शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी शिरजोर, मंत्री कमजोर

By admin | Updated: October 21, 2016 02:40 IST

सामाजिक न्याय विभागात सध्या ‘अधिकारी शिरजोर व मंत्री कमजोर’ अशी चर्चा रंगत आहे.

जिल्हास्तरीय जात पडताळणी समिती स्थापन करण्यास अधिकारी नाखूशनागपूर : सामाजिक न्याय विभागात सध्या ‘अधिकारी शिरजोर व मंत्री कमजोर’ अशी चर्चा रंगत आहे. विभागाने जिल्हास्तरीय समित्या गठित करण्याचा निर्णय घेतल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्र्यांनी १६ सप्टेंबरला अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावून सखोल चर्चा केली. जिल्हानिहाय समित्यांचा कर्मचारी आकृतीबंध निश्चित करताना चूक झाल्याचे मान्य केले. सुधारीत आकृतिबंध तयार करून उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश विभागाचे सचिव व इतर अधिकाऱ्यांना दिले. परंतु अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या निर्देशाची दखल घेतली नाही. दोन दिवसात चर्चेचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतरही महिना उलटून गेल्यावरही बैठकीचे इतिवृत्त प्रकाशित केले नाही. त्यामुळे सामाजिक न्याय विभागात अधिकाऱ्यांविरुद्ध कर्मचारी असा सामना रंगत असल्याचे चित्र आहे. कर्मचारी संघटनेने आरोप केला की, महसूल विभागाने आपल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून विभागीय समित्या निरस्त करून जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. १० टक्के प्रलंबित प्रकरणाचे भांडवल करून, महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) यांना पदोन्नती मिळवून देण्यासाठी राज्यकर्त्यांपुढे जिल्हास्तरीय समित्यांचे गाजर ठेवले आहे. सामाजिक न्याय विभागानेही महसूल अधिकाऱ्यांच्या दबावात आवश्यकता नसतानाही जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हास्तरीय समित्या झाल्यास जास्त प्रमाणात अधिकारी, कर्मचारी पदाची निर्मिती करावी लागणार नाही व शासनावर आर्थिक बोजा बसणार नाही हे दर्शविण्यासाठी नवीन आकृतिबंधात अधिकाऱ्यांची पदे वाढवून, वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांची पदे कमी केली आहे. परंतु या आकृतीबंधामुळे १ कोटी लोकसंख्या असलेल्या व २ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांना सारखाच आकृतिबंध लागणार आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होणार असून, समितींच्या कामाची पेंडेन्सी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)शासनावर पडणार ४० कोटींचा भारराज्यात ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे नवीन पदे निर्माण करण्यावर व पदभरतीवर निर्बंध असताना अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी वरिष्ठ वर्ग १ व वर्ग १ ची ८४ पदे नवनिर्मित केली आहे. यात समाजकल्याण विभागाच्या सहा. आयुक्तांना उपायुक्तांचा दर्जा मिळणार आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) यांना पदोन्नती मिळणार आहे. पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांचाही समावेश आहे. परंतु सध्या अस्तित्वात असलेल्या १५ विभागीय समित्यांमध्ये पोलीस उपअधीक्षकांची फक्त २ पदे भरलेली आहे. जिल्हानिहाय समितीमध्ये शासनाला ३६ पदे भरावी लागणार आहे. अधिकाऱ्यांचे वेतन व इतर सुविधांसाठी शासनावर ४० कोटींचा भार पडणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हास्तरीय समित्यांमुळे प्रलंबित कामांची संख्या वाढणार असून, मागासवर्गीयांच्या योजना राबविण्यासाठी फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.