शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

एक एकर उसाचा काेळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि खाली पडलेल्या ठिणगीमुळे कचऱ्याने पेट घेतला. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि खाली पडलेल्या ठिणगीमुळे कचऱ्याने पेट घेतला. या आगीत एका एकरातील कापणीयाेग्य उसाचा काेळसा झाला असून, किमान एक लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजापूर शिवारात मंगळवारी (दि. ४) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

भागवत ढोपरे, रा. सहजापूर, ता. नरखेड यांनी त्यांच्या शेतात उसाची लागवड केली असून, ऊस पक्व झाल्याने त्यांनी नुकतीच कापणीला सुरुवात केली हाेती. त्यातच शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा हवेमुळे एकमेकांना स्पर्श झाला आणि ठिणगी पडली. या ठिणगीमुळे शेतातील कचऱ्यासाेबतच उसाचा पाचाेळा आणि उसाने पेट घेतला. रखरखत्या वातावरणामुळे ही आग संपूर्ण शेतात पसरली आणि एका एकरातील उसाचे पीक जळून राख झाले. यात ५० टन ऊस जळाल्याने किमान एक लाख रुपयाचे नुकसान झाले, अशी माहिती भागवत ढाेपरे यांनी दिली.

माहिती मिळताच महावितरण कंपनीचे शाखा अभियंता हर्षल बाेंद्रे, पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, कृषी सहायक वैशाली खंडारे, सतीश रेवतकर, पोलीस कर्मचारी अरविंद जाधव, जोशी, तलाठी जंगले यांनी घटनास्थळाची पाहणी करीत पंचनामा केला. या घटनेची जबाबदारी स्वीकारून महावितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.