शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

पॅसेंजर सुरू होईना, स्पेशल गाडीही थांबेना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:12 IST

सौरभ ढोरे काटोल : कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षापासून रेल्वेने पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग ...

सौरभ ढोरे

काटोल : कोरोना संसर्गामुळे गत दीड वर्षापासून रेल्वेने पॅसेंजर आणि लोकल गाड्या बंद केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने शासनाने सर्वच निर्बंध शिथिल केले आहेत. रेल्वे विभागाने विशेष व काही एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. पण पॅसेंजर आणि लोकल गाड्या अजूनही सुरू केल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा भुर्दंड बसतो आहे. एक्स्प्रेस गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देत गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र त्यांना पूर्वीप्रमाणे थांबे दिले नाहीत. दुसरीकडे पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासाठी अद्याप कुठलीही पावले रेल्वे व राज्य सरकारने उचललेली नाहीत. त्यामुळे पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू केल्याने कोरोना वाढतो का, असा सवाल वर्षानुवर्षे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी करीत आहेत.

काटोल,नरखेड व कळमेश्वर तिन्ही स्थानकावरून मोठ्या प्रमाणात स्थानिक नोकरदार, विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी पॅसेंजर गाडी प्रवासासाठी उपयुक्त माध्यम आहे. मात्र पॅसेंजर कधी सुरु होणार हे अद्यापही स्पष्ट नसल्याने इतर साधनांचा प्रवासासाठी उपयोग करावा लागत असल्याने स्थानिक प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे.

बंद असलेल्या पॅसेंजर व थांबा असलेल्या गाड्या

मागील दीड वर्षापासून नागपूर- इटारसी पॅसेंजर,इटारसी-नागपूर पॅसेंजर बंद आहे. आता दक्षिण एक्स्प्रेस कळमेश्वर,काटोल व नरखेडला थांबत नाही. याचा फटका या स्टेशनवरून नागपूरला जाणाऱ्या तसेच नागपूरवरून या इकडे येणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे.

सर्वच एक्स्प्रेस गाड्या रुळावर परंतु थांबा नाही

रेल्वे विभागाने काही एक्स्प्रेस गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा दिल्यामुळे या गाड्यांचा थांबा तालुकास्तरावर नाही. यामुळे तिकिटाचे दर दुप्पट झाले आहेत. मागील महिन्यापासून सर्वच एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वच एक्स्प्रेस गाड्या रुळावर आल्याचे चित्र आहे.

--

गत दीड वर्षापासून पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्या बंद असल्याने नागपूर ते काटोल हा प्रवास बसने करावा लागत आहे. दक्षिण एक्स्प्रेसने जरी अपडाऊन केले तरी जास्तीत जास्त ५०० रुपये खर्च होत असे. या गाड्या सुद्धा थांबत नसल्याने वेळ आणि पैशाचा सुध्दा भुर्दंड बसतोय आहे. त्यामुळे रेल्वेने विशेष गाड्यांप्रमाणेच आता एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची गरज आहे.

- कार्तिक गावंडे, प्रवासी

---

रेल्वे विभागाने कोरोनाच्या नावावर विशेष गाड्यांची संख्या वाढविली. मात्र, पॅसेंजर आणि लोकल गाड्या सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे या गाड्या सुरू केल्यानेच कोरोना होतोय काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

- कपिल राऊत, प्रवासी

230821\1857-img-20210823-wa0152.jpg

काटोल रेल्वे स्थानक फोटो