शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

पालकांनो आधी संस्कारित व्हा !

By admin | Updated: November 17, 2014 00:59 IST

काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील,

संजय रघटाटे : ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ उपक्रमनागपूर : काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील, तर मुले कशी संस्कारित होणार. त्यामुळे आधी पालकांनी संस्कारित व्हावे तेव्हाच मुले सहज संस्कारित होतील, असे मत प्रसिद्ध वक्ते, आॅक्सफर्ड अ‍ॅकेडमीचे संचालक डॉ. संजय रघटाटे यांनी व्यक्त केले. बालकदिनानिमित्त लोकमत सखी मंच व लोकमत कॅम्पस क्लबतर्फे ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते. सीताबर्डी येथील माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सृजन संस्थेच्या संचालिका आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुपमा गडकरी व बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा उपस्थित होते. यावेळी डॉ. रघटाटे यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शनाबरोबरच, पालकांना पोटभरून हसविले. ते म्हणाले की, आपण जे करतो, तेच मुले करतात. त्यासाठी पालकांनीच स्वत: चेहऱ्यावर हास्य ठेवावे, दुसऱ्याचा आदर करा, चांगले श्रोते बना, कण्हत कण्हत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगा. दृष्टी बदला, सृष्टी नक्कीच बदलेल. आजच्या काळातील मुलांच्या मानसिकतेसंदर्भात बोलताना डॉ. अनुपमा गडकरी म्हणाल्या की, आज पालकांना मुलांच्या बाबतीत चार चॅलेंजेस भेडसावतात. काळानुसार मुलांच्या बुद्धिमत्तेत प्रचंड वाढ झाली आहे.मुलांना रागही लवकर येतो. टेक्नॉलॉजीचा परिणाम मोठा आहे. मुलांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. सामाजिक बदलाच्या स्थित्यंतरामध्ये पालक व बालक एकाच प्लॅटफॉर्मवर आले आहेत. बालकांकडे आज बऱ्यापैकी माहिती आहे. यात काही वाईट आणि चांगलीही माहिती आहे. त्यामुळे पालकांनी भीती न बाळगता त्यांच्या बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग करून घ्यावा, सामाजिक बदल झाला असला तरी, आईवडिलांप्रती त्यांना आजही जिव्हाळा आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. परिस्थितीनुसार मुलांपुढेही अनेक चॅलेंजेस उभे ठाकले आहेत. त्याला तोंड देण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज आहे. मुलांना राग लवकर येतो, ते लवकर निराश होतात, त्यामुळे आजचे पालक काळजीत आहेत. जन्मत: प्रत्येक मुलाला १४ भावना असतात. वयानुसार त्याची जाणीव होते. पूर्वी १६ वर्षापर्यंत भावनांची मुलांना जाणीव व्हायची आता ६ व्या वर्षीच भावना जागृत होतात. मुलांमध्ये झालेले बदल पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजीमुळे मुलांना नव्यानव्या गोष्टी दिसत आहेत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणामही आहे. टेक्नॉलॉजी नेमकी मुलांना काय शिकवित आहे, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी पालकांनी बालकांशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा यांनी मुलांमध्ये वाढत असलेल्या दमा या आजारावर मार्गदर्शन करून उपाय सांगितले कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)