शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

मयताच्या आई-वडिलांना आठ लाख रुपये भरपाई द्या; रेल्वे अपघाताचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:22 IST

रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असा आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असा आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.रमेश व लता साळुंके असे वडील व आईचे नाव असून, ते जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मयत मुलाचे नाव गणेश होते. ३१ मार्च २०१४ रोजी तो रेल्वेने जळगाव येथून चाळीसगावला जात होता. त्याच्याकडे या प्रवासाचे वैध तिकीट होते. गर्दी असल्यामुळे तो रेल्वे डब्याच्या दारात उभा होता. दरम्यान, सहप्रवाशाचा धक्का लागल्यामुळे तो धावत्या रेल्वेतून खाली पडून मरण पावला.त्यानंतर आई-वडिलांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने तो अर्ज फेटाळून लावला. पंचनाम्यामध्ये गणेशकडे वैध रेल्वे तिकीट आढळून आले नाही. त्याचा अपघात घरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर झाला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असू शकते. करिता, अर्जदारांना भरपाई दिली जाऊ शकत नाही, असे मुद्दे रेल्वेने उपस्थित केले होते.न्यायाधिकरणच्या निर्णयाविरुद्ध आई-वडिलांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता न्यायाधिकरणचा निर्णय रद्द करून वरील आदेश दिला. अपघातानंतर मयताजवळचे रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते. तसेच, घराजवळ अपघात होणे हे भरपाई नाकारण्याचे कारण ठरू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेऊन सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय