शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

अधिकाऱ्यांची टळली कारागृहवारी

By admin | Updated: September 15, 2016 02:50 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अवमानना प्रकरणात दया दाखविल्यामुळे गडचिरोली येथील अनुसूचित जमाती

अवमानना प्रकरण : भविष्यात कायद्यानुसार वागण्याचा इशारा, हायकोर्टाने दाखविली दयानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अवमानना प्रकरणात दया दाखविल्यामुळे गडचिरोली येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी समितीमधील चार अधिकाऱ्यांची कारागृहवारी टळली. या अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना पाचारण केले होते. शेवटी न्यायालयाने सौम्य भूमिका घेऊन अधिकाऱ्यांनी मागितलेली क्षमा स्वीकारली व भविष्यात पुन्हा बेकायदेशीर कृती केल्यास कडक भूमिका घेण्यात येईल असा इशारा देऊन त्यांना अवमानना कारवाईतून मुक्त केले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. समितीचे तत्कालीन उपाध्यक्ष गिरीश सरोदे, सदस्य सचिव दिनेश तिडके, सदस्य मनोज चव्हाण व चंदा मगर यांचा संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. समितीने कायद्यानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे श्वेता चौधरी व पवन श्रीरामे यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली होती. याचिकेत या चारही अधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले होते. गेल्या तारखेला न्यायालयाने या अधिकाऱ्यांना समन्स बजावला होता. त्यानुसार हे अधिकारी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित झाले होते. दरम्यान, न्यायालयाने त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांना पाचारण केले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे वकिलांनी न्यायालयात गर्दी केली होती. परंतु, शेवटी न्यायालयाने अधिकाऱ्यांच्या भविष्याचा विचार करता सौम्य भूमिका घेतली. अधिकाऱ्यांची क्षमा स्वीकारून त्यांना अवमाननेच्या कारवाईतून मुक्त केले. मात्र, तत्पूर्वी तापलेले वातावरण पाहून अधिकाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुनील खरे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)अशी आहे पार्श्वभूमीपडताळणी समितीने अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र नाकारल्यामुळे श्वेता चौधरी व पवन श्रीरामे यांनी सुरुवातीला उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. १८ मार्च २०१६ रोजी समितीने स्वत:चा वादग्रस्त निर्णय मागे घेऊन याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांत वैधता प्रमाणपत्र देण्याची ग्वाही न्यायालयाला दिली होती. परिणामी न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. यानंतर १२ एप्रिल २०१६ रोजी समितीची बैठक झाली. त्यात याचिकाकर्त्यांना वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला तर, २१ आॅगस्ट २०१६ रोजी याचिकार्त्यांना सशर्त वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश जारी करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असून याचिकाकर्त्यांना देण्यात येणारे वैधता प्रमाणपत्र या याचिकेवरील निर्णयाच्या आधीन राहील असे आदेशात नमूद करण्यात आले. अशाप्रकारच्या वैधता प्रमाणपत्राला कायद्यात स्थान नसल्यामुळे चौधरी व श्रीरामे यांनी अवमानना याचिका दाखल केली होती.