शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

मयताच्या आई-वडिलांना आठ लाख रुपये भरपाई द्या; रेल्वे अपघाताचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:22 IST

रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असा आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असा आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.रमेश व लता साळुंके असे वडील व आईचे नाव असून, ते जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मयत मुलाचे नाव गणेश होते. ३१ मार्च २०१४ रोजी तो रेल्वेने जळगाव येथून चाळीसगावला जात होता. त्याच्याकडे या प्रवासाचे वैध तिकीट होते. गर्दी असल्यामुळे तो रेल्वे डब्याच्या दारात उभा होता. दरम्यान, सहप्रवाशाचा धक्का लागल्यामुळे तो धावत्या रेल्वेतून खाली पडून मरण पावला.त्यानंतर आई-वडिलांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने तो अर्ज फेटाळून लावला. पंचनाम्यामध्ये गणेशकडे वैध रेल्वे तिकीट आढळून आले नाही. त्याचा अपघात घरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर झाला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असू शकते. करिता, अर्जदारांना भरपाई दिली जाऊ शकत नाही, असे मुद्दे रेल्वेने उपस्थित केले होते.न्यायाधिकरणच्या निर्णयाविरुद्ध आई-वडिलांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता न्यायाधिकरणचा निर्णय रद्द करून वरील आदेश दिला. अपघातानंतर मयताजवळचे रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते. तसेच, घराजवळ अपघात होणे हे भरपाई नाकारण्याचे कारण ठरू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेऊन सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय