शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

आधी बिल भरा, नंतर ट्रान्सफार्मर दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वायगाव (ता. माैदा) शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा १८ दिवसापासून बंद आहे. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : वायगाव (ता. माैदा) शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा १८ दिवसापासून बंद आहे. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर दुरुस्तीची मागणी करताच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आधी विजेची बिले भरा, नंतर ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा सूचना केल्या आहेत. प्रशासनाच्या या आडमुठ्या धाेरणामुळे वायगाव शिवारातील धानाचे पऱ्हे व मिरचीचे पीक पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे.

वायगाव परिसरात धान व मिरचीचे पीक माेठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली असून, अनेकांचे पऱ्हे राेवणीयाेग्य झाले आहे. पावसाने दडी मारल्याने राेवणी थांबविण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या भागात कालव्याची साेय नसल्याने शेतकरी विहिरी व इलेक्ट्रिक माेटरपंपद्वारे ओलित करतात. त्यातच १८ दिवसापूर्वी या शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

ट्रान्सफार्मर दुरुस्त करा अथवा बदलवून देण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीचे अराेली (ता. माैदा) येथील कनिष्ठ अभियंता चाैरे यांना अनेकदा निवेदने दिली. त्यावर जाेपर्यंत कृषिपंपांच्या विजेची बिले भरली जाणार नाही, ताेपर्यंत ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना कनिष्ठ अभियंता चाैरे यांनी दिल्याची माहिती शेतकऱ्यांसह महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

पाण्याअभावी मिरचीचे पीक व पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर असून, यात आपले दुहेरी नुकसान हाेत आहे. शासनाने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना नवीन ट्रान्सफार्मर लावण्याचे आदेश द्यावे, अशी मागगणी वायगाव येथील नेहरू राखडे, राजू बागडे, अनिल हारोडे, समीर डहारे, हिरालाल राखडे, राहुल गायधने, मुन्ना देशमुख, धनराज देशमुख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली असून, तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.

...

अडचणीत ८० हजार रुपये आणायचे कुठून?

महावितरण कंपनीने सन २०१५ पासून आजवर कृषिपंपांची विजेची बिले दिली नव्हती. कंपनीने सहा वर्षाची बिले एकमुस्त दिली असून, बिलाची सरासरी रक्कम ६५ ते ९० हजार रुपये आहे. आधीच आर्थिक अडचणी असून, पेरणीचा काळ आहे. त्यामुळे या काळात बिले भरण्यासाठी एवढी माेठी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

...

शासन व प्रशासन यातील विराेधाभास

थकीत वीजबिलापाेटी राज्यातील काेणत्याही शेतकऱ्याच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी घाेषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे, महावितरण कंपनी विजेचे नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे अथवा बदलविण्यास नकार देत शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. या अधिकाऱ्यांना सरकारचे अप्रत्यक्ष समर्थन असून, सत्ताधारी व विराेधी पक्षाचे नेते शेतकऱ्यांचा हा तमाशा बघणे पसंत करीत आहेत, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.