शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मयताच्या आई-वडिलांना आठ लाख रुपये भरपाई द्या; रेल्वे अपघाताचे प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 22:22 IST

रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असा आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या आई-वडिलांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, असा आदेश मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्य रेल्वेला दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.रमेश व लता साळुंके असे वडील व आईचे नाव असून, ते जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मयत मुलाचे नाव गणेश होते. ३१ मार्च २०१४ रोजी तो रेल्वेने जळगाव येथून चाळीसगावला जात होता. त्याच्याकडे या प्रवासाचे वैध तिकीट होते. गर्दी असल्यामुळे तो रेल्वे डब्याच्या दारात उभा होता. दरम्यान, सहप्रवाशाचा धक्का लागल्यामुळे तो धावत्या रेल्वेतून खाली पडून मरण पावला.त्यानंतर आई-वडिलांनी भरपाईसाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. न्यायाधिकरणने तो अर्ज फेटाळून लावला. पंचनाम्यामध्ये गणेशकडे वैध रेल्वे तिकीट आढळून आले नाही. त्याचा अपघात घरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर झाला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असू शकते. करिता, अर्जदारांना भरपाई दिली जाऊ शकत नाही, असे मुद्दे रेल्वेने उपस्थित केले होते.न्यायाधिकरणच्या निर्णयाविरुद्ध आई-वडिलांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता न्यायाधिकरणचा निर्णय रद्द करून वरील आदेश दिला. अपघातानंतर मयताजवळचे रेल्वे तिकीट हरवले जाऊ शकते. तसेच, घराजवळ अपघात होणे हे भरपाई नाकारण्याचे कारण ठरू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेऊन सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय