शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

सुरू असणारी दुकाने आता थेट सील करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात शटर वर-खाली करून आणि मागच्या दाराने दुकाने सुरू ठेवून व्यवसाय करणाऱ्या काही व्यापाऱ्यांची दुकाने आता ...

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात शटर वर-खाली करून आणि मागच्या दाराने दुकाने सुरू ठेवून व्यवसाय करणाऱ्या काही व्यापाऱ्यांची दुकाने आता थेट सील करावी, अशी मागणी आता खुद्द व्यापारी संघटनांकडून होऊ लागली आहे. सरकारला सहकार्य करण्याऐवजी काही व्यापारी दुकाने सुरू ठेवून संघटनेला काळिमा फासत असल्याचे मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

मस्कासाथ, इतवारी, गांधीबाग आणि सीताबर्डी, खामला, कमाल चौक आणि जरीपटका बाजारपेठांमध्ये अनेक व्यापारी अर्धवट दुकाने सुरू ठेवून व्यवसाय करीत आहेत. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळून सर्व प्रकारची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किराणा दुकाने, डेअरी, भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण अनेक व्यापारी आदेशाचे उल्लंघन करून ११ नंतरही दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून येत आहे. फळ विक्रेत्यांची दुकाने दिवसभर सुरू असतात. कमाल चौकात अनेक दुकानदार शटर बंद करून बाहेर माल काढून विक्री करीत आहेत. मानेवाडा रोडवर हीच स्थिती आहे. अशीच स्थिती इतवारी, मस्कासाथ आणि गांधीबाग भागात दिसून येत आहे. इतवारीतील बहुतांश किराणा दुकानदार मागच्या दाराने व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे या भागात नेहमीच गर्दी दिसून येत आहे. गल्लीबोळात कारवाई होत नसल्याने दुकानदारांचे फावत आहे. मालक दुकानासमोर बसून मालाची विक्री करीत आहेत. अशा दुकानदारांवर दंड न ठोठावता थेट दुकान सील करण्याची गरज असल्याचे मत व्यापारी संघटकांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

ब्रेक दर चेनअंतर्गत शासनाने व्यापारी आणि नागरिकांसाठी नियमावली घोषित केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दंड वसूल करण्याचे अधिकार पोलीस आणि मनपाला दिले आहेत. इतवारी भागात ठोक किराणा दुकानदार दरदिवशी दुकान उघडून किरकोळ विक्रेत्यांना माल पाठवीत आहेत. मनपाच्या एनडीएस पथकाने या भागातील अनेक दुकानदारांकडून दंड वसूल केला आहे, पण ते समजण्यापलीकडे आहे. गोळीबार चौकातील नागरिक म्हणाले, येथील गल्लीबोळात दुकाने सुरू आहेत. या दुकानदारांवर कुणीही कारवाई करीत नाही. पोलीस आणि मनपाचे पथक या भागात येत नाही. त्यामुळे कठोर कारवाई करून सुरू असलेली दुकाने सील करून लॉकडाऊन सुरू असेपर्यंत बंद ठेवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दुकाने सुरू ठेवणे अनुचित

लॉकडाऊनच्या काळात सरकारला सहकार्य करण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सर्व व्यापारी संघटनांना केले आहे. पण काही बेजबाबदार दुकानदार दुकाने सुरू ठेवून संघटनांना काळिमा फासत आहे. दुकाने बंद ठेवण्याची त्या त्या संघटनांची जबाबदारी आहे. त्यासाठी दुकानदारांना जागरूक करणे आवश्यक आहे.

अश्विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.