शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

मधमाशांच्या १० लाख काॅलनी दरवर्षी हाेतात नष्ट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

निशांत वानखेडे नागपूर : पृथ्वीवर दिसणारी ही वनराई माणसाने वृक्षाराेपण केल्यामुळे झाली नाही तर परागीकरण करणाऱ्या लहानमाेठ्या किटकांमुळे निर्माण ...

निशांत वानखेडे

नागपूर : पृथ्वीवर दिसणारी ही वनराई माणसाने वृक्षाराेपण केल्यामुळे झाली नाही तर परागीकरण करणाऱ्या लहानमाेठ्या किटकांमुळे निर्माण झाली आहे. मात्र याच पाॅलिनेटर्सचे अस्तित्व मानवी हव्यासामुळे संकटात आले आहे. एका सर्वेक्षणानुसार परागीकरणातून असंख्य प्रजातीच्या झाडांचा प्रसार करण्यात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशांच्या १० लाख काॅलनी चुकीच्या पद्धतीने मध गाेळा केल्याने नष्ट हाेतात. चुकीची कृषी पद्धती, रासायनिक वापर अशा विविध गाेष्टींमुळे परागीकरणाच्या इतर घटकांच्या अस्तित्वावर माेठे संकट आल्याचे दिसून येत आहे.

मधमाशांसह इतर पाॅलिनेटर्स (परागीकरण कीटक) वर दहा वर्षापासून अभ्यास करणारे डाॅ. शिखीन काेल्हे यांनी लाेकमतच्या माध्यमातून या गंभीर संकटाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. देशात ७५ टक्के मध उत्पादन आग्या माेहाेळापासून तयार मिळते. जवळपास २२ हजार टन या माशांपासून काढले जाते. चुकीच्या पद्धतीने मध काढल्याने दरवर्षी १० लाख वसाहती नष्ट हाेतात. एका वसाहतीत ५० हजाराच्यावर माशा असतात, म्हणजे हाेणारे नुकसान लक्षात येते. त्यामुळे १० वर्षापूर्वी मुबलक प्रमाणात दिसणारे मधमाशांचे पाेळे आता दिसेनासे झाले आहेत. चीनमध्ये मधमाशांच्या कमतरतेमुळे येथील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरश: माणसे लावून परागीकरण करावे लागत असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डाॅ. काेल्हे यांच्या मते इतर कीटकांबाबतही हेच हाेत आहे. परागीकरणामध्ये मुंग्या, फुलपाखरे, माॅथ, विविध प्रजातीचे भुंगे (बीटल्स) या किटकांचे महत्त्व आहे. माकडेसुद्धा परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. फूड ॲन्ड ॲग्राे ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार जगातील १ लक्ष ८० हजार वृक्षांचे परागीकरण याच किटकांवर अवलंबून आहे. म्हणजे ७० ते ८० टक्के वृक्षांचा प्रसार या पाॅलिनेटर्समुळे हाेताे. यामध्ये ३५ ते ४० टक्के म्हणजे १२०० प्रजातीच्या कृषी पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील ८० टक्के पिकांच्या परागीकरणामध्ये मधमाशा आणि फुलपाखरांचे महत्त्वाचे कार्य आहे.

२५० दशलक्ष वर्षपासून भुंग्यांचे अस्तित्व

परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे विविध प्रकारचे भुंगे हे जवळपास २५० दशलक्ष वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्वात असल्याची माहिती डाॅ. काेल्हे यांनी दिली. हे भुंगे जवळपास २ लक्ष ४० हजार फुलझाडांच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

पाॅलिनेटर्स संकटाचे तीन कारणे

- अधिवास नष्ट हाेणे : नागरीकरण, रस्ते बांधकाम, औद्याेगिकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाले आहेत.

- चुकीची कृषी पद्धती : पर्यावरण संकटात येण्यासाठी आताचे १०० वर्षे कारणीभूत ठरल्याचे बाेलले जाते पण डाॅ. काेल्हे यांच्यामते पृथ्वीवर कृषीकरण सुरू झाल्यापासून हे संकट निर्माण झाले. मुळेही परागीकरणाचे घटक संकटात आले आहेत. पिकासाठी झाडे कापणे, एकाच प्रकारचे पीक अशा गाेष्ट कारणीभूत आहेत.

- अमर्याद रसायनांचा वापर : पिकांसाठी पेस्टीसाईड, खतांचा अमर्याद वापर कीटक नष्ट हाेण्याचे माेठे कारण आहे.

अमेरिकन सरकारने २०१५ पासून पाॅलिनेटर्सच्या संवर्धनासाठी कमिशनची स्थापना केली आहे. कृषी प्रधान भारतात हे हाेणे गरजेचे आहे. सरकारने जनसहभागातूनीहे कार्य करावे. शालेय स्तरापासून मधमाशा व इतर कीटकांच्या अभ्यासाचा समावेश व्हावा. व्यापक जनजागृतीची गरज आहे.

- डाॅ. शिखीन काेल्हे, मधमाशा व कीटक अभ्यासक