शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

एसी कोचमधील प्रवाशांचा गोंधळ

By admin | Updated: June 2, 2014 02:20 IST

गर्मीच्या दिवसात प्रवास सुखद होण्यासाठी प्रवासी एसी कोचची मागणी करतात.

नागपूर : गर्मीच्या दिवसात प्रवास सुखद होण्यासाठी प्रवासी एसी कोचची मागणी करतात. प्रवाशांना पैसे देऊनही एसीचा गारवा मिळत नसेल तर त्यांचा संताप सहाजिकच वाढणार. अशीच घटना नागपूर रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या अहिल्यानगरी एक्स्प्रेसमध्ये घडली. या गाडीतील एसी नादुरुस्त झाल्याने, गर्मीमुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी गोंधळ घालणे सुरू केले. शेवटी रेल्वे प्रशासनाने या गाडीला नवीन एसी कोच लावून, प्रवाशांचे समाधान केले आणि जेवढा वेळ एसी बंद होता, त्यावेळात प्रवाशांना झालेल्या मनस्तापाची नुकसानभरपाई दिली.

तिरुवनंतपुरमहून इंदोरला निघालेल्या अहिल्यानगरी एक्स्प्रेसच्या एसी कोच ए-१ (क्रमांक - 0४0६४) मध्ये ४२ प्रवासी प्रवास करीत होते. यात ठोंबरे कुटुंबीयांचे १७ सदस्य होते. जे कोलम येथून लग्नकार्य आटोपून इंदोरला जात होते. कोलमपासूनच ‘एसी’ काम करीत नव्हता. रेल्वेच्या टीसीला तक्रार करीत, त्यांनी कशीबशी रात्र काढली. मात्र सकाळी ७ वाजता विजयवाडा स्टेशनहून गाडी निघाल्यानंतर एसी पूर्णत: बंद झाला. जसजसा सूर्य वर येत होता, तसतशी गर्मी वाढत होती. गाडीतील लहान मुले गर्मीमुळे बेचैन झाली होती. प्रवाशांना गाडीतील एसी मॅकेनिककडून पुढच्या स्टेशनवर एसी सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. दुपारी ३ वाजता बल्लारशा स्टेशन आले तरीही काहीच झाले नाही. प्रवाशांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी गाडीत गोंधळ घालणे सुरू केले. शेवटी ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.१५ वाजता पोहचली. प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक लक्षात घेऊन, रेल्वे प्रशासनाने ताबडतोब गाडीला नवीन एसी कोच लावला. प्रवाशांचे समाधान झाल्यानंतर ६.३५ ला गाडीला पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले. एसी बंद असल्यामुळे या ४२ प्रवाशांना झालेल्या मनस्तापाची नुकसानभरपाई म्हणून प्रवाशांना रिफंड सर्टिफिकेट देण्यात आले. (प्रतिनिधी)