शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या १० लाख काॅलनी दरवर्षी हाेतात नष्ट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

निशांत वानखेडे नागपूर : पृथ्वीवर दिसणारी ही वनराई माणसाने वृक्षाराेपण केल्यामुळे झाली नाही तर परागीकरण करणाऱ्या लहानमाेठ्या किटकांमुळे निर्माण ...

निशांत वानखेडे

नागपूर : पृथ्वीवर दिसणारी ही वनराई माणसाने वृक्षाराेपण केल्यामुळे झाली नाही तर परागीकरण करणाऱ्या लहानमाेठ्या किटकांमुळे निर्माण झाली आहे. मात्र याच पाॅलिनेटर्सचे अस्तित्व मानवी हव्यासामुळे संकटात आले आहे. एका सर्वेक्षणानुसार परागीकरणातून असंख्य प्रजातीच्या झाडांचा प्रसार करण्यात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशांच्या १० लाख काॅलनी चुकीच्या पद्धतीने मध गाेळा केल्याने नष्ट हाेतात. चुकीची कृषी पद्धती, रासायनिक वापर अशा विविध गाेष्टींमुळे परागीकरणाच्या इतर घटकांच्या अस्तित्वावर माेठे संकट आल्याचे दिसून येत आहे.

मधमाशांसह इतर पाॅलिनेटर्स (परागीकरण कीटक) वर दहा वर्षापासून अभ्यास करणारे डाॅ. शिखीन काेल्हे यांनी लाेकमतच्या माध्यमातून या गंभीर संकटाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. देशात ७५ टक्के मध उत्पादन आग्या माेहाेळापासून तयार मिळते. जवळपास २२ हजार टन या माशांपासून काढले जाते. चुकीच्या पद्धतीने मध काढल्याने दरवर्षी १० लाख वसाहती नष्ट हाेतात. एका वसाहतीत ५० हजाराच्यावर माशा असतात, म्हणजे हाेणारे नुकसान लक्षात येते. त्यामुळे १० वर्षापूर्वी मुबलक प्रमाणात दिसणारे मधमाशांचे पाेळे आता दिसेनासे झाले आहेत. चीनमध्ये मधमाशांच्या कमतरतेमुळे येथील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरश: माणसे लावून परागीकरण करावे लागत असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डाॅ. काेल्हे यांच्या मते इतर कीटकांबाबतही हेच हाेत आहे. परागीकरणामध्ये मुंग्या, फुलपाखरे, माॅथ, विविध प्रजातीचे भुंगे (बीटल्स) या किटकांचे महत्त्व आहे. माकडेसुद्धा परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. फूड ॲन्ड ॲग्राे ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार जगातील १ लक्ष ८० हजार वृक्षांचे परागीकरण याच किटकांवर अवलंबून आहे. म्हणजे ७० ते ८० टक्के वृक्षांचा प्रसार या पाॅलिनेटर्समुळे हाेताे. यामध्ये ३५ ते ४० टक्के म्हणजे १२०० प्रजातीच्या कृषी पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील ८० टक्के पिकांच्या परागीकरणामध्ये मधमाशा आणि फुलपाखरांचे महत्त्वाचे कार्य आहे.

२५० दशलक्ष वर्षपासून भुंग्यांचे अस्तित्व

परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे विविध प्रकारचे भुंगे हे जवळपास २५० दशलक्ष वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्वात असल्याची माहिती डाॅ. काेल्हे यांनी दिली. हे भुंगे जवळपास २ लक्ष ४० हजार फुलझाडांच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

पाॅलिनेटर्स संकटाचे तीन कारणे

- अधिवास नष्ट हाेणे : नागरीकरण, रस्ते बांधकाम, औद्याेगिकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाले आहेत.

- चुकीची कृषी पद्धती : पर्यावरण संकटात येण्यासाठी आताचे १०० वर्षे कारणीभूत ठरल्याचे बाेलले जाते पण डाॅ. काेल्हे यांच्यामते पृथ्वीवर कृषीकरण सुरू झाल्यापासून हे संकट निर्माण झाले. मुळेही परागीकरणाचे घटक संकटात आले आहेत. पिकासाठी झाडे कापणे, एकाच प्रकारचे पीक अशा गाेष्ट कारणीभूत आहेत.

- अमर्याद रसायनांचा वापर : पिकांसाठी पेस्टीसाईड, खतांचा अमर्याद वापर कीटक नष्ट हाेण्याचे माेठे कारण आहे.

अमेरिकन सरकारने २०१५ पासून पाॅलिनेटर्सच्या संवर्धनासाठी कमिशनची स्थापना केली आहे. कृषी प्रधान भारतात हे हाेणे गरजेचे आहे. सरकारने जनसहभागातूनीहे कार्य करावे. शालेय स्तरापासून मधमाशा व इतर कीटकांच्या अभ्यासाचा समावेश व्हावा. व्यापक जनजागृतीची गरज आहे.

- डाॅ. शिखीन काेल्हे, मधमाशा व कीटक अभ्यासक