शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

६२५ पैकी केवळ ४५ जणांना हवी ‘व्हीआरएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सेवानिवृत्ती घेतल्यानंतर वर्षभरात केवळ तीनच महिन्याचे वेतन देण्याची तरतूद एसटी महामंडळाने केली आहे. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सेवानिवृत्ती घेतल्यानंतर वर्षभरात केवळ तीनच महिन्याचे वेतन देण्याची तरतूद एसटी महामंडळाने केली आहे. यामुळे नागपूर विभागात एसटीच्या ‘व्हीआरएस’ योजनेला फारच कमी प्रतिसाद मिळत आहे. ६२५ पैकी केवळ ४५ जणांनी यासाठी अर्ज केला आहे.

एसटी महामंडळाने ५० वर्ष किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे. या योजनेनुसार ५० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर त्यांना वर्षभरात तीन महिन्याचे वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु ही तरतूद महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मंजूर नाही.

एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांचे म्हणणे आहे की, कर्मचाऱ्यांना एका वर्षात सहा महिन्याचे वेतन आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली पाहिजे. ही योजना लागू करण्याअगोदर एसटी महामंडळाने मान्यताप्राप्त संघटनांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी आणलेल्या या योजनेला कमी प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल ५८० कर्मचाऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.

सहा महिन्याचे वेतन द्यावे

५० वर्षांहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी वाढते. मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, घराचे हप्ते इत्यादींचे त्यांच्यावर ओझे असते. अशात सेवानिवृत्तीनंतर त्यांना वर्षात केवळ तीनच महिन्याचे वेतन देणे योग्य नाही. त्यांना सहा महिन्याचे वेतन आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची तरतूद हवी. तरच या योजनेला प्रतिसाद मिळू शकेल, असे मत एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी व्यक्त केले.