शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भाव काेसळल्याने संत्री उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : संत्र्याच्या अंबिया बहाराचा हंगाम संपत येत असला तरी अनेक शेतकऱ्यांनी बागेतील संत्री ताेडून बाजारात आणली ...

लाेकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : संत्र्याच्या अंबिया बहाराचा हंगाम संपत येत असला तरी अनेक शेतकऱ्यांनी बागेतील संत्री ताेडून बाजारात आणली नाहीत. बाजारात संत्र्याचे भाव काेसळल्याने संत्री बाजारात विकायला आणणे शक्य नसल्याचे तसेच व्यापारी खरेदी करायला तयार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काहींनी झाडे जगवण्यासाठी बागेतील संत्री ताेडून ती उकिरड्यावर फेकायला सुरुवात केली आहे. कळमेश्वर तालुक्यातील काही राेडच्या बाजूला संत्र्याचे ढीग पडले असल्याचे दिसून येते.

तालुक्यात १५,६०० हेक्टरमध्ये संत्र्याच्या बागा आहेत. माेहपा, मांडवी, काेहळी, म्हसेपठार, पिपळा (किनखेडे), खुमारी, झुणकी, सिंधी, पारडी (देशमुख), डाेरली, सेलू, केतापार, लाेणारा या भागात संत्रा बागांचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी परतीचा पाऊस विदर्भात रेंगाळल्याने शेतकऱ्यांना संत्री ताेडून बाजारात आणायला किमान एक महिना उशीर झाला. याच काळात केंद्र शासनाने ‘किसान रेल २०२०’ ही याेजना अमलात आणली. या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील संत्री बांगलादेशात रेल्वेद्वारे निर्यात करण्यात आली. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही.

बाजारात आवक वाढल्याने तसेच प्रक्रिया उद्याेगाचा अभाव असल्याने संत्र्याचे भाव काेसळले. व्यापारी संत्री खरेदी करायला तयार नाही. काही व्यापारी कवडीमाेल भावाने संत्री विकत घेत असल्याची माहिती संत्रा उत्पादकांनी दिली. बाग जगवण्यासाठी झाडांवरील संत्री ताेडावी लागत आहेत. ती खरेदी करायला कुणी नसल्याने नाईलाजास्तव राेडलगत किंवा उकिरड्यावर फेकावी लागत आहेत, असेही काहींनी सांगितले. या गंभीर प्रकाराबाबत लाेकप्रतिनिधी व प्रशासन काहीही बाेलायला किंवा उपाययाेजना करायला तयार नाही, असेही संत्रा उत्पादकांनी सांगितले.

----

७ ते ८ हजार रुपये टन भाव

संत्र्याचा उत्पादनखर्च प्रति टन ११ ते १२ हजार रुपये आहे. सध्या बाजारात संत्र्याला ७ ते ८ हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. त्यामुळे संत्र्याचा उत्पादनखर्च भरून निघत नसल्याने संत्रा उत्पादक संकटात सापडले आहेत. संत्रा बागा जगवण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी शेतकरी माेठ्या प्रमाणात पीककर्ज घेतात. संत्र्याचे भाव काेसळल्याने तसेच साेयाबीन व कपाशी ही पिके हातची गेल्याने पीक कर्जाचा भरणा करायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.