शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जुना धान्यगंज झाले समस्यागंज

By admin | Updated: March 26, 2016 02:47 IST

शहरातील वॉर्ड क्रमांक-११ मधील जुना धान्यगंज बाजार हा फार जुना व प्रसिद्ध बाजार आहे.

नगर प्रशासनाचे दुर्लक्ष : बाजारामुळे मंदिरात जाण्याचा मार्ग बंद होतोबाबा टेकाडे सावनेरशहरातील वॉर्ड क्रमांक-११ मधील जुना धान्यगंज बाजार हा फार जुना व प्रसिद्ध बाजार आहे. या ठिकाणी भाजीपाला विक्रेते रोज दुकाने थाटतात. सकाळी या बाजारात ग्राहकांची चिक्कार गर्दी असते. वास्तवात, या बाजारामुळे परिसरातील नागरिकांना तसेच देवीच्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना त्रास होतो. बाजारात टाकण्यात येत असलेल्या टाकाऊ वस्तू व पदार्थांची वेळीच योग्य विल्हेवाट लावली जात नाही. या समस्या सोडविण्यात याव्या तसेच बाजारात मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नगर प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. परंतु, प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप नागरिकांनी केला. धान्यगंज बाजार हा शहरातील जुना बाजार आहे. पूर्वी या ठिकाणी धान्याचा बाजार भरायचा. त्यामुळे या बाजाराला धान्यगंज असे नाव रूढ झाले. कालांतराने या जागेवर धान्याऐवजी भाजीपाला व इतर वस्तूंचा बाजार भरायला सुरुवात झाली. या बाजारात देवीचे मंदिर असून, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या बाजारात भाजीपाल्यासह मासोळी, चिकन, मटनाची दुकानेही थाटली जातात. बाजार आटोपल्यानंतर टाकाऊ भाजीपाल्यासोबत मांसाचे तुकडे याच परिसरात फेकले जातात. काही दिवसांनी ते सडतात व त्याची दुर्गंधी सुटते. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय, पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता असते. हीच समस्या शहरातील ठोक भाजीबाजाराची आहे. या भाजीबाजारात तालुक्यातील तसेच शेजारच्या तालुक्यातील शेतकरी त्यांच्याकडील भाजीपाला नियमित विक्रीला आणतात. त्यामुळे या बाजारात रोज सकाळी, ट्रक, ट्रॅक्टर, मेटॅडोर यासह तीनचाकी मालवाहू वाहनांची वर्दळ असते. वाहनांची एकच गर्दी होत असल्याने तिथून पायी मार्ग काढणे अवघड होते. त्यातून वाहनचालकांची भांडणेही होतात. रोज होणारी किरकोळ भांडणे सामान्य होत चालली आहे. या दोन्ही बाजारस्थळांची नियमित साफसफाई केली जात नसल्याने तिथे गुरे, कुत्री व डुकरांचा वावर वाढला आहे. त्यातच नागरिक कुठेही आडोशाला लघुशंका व घाण करतात. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीसोबतच कुत्री व डुकरांचाही त्रास सहन करावा लागतो. या बाजारस्थळांपासून स्थानिक नगर परिषद प्रशासनाला उत्पन्न मिळत असले तरी, या जागेची साफसफाई करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बाजार स्थानांतरित करण्याचा प्रस्तावशहरातील जुना धान्यगंज तसेच ठोक भाजीपाला बाजारातील मटण, चिकन दुकानांमुळे समस्येत भर पडत आहे. त्यामुळे या दोन्ही बाजारांमधील सदर दुकाने कोलार नदीच्या तीरावर स्थानांतरित करण्याचा स्थानिक नगर प्रशासनाने निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १३ मे २०१५ रोजी पार पडलेल्या नगर परिषदेच्या आमसभेत सर्वसंमतीने ठराव पारित करण्यात आला. १० महिने लोटूनही या ठरावावर प्रशासनाने अद्याप अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे बाजार परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ‘कृउबास’ची तयारीशहरातील ठोक भाजीपाला बाजारामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा ठोक बाजार सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविण्याची तयारी बाजार समिती प्रशासनाने दर्शविली असून, याला बाजार समिती सभापती गुणवंत चौधरी व सचिव अरविंद दाते यांनी दुजोरा दिला आहे. परिणामी, बाजारात सुविधांची निर्मिती करण्याची तसेच समस्या सोडविण्याची तयारीही बाजार समिती प्रशासनाने दर्शविली. परंतु, शहरातील काही दलालांनी त्यांच्या स्वार्थापोटी या निर्णयाला विरोध दर्शविल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. ही समस्या सोडविण्यात प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.