शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ‘१६० खोल्यांचे गाळे’ वसाहत रिकामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:49 IST

हिवाळी अधिवेशन आले की सिव्हिल लाईन्स येथील ‘१६० खोल्यांचे गाळे रिकामे करणे येथील निवासीयांना भाग पडते आणि यावेळीही तसे आदेश गाळेधारकांकडे येऊन धडकले आहेत. मात्र यावेळी कोरोना महामारीने परिस्थिती भयावह असताना गाळेधारकांसमोर संकट उभे ठाकले आहे.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनाची तयारी १५० कुटुंबांची होरपळ कोरोना संकटकाळी जाणार कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ‘१६० खोल्यांचे गाळे’ या वसाहतीत निवासी असलेल्या कुटुंबीयांची दरवर्षी होणारी फरफट यावषीर्ही कायम आहे. हिवाळी अधिवेशन आले की गाळे रिकामे करणे येथील निवासीयांना भाग पडते आणि यावेळीही तसे आदेश गाळेधारकांकडे येऊन धडकले आहेत. मात्र यावेळी कोरोना महामारीने परिस्थिती भयावह असताना गाळेधारकांसमोर संकट उभे ठाकले आहे.

बाहेर खोल्या भाड्याने मिळत नसल्याने कुठे जायचे की रस्त्यावर राहायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. संभ्रम कायम असताना अखेर ७ डिसेंबरपासून नागपूरला राज्य मंत्रिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार, अशी घोषणा सध्यातरी करण्यात आली आहे. या परिस्थितीत प्रशासनाने तयारीच्या कामाला सुरुवात केली आहे. याअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने इतरांच्या ताब्यात असलेले आमदार निवास, नागभवन, रविभवन रिकामे करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार १६० खोल्यांचे गाळे रिकामे करण्याची तयारी चालली असून येथील निवासीयांना ३० सप्टेंबरपर्यंत गाळे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तशी करारानुसार ही दरवषीर्ची प्रक्रिया आहे. हिवाळी अधिवेशन आले की येथील कुटुंबांना त्यांचे बस्तान इतरत्र हलवावेच लागते. येथील नागरिक हा दोन महिन्यांचा काळ इतर ठिकाणी भाड्याने खोली घेऊन काढतात. मात्र यावर्षीची परिस्थिती नेहमीसारखी नाही.

कोरोना संकटामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. अशावेळी जायचे कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सध्या या वसाहतीमध्ये १४० च्या जवळपास कुटुंब निवासाला आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत खाली करण्याची नोटीस मिळताच बहुतेकांनी भाड्याने खोली शोधण्यासाठी धाव घेतली. मात्र कोरोना संकटात कुणी खोली द्यायला तयार नसल्याचे नागरिकांनी सांगितले. महामारीत वृद्ध आईवडिलांना, लहान मुलांना घेऊन उघड्यावर राहायचे काय, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनाही पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. मात्र सरकारी आदेशाचे पालन करणारे प्रशासनही हतबल असल्याने कुटुंबीय निराश झाले आहेत. त्यामुळे लोकमतकडे त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.प्रशासनाने करून द्यावी व्यवस्थायेथे राहणारी काही कुटुंबे १५-२० वर्षापासून येथे राहतात. दरवर्षी ते विनातक्रार खोली सोडतात. मात्र यावेळी उद््भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे संकटाचा सामना करावा लागत आहे. तीन वर्षापूर्वी बांधकाम विभागाकडून व्यवस्था करून दिली जायची, मात्र पुढे ती सोय बंद केली. यावर्षीची परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाने येथील कुटुंबीयांची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार