शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

आधी बिल भरा, नंतर ट्रान्सफार्मर दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वायगाव (ता. माैदा) शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा १८ दिवसापासून बंद आहे. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : वायगाव (ता. माैदा) शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा १८ दिवसापासून बंद आहे. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर दुरुस्तीची मागणी करताच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आधी विजेची बिले भरा, नंतर ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा सूचना केल्या आहेत. प्रशासनाच्या या आडमुठ्या धाेरणामुळे वायगाव शिवारातील धानाचे पऱ्हे व मिरचीचे पीक पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे.

वायगाव परिसरात धान व मिरचीचे पीक माेठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली असून, अनेकांचे पऱ्हे राेवणीयाेग्य झाले आहे. पावसाने दडी मारल्याने राेवणी थांबविण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या भागात कालव्याची साेय नसल्याने शेतकरी विहिरी व इलेक्ट्रिक माेटरपंपद्वारे ओलित करतात. त्यातच १८ दिवसापूर्वी या शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

ट्रान्सफार्मर दुरुस्त करा अथवा बदलवून देण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीचे अराेली (ता. माैदा) येथील कनिष्ठ अभियंता चाैरे यांना अनेकदा निवेदने दिली. त्यावर जाेपर्यंत कृषिपंपांच्या विजेची बिले भरली जाणार नाही, ताेपर्यंत ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना कनिष्ठ अभियंता चाैरे यांनी दिल्याची माहिती शेतकऱ्यांसह महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

पाण्याअभावी मिरचीचे पीक व पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर असून, यात आपले दुहेरी नुकसान हाेत आहे. शासनाने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना नवीन ट्रान्सफार्मर लावण्याचे आदेश द्यावे, अशी मागगणी वायगाव येथील नेहरू राखडे, राजू बागडे, अनिल हारोडे, समीर डहारे, हिरालाल राखडे, राहुल गायधने, मुन्ना देशमुख, धनराज देशमुख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली असून, तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.

...

अडचणीत ८० हजार रुपये आणायचे कुठून?

महावितरण कंपनीने सन २०१५ पासून आजवर कृषिपंपांची विजेची बिले दिली नव्हती. कंपनीने सहा वर्षाची बिले एकमुस्त दिली असून, बिलाची सरासरी रक्कम ६५ ते ९० हजार रुपये आहे. आधीच आर्थिक अडचणी असून, पेरणीचा काळ आहे. त्यामुळे या काळात बिले भरण्यासाठी एवढी माेठी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

...

शासन व प्रशासन यातील विराेधाभास

थकीत वीजबिलापाेटी राज्यातील काेणत्याही शेतकऱ्याच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी घाेषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे, महावितरण कंपनी विजेचे नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे अथवा बदलविण्यास नकार देत शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. या अधिकाऱ्यांना सरकारचे अप्रत्यक्ष समर्थन असून, सत्ताधारी व विराेधी पक्षाचे नेते शेतकऱ्यांचा हा तमाशा बघणे पसंत करीत आहेत, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.