शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

जुना धान्यगंज झाले समस्यागंज

By admin | Updated: March 26, 2016 02:47 IST

शहरातील वॉर्ड क्रमांक-११ मधील जुना धान्यगंज बाजार हा फार जुना व प्रसिद्ध बाजार आहे.

नगर प्रशासनाचे दुर्लक्ष : बाजारामुळे मंदिरात जाण्याचा मार्ग बंद होतोबाबा टेकाडे सावनेरशहरातील वॉर्ड क्रमांक-११ मधील जुना धान्यगंज बाजार हा फार जुना व प्रसिद्ध बाजार आहे. या ठिकाणी भाजीपाला विक्रेते रोज दुकाने थाटतात. सकाळी या बाजारात ग्राहकांची चिक्कार गर्दी असते. वास्तवात, या बाजारामुळे परिसरातील नागरिकांना तसेच देवीच्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना त्रास होतो. बाजारात टाकण्यात येत असलेल्या टाकाऊ वस्तू व पदार्थांची वेळीच योग्य विल्हेवाट लावली जात नाही. या समस्या सोडविण्यात याव्या तसेच बाजारात मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नगर प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. परंतु, प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप नागरिकांनी केला. धान्यगंज बाजार हा शहरातील जुना बाजार आहे. पूर्वी या ठिकाणी धान्याचा बाजार भरायचा. त्यामुळे या बाजाराला धान्यगंज असे नाव रूढ झाले. कालांतराने या जागेवर धान्याऐवजी भाजीपाला व इतर वस्तूंचा बाजार भरायला सुरुवात झाली. या बाजारात देवीचे मंदिर असून, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या बाजारात भाजीपाल्यासह मासोळी, चिकन, मटनाची दुकानेही थाटली जातात. बाजार आटोपल्यानंतर टाकाऊ भाजीपाल्यासोबत मांसाचे तुकडे याच परिसरात फेकले जातात. काही दिवसांनी ते सडतात व त्याची दुर्गंधी सुटते. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय, पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता असते. हीच समस्या शहरातील ठोक भाजीबाजाराची आहे. या भाजीबाजारात तालुक्यातील तसेच शेजारच्या तालुक्यातील शेतकरी त्यांच्याकडील भाजीपाला नियमित विक्रीला आणतात. त्यामुळे या बाजारात रोज सकाळी, ट्रक, ट्रॅक्टर, मेटॅडोर यासह तीनचाकी मालवाहू वाहनांची वर्दळ असते. वाहनांची एकच गर्दी होत असल्याने तिथून पायी मार्ग काढणे अवघड होते. त्यातून वाहनचालकांची भांडणेही होतात. रोज होणारी किरकोळ भांडणे सामान्य होत चालली आहे. या दोन्ही बाजारस्थळांची नियमित साफसफाई केली जात नसल्याने तिथे गुरे, कुत्री व डुकरांचा वावर वाढला आहे. त्यातच नागरिक कुठेही आडोशाला लघुशंका व घाण करतात. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीसोबतच कुत्री व डुकरांचाही त्रास सहन करावा लागतो. या बाजारस्थळांपासून स्थानिक नगर परिषद प्रशासनाला उत्पन्न मिळत असले तरी, या जागेची साफसफाई करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बाजार स्थानांतरित करण्याचा प्रस्तावशहरातील जुना धान्यगंज तसेच ठोक भाजीपाला बाजारातील मटण, चिकन दुकानांमुळे समस्येत भर पडत आहे. त्यामुळे या दोन्ही बाजारांमधील सदर दुकाने कोलार नदीच्या तीरावर स्थानांतरित करण्याचा स्थानिक नगर प्रशासनाने निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १३ मे २०१५ रोजी पार पडलेल्या नगर परिषदेच्या आमसभेत सर्वसंमतीने ठराव पारित करण्यात आला. १० महिने लोटूनही या ठरावावर प्रशासनाने अद्याप अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे बाजार परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ‘कृउबास’ची तयारीशहरातील ठोक भाजीपाला बाजारामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा ठोक बाजार सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविण्याची तयारी बाजार समिती प्रशासनाने दर्शविली असून, याला बाजार समिती सभापती गुणवंत चौधरी व सचिव अरविंद दाते यांनी दुजोरा दिला आहे. परिणामी, बाजारात सुविधांची निर्मिती करण्याची तसेच समस्या सोडविण्याची तयारीही बाजार समिती प्रशासनाने दर्शविली. परंतु, शहरातील काही दलालांनी त्यांच्या स्वार्थापोटी या निर्णयाला विरोध दर्शविल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. ही समस्या सोडविण्यात प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.