शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

जुना धान्यगंज झाले समस्यागंज

By admin | Updated: March 26, 2016 02:47 IST

शहरातील वॉर्ड क्रमांक-११ मधील जुना धान्यगंज बाजार हा फार जुना व प्रसिद्ध बाजार आहे.

नगर प्रशासनाचे दुर्लक्ष : बाजारामुळे मंदिरात जाण्याचा मार्ग बंद होतोबाबा टेकाडे सावनेरशहरातील वॉर्ड क्रमांक-११ मधील जुना धान्यगंज बाजार हा फार जुना व प्रसिद्ध बाजार आहे. या ठिकाणी भाजीपाला विक्रेते रोज दुकाने थाटतात. सकाळी या बाजारात ग्राहकांची चिक्कार गर्दी असते. वास्तवात, या बाजारामुळे परिसरातील नागरिकांना तसेच देवीच्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना त्रास होतो. बाजारात टाकण्यात येत असलेल्या टाकाऊ वस्तू व पदार्थांची वेळीच योग्य विल्हेवाट लावली जात नाही. या समस्या सोडविण्यात याव्या तसेच बाजारात मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नगर प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. परंतु, प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप नागरिकांनी केला. धान्यगंज बाजार हा शहरातील जुना बाजार आहे. पूर्वी या ठिकाणी धान्याचा बाजार भरायचा. त्यामुळे या बाजाराला धान्यगंज असे नाव रूढ झाले. कालांतराने या जागेवर धान्याऐवजी भाजीपाला व इतर वस्तूंचा बाजार भरायला सुरुवात झाली. या बाजारात देवीचे मंदिर असून, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या बाजारात भाजीपाल्यासह मासोळी, चिकन, मटनाची दुकानेही थाटली जातात. बाजार आटोपल्यानंतर टाकाऊ भाजीपाल्यासोबत मांसाचे तुकडे याच परिसरात फेकले जातात. काही दिवसांनी ते सडतात व त्याची दुर्गंधी सुटते. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय, पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता असते. हीच समस्या शहरातील ठोक भाजीबाजाराची आहे. या भाजीबाजारात तालुक्यातील तसेच शेजारच्या तालुक्यातील शेतकरी त्यांच्याकडील भाजीपाला नियमित विक्रीला आणतात. त्यामुळे या बाजारात रोज सकाळी, ट्रक, ट्रॅक्टर, मेटॅडोर यासह तीनचाकी मालवाहू वाहनांची वर्दळ असते. वाहनांची एकच गर्दी होत असल्याने तिथून पायी मार्ग काढणे अवघड होते. त्यातून वाहनचालकांची भांडणेही होतात. रोज होणारी किरकोळ भांडणे सामान्य होत चालली आहे. या दोन्ही बाजारस्थळांची नियमित साफसफाई केली जात नसल्याने तिथे गुरे, कुत्री व डुकरांचा वावर वाढला आहे. त्यातच नागरिक कुठेही आडोशाला लघुशंका व घाण करतात. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीसोबतच कुत्री व डुकरांचाही त्रास सहन करावा लागतो. या बाजारस्थळांपासून स्थानिक नगर परिषद प्रशासनाला उत्पन्न मिळत असले तरी, या जागेची साफसफाई करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बाजार स्थानांतरित करण्याचा प्रस्तावशहरातील जुना धान्यगंज तसेच ठोक भाजीपाला बाजारातील मटण, चिकन दुकानांमुळे समस्येत भर पडत आहे. त्यामुळे या दोन्ही बाजारांमधील सदर दुकाने कोलार नदीच्या तीरावर स्थानांतरित करण्याचा स्थानिक नगर प्रशासनाने निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १३ मे २०१५ रोजी पार पडलेल्या नगर परिषदेच्या आमसभेत सर्वसंमतीने ठराव पारित करण्यात आला. १० महिने लोटूनही या ठरावावर प्रशासनाने अद्याप अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे बाजार परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ‘कृउबास’ची तयारीशहरातील ठोक भाजीपाला बाजारामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा ठोक बाजार सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविण्याची तयारी बाजार समिती प्रशासनाने दर्शविली असून, याला बाजार समिती सभापती गुणवंत चौधरी व सचिव अरविंद दाते यांनी दुजोरा दिला आहे. परिणामी, बाजारात सुविधांची निर्मिती करण्याची तसेच समस्या सोडविण्याची तयारीही बाजार समिती प्रशासनाने दर्शविली. परंतु, शहरातील काही दलालांनी त्यांच्या स्वार्थापोटी या निर्णयाला विरोध दर्शविल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. ही समस्या सोडविण्यात प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.