शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पालकांनो आधी संस्कारित व्हा !

By admin | Updated: November 17, 2014 00:59 IST

काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील,

संजय रघटाटे : ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ उपक्रमनागपूर : काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील, तर मुले कशी संस्कारित होणार. त्यामुळे आधी पालकांनी संस्कारित व्हावे तेव्हाच मुले सहज संस्कारित होतील, असे मत प्रसिद्ध वक्ते, आॅक्सफर्ड अ‍ॅकेडमीचे संचालक डॉ. संजय रघटाटे यांनी व्यक्त केले. बालकदिनानिमित्त लोकमत सखी मंच व लोकमत कॅम्पस क्लबतर्फे ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते. सीताबर्डी येथील माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सृजन संस्थेच्या संचालिका आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुपमा गडकरी व बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा उपस्थित होते. यावेळी डॉ. रघटाटे यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शनाबरोबरच, पालकांना पोटभरून हसविले. ते म्हणाले की, आपण जे करतो, तेच मुले करतात. त्यासाठी पालकांनीच स्वत: चेहऱ्यावर हास्य ठेवावे, दुसऱ्याचा आदर करा, चांगले श्रोते बना, कण्हत कण्हत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगा. दृष्टी बदला, सृष्टी नक्कीच बदलेल. आजच्या काळातील मुलांच्या मानसिकतेसंदर्भात बोलताना डॉ. अनुपमा गडकरी म्हणाल्या की, आज पालकांना मुलांच्या बाबतीत चार चॅलेंजेस भेडसावतात. काळानुसार मुलांच्या बुद्धिमत्तेत प्रचंड वाढ झाली आहे.मुलांना रागही लवकर येतो. टेक्नॉलॉजीचा परिणाम मोठा आहे. मुलांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. सामाजिक बदलाच्या स्थित्यंतरामध्ये पालक व बालक एकाच प्लॅटफॉर्मवर आले आहेत. बालकांकडे आज बऱ्यापैकी माहिती आहे. यात काही वाईट आणि चांगलीही माहिती आहे. त्यामुळे पालकांनी भीती न बाळगता त्यांच्या बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग करून घ्यावा, सामाजिक बदल झाला असला तरी, आईवडिलांप्रती त्यांना आजही जिव्हाळा आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. परिस्थितीनुसार मुलांपुढेही अनेक चॅलेंजेस उभे ठाकले आहेत. त्याला तोंड देण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज आहे. मुलांना राग लवकर येतो, ते लवकर निराश होतात, त्यामुळे आजचे पालक काळजीत आहेत. जन्मत: प्रत्येक मुलाला १४ भावना असतात. वयानुसार त्याची जाणीव होते. पूर्वी १६ वर्षापर्यंत भावनांची मुलांना जाणीव व्हायची आता ६ व्या वर्षीच भावना जागृत होतात. मुलांमध्ये झालेले बदल पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजीमुळे मुलांना नव्यानव्या गोष्टी दिसत आहेत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणामही आहे. टेक्नॉलॉजी नेमकी मुलांना काय शिकवित आहे, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी पालकांनी बालकांशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा यांनी मुलांमध्ये वाढत असलेल्या दमा या आजारावर मार्गदर्शन करून उपाय सांगितले कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)