शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

नागपुरातील ‘१६० खोल्यांचे गाळे’ वसाहत रिकामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:49 IST

हिवाळी अधिवेशन आले की सिव्हिल लाईन्स येथील ‘१६० खोल्यांचे गाळे रिकामे करणे येथील निवासीयांना भाग पडते आणि यावेळीही तसे आदेश गाळेधारकांकडे येऊन धडकले आहेत. मात्र यावेळी कोरोना महामारीने परिस्थिती भयावह असताना गाळेधारकांसमोर संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनाची तयारी १५० कुटुंबांची होरपळ कोरोना संकटकाळी जाणार कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ‘१६० खोल्यांचे गाळे’ या वसाहतीत निवासी असलेल्या कुटुंबीयांची दरवर्षी होणारी फरफट यावषीर्ही कायम आहे. हिवाळी अधिवेशन आले की गाळे रिकामे करणे येथील निवासीयांना भाग पडते आणि यावेळीही तसे आदेश गाळेधारकांकडे येऊन धडकले आहेत. मात्र यावेळी कोरोना महामारीने परिस्थिती भयावह असताना गाळेधारकांसमोर संकट उभे ठाकले आहे.

बाहेर खोल्या भाड्याने मिळत नसल्याने कुठे जायचे की रस्त्यावर राहायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. संभ्रम कायम असताना अखेर ७ डिसेंबरपासून नागपूरला राज्य मंत्रिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार, अशी घोषणा सध्यातरी करण्यात आली आहे. या परिस्थितीत प्रशासनाने तयारीच्या कामाला सुरुवात केली आहे. याअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने इतरांच्या ताब्यात असलेले आमदार निवास, नागभवन, रविभवन रिकामे करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार १६० खोल्यांचे गाळे रिकामे करण्याची तयारी चालली असून येथील निवासीयांना ३० सप्टेंबरपर्यंत गाळे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तशी करारानुसार ही दरवषीर्ची प्रक्रिया आहे. हिवाळी अधिवेशन आले की येथील कुटुंबांना त्यांचे बस्तान इतरत्र हलवावेच लागते. येथील नागरिक हा दोन महिन्यांचा काळ इतर ठिकाणी भाड्याने खोली घेऊन काढतात. मात्र यावर्षीची परिस्थिती नेहमीसारखी नाही.

कोरोना संकटामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. अशावेळी जायचे कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सध्या या वसाहतीमध्ये १४० च्या जवळपास कुटुंब निवासाला आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत खाली करण्याची नोटीस मिळताच बहुतेकांनी भाड्याने खोली शोधण्यासाठी धाव घेतली. मात्र कोरोना संकटात कुणी खोली द्यायला तयार नसल्याचे नागरिकांनी सांगितले. महामारीत वृद्ध आईवडिलांना, लहान मुलांना घेऊन उघड्यावर राहायचे काय, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनाही पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. मात्र सरकारी आदेशाचे पालन करणारे प्रशासनही हतबल असल्याने कुटुंबीय निराश झाले आहेत. त्यामुळे लोकमतकडे त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.प्रशासनाने करून द्यावी व्यवस्थायेथे राहणारी काही कुटुंबे १५-२० वर्षापासून येथे राहतात. दरवर्षी ते विनातक्रार खोली सोडतात. मात्र यावेळी उद््भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे संकटाचा सामना करावा लागत आहे. तीन वर्षापूर्वी बांधकाम विभागाकडून व्यवस्था करून दिली जायची, मात्र पुढे ती सोय बंद केली. यावर्षीची परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाने येथील कुटुंबीयांची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार