनिधींच्या अशा सवयींमुळे महावितरणच्या अंतर्गत तक्रार निवारण मंचापुढे विनाकारण तक्रारींची संख्या वाढत आहे. अर्जदार आणि कथित ग्राहक प्रतिनिधींनी यापुढे खोटी तक्रार दाखल केल्यास तसेच कंपनी व कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याबद्दल ग्राहक व त्याच्या प्रतिनिधीना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई द्यावी लागेल. ग्राहक मंचच्या या निर्णयामुळे मध्यस्थ म्हणून वावरणाऱ्या दलालांना चांगलीच चपराक बसली आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणची पारदर्शी तक्रार निवारण यंत्रणा असून तेथे ग्राहकांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिल्या जाते. यासाठी कुठल्याही मध्यस्थांची गरज नसते. (प्रतिनिधी)