शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

भाव काेसळल्याने संत्री उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : संत्र्याच्या अंबिया बहाराचा हंगाम संपत येत असला तरी अनेक शेतकऱ्यांनी बागेतील संत्री ताेडून बाजारात आणली ...

लाेकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : संत्र्याच्या अंबिया बहाराचा हंगाम संपत येत असला तरी अनेक शेतकऱ्यांनी बागेतील संत्री ताेडून बाजारात आणली नाहीत. बाजारात संत्र्याचे भाव काेसळल्याने संत्री बाजारात विकायला आणणे शक्य नसल्याचे तसेच व्यापारी खरेदी करायला तयार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काहींनी झाडे जगवण्यासाठी बागेतील संत्री ताेडून ती उकिरड्यावर फेकायला सुरुवात केली आहे. कळमेश्वर तालुक्यातील काही राेडच्या बाजूला संत्र्याचे ढीग पडले असल्याचे दिसून येते.

तालुक्यात १५,६०० हेक्टरमध्ये संत्र्याच्या बागा आहेत. माेहपा, मांडवी, काेहळी, म्हसेपठार, पिपळा (किनखेडे), खुमारी, झुणकी, सिंधी, पारडी (देशमुख), डाेरली, सेलू, केतापार, लाेणारा या भागात संत्रा बागांचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी परतीचा पाऊस विदर्भात रेंगाळल्याने शेतकऱ्यांना संत्री ताेडून बाजारात आणायला किमान एक महिना उशीर झाला. याच काळात केंद्र शासनाने ‘किसान रेल २०२०’ ही याेजना अमलात आणली. या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील संत्री बांगलादेशात रेल्वेद्वारे निर्यात करण्यात आली. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही.

बाजारात आवक वाढल्याने तसेच प्रक्रिया उद्याेगाचा अभाव असल्याने संत्र्याचे भाव काेसळले. व्यापारी संत्री खरेदी करायला तयार नाही. काही व्यापारी कवडीमाेल भावाने संत्री विकत घेत असल्याची माहिती संत्रा उत्पादकांनी दिली. बाग जगवण्यासाठी झाडांवरील संत्री ताेडावी लागत आहेत. ती खरेदी करायला कुणी नसल्याने नाईलाजास्तव राेडलगत किंवा उकिरड्यावर फेकावी लागत आहेत, असेही काहींनी सांगितले. या गंभीर प्रकाराबाबत लाेकप्रतिनिधी व प्रशासन काहीही बाेलायला किंवा उपाययाेजना करायला तयार नाही, असेही संत्रा उत्पादकांनी सांगितले.

----

७ ते ८ हजार रुपये टन भाव

संत्र्याचा उत्पादनखर्च प्रति टन ११ ते १२ हजार रुपये आहे. सध्या बाजारात संत्र्याला ७ ते ८ हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. त्यामुळे संत्र्याचा उत्पादनखर्च भरून निघत नसल्याने संत्रा उत्पादक संकटात सापडले आहेत. संत्रा बागा जगवण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी शेतकरी माेठ्या प्रमाणात पीककर्ज घेतात. संत्र्याचे भाव काेसळल्याने तसेच साेयाबीन व कपाशी ही पिके हातची गेल्याने पीक कर्जाचा भरणा करायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.