शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आमच्या नशिबी फक्त उपेक्षाच! मिरची कटाई करणाऱ्या महिलांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:02 IST

जागतिक महिला दिनी सर्वत्र महिलांचा गौरव होत असला तरी ‘आमच्या नशिबी फक्त उपेक्षाच’ असल्याची व्यथा मिरची कटाई केंद्रावरील महिलांनी मांडली.

ठळक मुद्देरोजगार मिळाला मात्र वेदनांचे काय?कटाई केंद्रावरच झोपतात चिमुकले शालेय विद्यार्थिनी, नवविवाहित महिला, गर्भवती महिला आणि म्हाताऱ्या आजीबाईदेखील या कटाई केंद्रावर काम करतात. अनेक महिला मजूर आपल्या चार-पाच महिन्याच्या बाळाला घेऊन कामाला येतात. केंद्राच्या झोपडीला पाळणा बांधून तेथेच चिमुकल्या

शरद मिरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळी उठल्यापासून मिरची कटाईची लगबग सुरू होते. उन्हाचा पारा अन् घामाच्या धारा त्यातही मिरचीच्या सहवासात राहिल्याने अंगाची लाहीलाही. हिवाळा असो वा पावसाळा हा नित्यक्रम ठरलेलाच. डोळ्यांची आग, पाठीला वाक आणि बसण्याचा त्रास सोसत या महिलांना रोजगार मिळाला खरा, परंतु त्यांच्या वेदनांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सततच्या मिरचीच्या सहवासामुळे कटाई मजुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जागतिक महिला दिनी सर्वत्र महिलांचा गौरव होत असला तरी ‘आमच्या नशिबी फक्त उपेक्षाच’ असल्याची व्यथा मिरची कटाई केंद्रावरील महिलांनी मांडली.गेल्या ४० वर्षांपासून भिवापुरातील मिरची कटाई केंद्र रोजगाराचे केंद्र ठरले आहे. मिरचीच्या सातऱ्यावर कटाईचे काम वर्षभर सुरू असते. येथे मजुरांना वयाचे बंधन नाही. त्यामुळे लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सारेच मिरची कटाईच्या कामाला जुंपतात. यात महिला, मुली व म्हाताऱ्या आजीबाईची संख्या लक्षणीय आहे.रोजगार मिळाला, त्यासोबत वेदनादेखील. सतत मिरचीच्या ढिगावर काम करताना मजुरांना प्रचंड वेदना होतात. संपूर्ण शरीराची, डोळ्याची आग पेटते. तिखटाची खेस यामुळे खोकला व सर्दीने हे मजूर भांबावले असतात. सलग १२ तास एकाच जागेवर बसून काम करताना मजुरांना पाठीचा त्रास, सांधेदुखीचे प्रमाण वाढले आहे. मात्र रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने शेकडो हात आपल्या कुटुंबाचा गाढा पुढे रेटावा म्हणून राबत आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न, आरोग्याच्या समस्या या सर्वांचा निपटारा करीत हे मजूर मिरची कटाईवर मिळणाऱ्या अल्पमजुरीत आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

आरोग्य समस्या वाढल्यासकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मजूर मिरचीच्या मुख्या काढतात. काही महिला मजूर ओली मिरची हाताने पसरविण्याच्या कामी असतात. सतत मिरचीच्या सहवासामुळे मजुरांना आरोग्याच्या समस्या वाढल्या आहे. शरीराला खाज सुटणे, आग होणे, डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, अंधुकपणा, सर्दी, खोकला, पाठीचा कणा, सांधेदुखी, शरीरावर चट्टे पडणे तसेच महिलांमध्ये हिमोग्लोबीन कमी होऊन अ‍ॅनेमियासारख्या आजार वाढत असल्याचे वैद्यकीय अभ्यासात उघड झाले आहे.

‘ते’ फिरकतही नाहीत...मिरची कटाई केंद्रावरील महिलांना भेडसावणाऱ्यां आरोग्य समस्या नवीन नाहीत. सत्ता बदलली, नेतेही बदलले मात्र समस्या सुटल्या नाही. तालुक्यात सद्यस्थितीत ६ ते ७ मिरची कटाई केंद्र आहे. एका केंद्रावर किमान ४०० च्या जवळपास मजूर असतात. निवडणुका आल्या की, प्रत्येक उमेदवार या केंद्रांना हमखास भेटी देतो. महिला मजुरांच्या आरोग्यविषयक समस्येची आस्थेने विचारपूस करतात. अनेक प्रलोभने देतात. त्यानंतर मात्र ‘ते’ इकडे फिरकतदेखील नाही, अशी व्यथा महिलांनी मांडली. किमान महिलादिनी या मिरची कटाई केंद्रावर एखादा लोकप्रतिनिधी येईल आणि उपेक्षेच जीणं जगणाऱ्यां या महिला मजुरांच्या कार्याचा गौरव करेल, ही आशाही फोल ठरत आहे.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस