शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

भाव काेसळल्याने संत्री उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : संत्र्याच्या अंबिया बहाराचा हंगाम संपत येत असला तरी अनेक शेतकऱ्यांनी बागेतील संत्री ताेडून बाजारात आणली ...

लाेकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : संत्र्याच्या अंबिया बहाराचा हंगाम संपत येत असला तरी अनेक शेतकऱ्यांनी बागेतील संत्री ताेडून बाजारात आणली नाहीत. बाजारात संत्र्याचे भाव काेसळल्याने संत्री बाजारात विकायला आणणे शक्य नसल्याचे तसेच व्यापारी खरेदी करायला तयार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे काहींनी झाडे जगवण्यासाठी बागेतील संत्री ताेडून ती उकिरड्यावर फेकायला सुरुवात केली आहे. कळमेश्वर तालुक्यातील काही राेडच्या बाजूला संत्र्याचे ढीग पडले असल्याचे दिसून येते.

तालुक्यात १५,६०० हेक्टरमध्ये संत्र्याच्या बागा आहेत. माेहपा, मांडवी, काेहळी, म्हसेपठार, पिपळा (किनखेडे), खुमारी, झुणकी, सिंधी, पारडी (देशमुख), डाेरली, सेलू, केतापार, लाेणारा या भागात संत्रा बागांचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी परतीचा पाऊस विदर्भात रेंगाळल्याने शेतकऱ्यांना संत्री ताेडून बाजारात आणायला किमान एक महिना उशीर झाला. याच काळात केंद्र शासनाने ‘किसान रेल २०२०’ ही याेजना अमलात आणली. या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील संत्री बांगलादेशात रेल्वेद्वारे निर्यात करण्यात आली. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही.

बाजारात आवक वाढल्याने तसेच प्रक्रिया उद्याेगाचा अभाव असल्याने संत्र्याचे भाव काेसळले. व्यापारी संत्री खरेदी करायला तयार नाही. काही व्यापारी कवडीमाेल भावाने संत्री विकत घेत असल्याची माहिती संत्रा उत्पादकांनी दिली. बाग जगवण्यासाठी झाडांवरील संत्री ताेडावी लागत आहेत. ती खरेदी करायला कुणी नसल्याने नाईलाजास्तव राेडलगत किंवा उकिरड्यावर फेकावी लागत आहेत, असेही काहींनी सांगितले. या गंभीर प्रकाराबाबत लाेकप्रतिनिधी व प्रशासन काहीही बाेलायला किंवा उपाययाेजना करायला तयार नाही, असेही संत्रा उत्पादकांनी सांगितले.

----

७ ते ८ हजार रुपये टन भाव

संत्र्याचा उत्पादनखर्च प्रति टन ११ ते १२ हजार रुपये आहे. सध्या बाजारात संत्र्याला ७ ते ८ हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. त्यामुळे संत्र्याचा उत्पादनखर्च भरून निघत नसल्याने संत्रा उत्पादक संकटात सापडले आहेत. संत्रा बागा जगवण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी शेतकरी माेठ्या प्रमाणात पीककर्ज घेतात. संत्र्याचे भाव काेसळल्याने तसेच साेयाबीन व कपाशी ही पिके हातची गेल्याने पीक कर्जाचा भरणा करायचा कसा, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.