शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

परमबिर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्यानेच हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेच नव्हे तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांचीही भूमिका संशयास्पद आहे. त्या संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, त्यामुळेच मी हायकोर्टात धाव घेतली आहे, असे वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे केले.

१०० कोटींच्या वसुलीचे टारगेट दिल्याचा आरोप करून सिंग यांनी देशमुखच नव्हे तर राज्य सरकारलाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उठलेल्या राजकीय वादळामुळे देशमुखांना गृहमंत्रिपद सोडावे लागले आणि आता त्यांची सीबीआय चौकशीही सुरू आहे. १० दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने या प्रकरणाच्या संबंधाने देशमुख यांच्या नागपुरातील घरी छापा मारून त्यांची १३ तास चौकशीही केली. यानंतर देशमुख प्रथमच परमबिर सिंग यांच्यावर खुलेपणाने बोलले. आज सायंकाळी विमानतळावर पत्रकारांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले, वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर परमबिर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे नवनवीन आरोप आता समोर येत आहेत.

सचिन वाझे आणि परमबिर सिंग यांच्या चुका गंभीर आणि माफ करण्यालायक नव्हत्या. त्यामुळे मी गृहमंत्री असताना त्यांची मुंबई आयुक्त पदावरून बदली केली होती. एका कार्यक्रमात यासंदर्भात मी जाहीर वक्तव्यसुद्धा केले होते. त्यामुळे दुखावलेल्या सिंग यांनी द्वेषभावनेतून माझ्यावर खोटे आरोप केले. ३० वर्षांच्या राजकीय जीवनात माझ्यावर एकही आरोप नाही. परमबिर सिंग यांच्या खोट्या आरोपावरून माझ्यावर सीबीआयने जो गुन्हा दाखल केला आहे, त्यावर न्याय मागण्यासाठी मी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे, असेही देशमुख म्हणाले.