शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

आधी बिल भरा, नंतर ट्रान्सफार्मर दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वायगाव (ता. माैदा) शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा १८ दिवसापासून बंद आहे. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : वायगाव (ता. माैदा) शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठा १८ दिवसापासून बंद आहे. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर दुरुस्तीची मागणी करताच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आधी विजेची बिले भरा, नंतर ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा सूचना केल्या आहेत. प्रशासनाच्या या आडमुठ्या धाेरणामुळे वायगाव शिवारातील धानाचे पऱ्हे व मिरचीचे पीक पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे.

वायगाव परिसरात धान व मिरचीचे पीक माेठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली असून, अनेकांचे पऱ्हे राेवणीयाेग्य झाले आहे. पावसाने दडी मारल्याने राेवणी थांबविण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या भागात कालव्याची साेय नसल्याने शेतकरी विहिरी व इलेक्ट्रिक माेटरपंपद्वारे ओलित करतात. त्यातच १८ दिवसापूर्वी या शिवारातील ट्रान्सफार्मर जळाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

ट्रान्सफार्मर दुरुस्त करा अथवा बदलवून देण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीचे अराेली (ता. माैदा) येथील कनिष्ठ अभियंता चाैरे यांना अनेकदा निवेदने दिली. त्यावर जाेपर्यंत कृषिपंपांच्या विजेची बिले भरली जाणार नाही, ताेपर्यंत ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना कनिष्ठ अभियंता चाैरे यांनी दिल्याची माहिती शेतकऱ्यांसह महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

पाण्याअभावी मिरचीचे पीक व पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर असून, यात आपले दुहेरी नुकसान हाेत आहे. शासनाने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना नवीन ट्रान्सफार्मर लावण्याचे आदेश द्यावे, अशी मागगणी वायगाव येथील नेहरू राखडे, राजू बागडे, अनिल हारोडे, समीर डहारे, हिरालाल राखडे, राहुल गायधने, मुन्ना देशमुख, धनराज देशमुख यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली असून, तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.

...

अडचणीत ८० हजार रुपये आणायचे कुठून?

महावितरण कंपनीने सन २०१५ पासून आजवर कृषिपंपांची विजेची बिले दिली नव्हती. कंपनीने सहा वर्षाची बिले एकमुस्त दिली असून, बिलाची सरासरी रक्कम ६५ ते ९० हजार रुपये आहे. आधीच आर्थिक अडचणी असून, पेरणीचा काळ आहे. त्यामुळे या काळात बिले भरण्यासाठी एवढी माेठी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

...

शासन व प्रशासन यातील विराेधाभास

थकीत वीजबिलापाेटी राज्यातील काेणत्याही शेतकऱ्याच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी घाेषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे, महावितरण कंपनी विजेचे नादुरुस्त ट्रान्सफार्मर दुरुस्त करणे अथवा बदलविण्यास नकार देत शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. या अधिकाऱ्यांना सरकारचे अप्रत्यक्ष समर्थन असून, सत्ताधारी व विराेधी पक्षाचे नेते शेतकऱ्यांचा हा तमाशा बघणे पसंत करीत आहेत, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.