शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

टंचाईमुक्तीसाठी पाणी अडविणे हाच उपाय

By admin | Updated: May 4, 2015 02:20 IST

विदर्भात भरपूर पाऊस पडतो, पण त्याचे संवर्धन होत नसल्याने दरवर्षी टंचाईला तोंड द्यावे लागते.

नागपूर : विदर्भात भरपूर पाऊस पडतो, पण त्याचे संवर्धन होत नसल्याने दरवर्षी टंचाईला तोंड द्यावे लागते. टंचाईपासून मुक्ती हवी असेल तर पावसाचे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.जलयुक्त शिवार योजनेची जिल्हास्तरीय कार्यशाळा रविवारी येथील देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद््घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आणि ग्राम विकास खात्याचे सचिव प्रभाकर देशमुख उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ८२ टक्के शेती कोरडवाहू आहे. राज्यातील सर्व धरणे बांधली तरी फक्त ४० टक्केच सिंचन क्षमता उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे आता पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे हाच पर्याय आहे. त्यासाठीच जलयुक्त शिवार ही योजना असून यातून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे नियोजन आहे. कुठलीही योजना फक्त सरकारच्या माध्यमातून यशस्वी होत नाही. त्यात जनसहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे जलयुक्त शिवाराचे रूपांतर लोकचळवळीत करा आणि नागपूर जिल्हा टंचाईमुक्त करा.यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक प्रभाकर देशमुख यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी मानले.कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुधाकर कोहळे, सुधीर पारवे, अनिल सोले, विकास कुंभारे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह कृषी, ग्राम विकास,जलसंधारण विभागाचे अधिकारी, सरपंच, नोडल अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांचा संकल्पचार वर्षात जिल्ह्यातील १८०० गावे टंचाईमुक्त करण्याचा आणि पुढील वर्षात जिल्ह्यात पाणी टंचाईसाठी आराखडा तयार न करण्याचा संकल्प यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी ६ पोकलॅण्ड आणि १३ टिप्पर खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.