शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

पद्मसंभव यांनी धम्मातून समाजाला उन्नत केले

By admin | Updated: January 21, 2015 00:31 IST

आचार्य पद्मसंभव हे धम्म तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित होते. धम्माचे ज्ञान म्हणजे अमृत शिक्षण असल्याचीच त्यांची भावना होती. त्यांनी मृत्यूचे चिंतन केले होते आणि जीवनाचाही अभ्यास केला.

यशोसागर : बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमालानागपूर : आचार्य पद्मसंभव हे धम्म तत्त्वज्ञानाचे प्रकांड पंडित होते. धम्माचे ज्ञान म्हणजे अमृत शिक्षण असल्याचीच त्यांची भावना होती. त्यांनी मृत्यूचे चिंतन केले होते आणि जीवनाचाही अभ्यास केला. हे जीवन इतरांच्या उपयोगासाठी आणि स्वत:ला उन्नत करण्यासाठी आहे, हा साक्षात्कार त्यांना साधनेतून झाला. त्यामुळेच आपले जीवन असेपर्यंत चांगले आणि सकारात्मक कार्य करीत रहावे, असा संदेश त्यांनी केला. त्यांनी संपूर्ण देशाला धम्माच्या माध्यमातून उन्नत केले आणि धम्माचा प्रसार केला, असे मत पुणे येथील यशोसागर यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमी येथे आयोजित बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमालेत ते आचार्य पद्मसंभव विषयावर बोलत होते. आचार्य पद्मसंभव यांनी स्मशानात साधना केली. मृत्यूच्यावेळी पैसा, मित्र, नातेवाईक कुणीही कामात येत नाही तर फक्त धम्मच कामाला येतो. स्मशान हा आपल्या जीवनाचाच एक भाग आहे कारण जन्म झाला तेथे मृत्यू आहेच. त्यांनी जे ज्ञान मिळविले ते समाजाच्या कामात यावे म्हणून आचार्यांनी स्वत:ला झोकून दिले. पण लोकांसाठी काम करताना विविध भाषा आणि वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान असले पाहिजे. या ध्यासातून त्यांनी नालंदा येथे विविध विषयांचे ज्ञान मिळविले. कारण सर्वांनाच तत्त्वज्ञान कळणारे नव्हते. काम करताना त्यांना लोकांचे शारीरिक, मानसिक दु:ख दिसले. त्यावर मात करण्यासाठी आचार्यांनी वैद्यकशास्त्राचाही अभ्यास केला. संस्कृतसह अनेक भाषांमध्ये ते पारंगत झाले. भारताचे परिक्रमण करताना त्यांनी हिमालय गाठला. देश फिरताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रसार केला आणि धम्माची स्थापना केली. ब्राह्मण पंडितांकडून त्यांना नेहमीच आव्हाने मिळत होती. एकदा त्यांनी ५०० ब्राह्मण पंडितांचे आव्हान स्वीकारले आणि बौद्धिक चर्चेत त्यांचा पराभव केला. त्यानंतर ब्राह्मण पंडितांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि पंडितांचे आचार्य म्हणून त्यांचे नान शाक्यसिंहापासून आचार्य पद्मसंभव झाले. पूर्वी संपूर्ण काश्मीर बौद्धमय होता. हिमाचलात काम करताना त्यांना तिबेटचे आमंत्रण आले आणि त्यांनी तिबेटमध्ये बॉन धर्म जो कर्मकांडात अडकला होता त्यातून तिबेटची सुटका करून तेथे धम्म स्थापन केला. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धम्मचारिणी विजया आणि मैत्रीसागर उपस्थित होते.