शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनमुळे रखडले समृद्धी महामार्गाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

कमल शर्मा नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याची नवीन डेडलाईन ठरविण्यासाठी विभाग विचारविमर्श करीत आहे. ...

कमल शर्मा

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याची नवीन डेडलाईन ठरविण्यासाठी विभाग विचारविमर्श करीत आहे. या महामार्गाचे काम मे महिन्यात पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला होता. कोरोनाच्या संक्रमणामुळे वेळेत काम पूर्ण होणे शक्य झाले नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वेल्डिंगचे काम थांबले होते. त्यामुळे आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये काम पूर्ण करण्याचा दावा केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी या प्रकल्पाचा आढावा घेतला. नागपूर ते मुंबईपर्यंत हा महामार्ग बनत आहे. या प्रकल्पाचे नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या टप्प्याचे काम थांबले आहे. बैठकीत या प्रकल्पावर काम करीत असलेले महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन (एमएसआरडीसी)चे अधिकारी हे काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन ठरवू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या समीक्षा बैठकीचा हवाला देताना अधिकाऱ्यांनी याबाबत चुप्पी साधली; पण उच्चस्तरीय सूत्रांचा दावा आहे की, ऑक्टोबरमध्ये समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे; पण हे सर्व कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीवर निर्भर आहे.

कोरोनामुळे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. विशेष म्हणजे वेल्डिंगचे काम थांबलेले आहे. कोरोना संक्रमणामुळे ऑक्सिजन केवळ रुग्णालयांसाठीच आरक्षित करण्याचा निर्णय झाला होता. फेब्रिकेशन, वेल्डिंगच्या कामासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. मार्च ते मे महिन्यांदरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. आता सर्व काही ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर निर्भर आहे.

मे २०२१ ला सुरू होणार होता महामार्ग

समृद्धी महामार्गावर वाहतूक कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे. राज्य सरकारने दावा केला होता की, या प्रकल्पाचा पहिला टप्पा (नागपूर ते शिर्डी) १ मे २०२१ ला सुरू होईल; परंतु कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते इगतपुरी दरम्यान १०३ किलोमीटरचा मार्ग डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. इगतपुरी ते वडपे दरम्यानचा रस्ता १ मार्च २०२२ पर्यंत सुरू होण्याचा दावा केला जातोय. आता एमएसआरडीसीचे म्हणणे आहे की सर्वच डेडलाईन बदलाव्या लागणार आहेत.