शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

ओबीसी विद्यार्थ्यांनाही देणार गणवेश

By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांनाही नि:शुल्क गणवेश वाटप करण्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन

जिल्हा नियोजन समिती देणार निधी : सर्वपक्षीय एकमतनागपूर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांनाही नि:शुल्क गणवेश वाटप करण्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असा निर्णय सोमवारी झालेल्या सभेत घेण्यात आला.जिल्हा नियोजन समितीची बैठक देशपांडे सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री शिवाजीराव मोघे होते. बैठकीला अन्न पुरवठा मंंत्री अनिल देशमुख, रोहयो मंत्री नितीन राऊत, अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे, आदिवासी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आदी उपस्थित होते. जि.प. सदस्य उपासराव भुते यांनी या मुद्दाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. एकाच वर्गात एका मुलाला नि:शुल्क गणवेश वाटप व दुसऱ्याला नाही हा भेदभाव योग्य नव्हे. मागासवर्गीयाप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. भारती गोडबोले, शिव यादव यांनीही त्याला समर्थन दिले. आमदार आशिष जयस्वाल, सुनील केदार यांनाही जिल्हा नियोजन समितीने यासाठी निधी द्यावा अशी सूचना केली. मृणालिनी फडणवीस यांनीही विदर्श वैधानिक विकास मंडळाने केलेल्या संशोधनात ही बाब अधोरेखीत केल्याचे स्पष्ट केले.शिक्षणाधिकारी ललित रामटेके यांना यावर किती निधी खर्च येणार याची बैठकीत विचारणा करण्यात आली. त्यांनी १८ ते २० लाख रुपये यासाठी खर्च येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भातील प्रस्ताव पाठवा निधी दिला जाईल असे सांगितले. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनीही त्याला दुजोरा दिला. बैठकीला आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, सुधीर पारवे, सुनील केदार,दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विजय घोडमारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले आदी उपस्थित होते. दीक्षाभूमी व ताजबागला ‘अ’ तीर्थक्षेत्राचा दर्जादीक्षाभूमी व ताजबागला पर्यटनस्थळाचा ‘अ’ दर्जा देण्यात यावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सध्या या दोन्ही श्रद्धास्थांनाना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आहेस्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य नाराजबैठकीत पुरेसा वेळ बोलू न दिल्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी नाराज झाले. त्यांनी त्यांची नाराजी स्पष्ट शब्दात बैठकीत बोलूनही दाखविली. जि.प. सदस्य शिव यादव, नगरसेवक राजू लोखंडे, अस्लम खान, परिणय फुके यांनी त्यांच्या भागातील मुद्दे बैठकीत उपस्थित केले. त्यात पूरपीडितांच्या मदतीचा मुद्दा होता. गेल्या बैठकीत मांडलेल्या मुद्यांचा इतिवृत्तात समावेश नसल्याबद्दल यादव यांनी खंत व्यक्त केली. पोकलॅण्ड ठरले पांढरा हत्तीजिल्हा नियोजन निधीतून खरेदी करण्यात आलेले पोकलॅण्ड आणि टिप्पर पांढरा हत्ती ठरल्याची टीका आमदार आशिष जयस्वाल यांनी केली. ही यंत्रसामग्री नादुरुस्त आहे. त्याला दुरुस्त करण्यासाठी निधी नाही. जि.प.चे अधिकारी प्रतिसाद देत नाही. सरकारचा हा चांगला उपक्रम होता; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले असे सुनील केदार म्हणाले. दोन वर्षांपूर्वी ६ पोकलॅण्ड आणि १२ टिप्पर खरेदी करण्यात आले होते. यापैकी सध्या चार चालू असल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिली.झुडपी जंगलांचे सर्वेक्षणझुडपी जंगल कायदा शासनाने शिथिल केला असला तरी, त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम सर्वेक्षणाची गरज आहे. यासाठी अजून तीन महिन्यांचा वेळ लागेल, असे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले. विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात एक महिन्यात प्रस्ताव मागण्यात आले असून, सर्वेक्षणासाठी निवृत्त महसूल अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा विचार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दीपक कापसे यांनी हा मुद्दा उपस्थित करून झुडपी जंगलांची नेमकी स्थिती काय, असा सवाल केला होता.गारपीटग्रस्तांच्या मदतीचा आढावागारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत केली असली तरी अद्याप ती शेतकऱ्यांना मिळाली नाही, याकडे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले. ही मदत का पोहोचली नाही याचा पालकमंत्र्यांनी आढावा घ्यावा, अशी मागणी केली. गारपीटग्रस्तांना मदत करण्यात आली असली, तरी ज्यांची जमीन खरडून गेली त्यांच्याबाबत शासनाने काहीही केले नाही, असे आमदार विजय घोडमारे म्हणाले. शासनाकडून प्राप्त झालेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तसे प्रमाणपत्रही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. काही तक्रारी असेल तर येत्या काही दिवसांत याबाबत आढावा घेऊ, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा म्हणाले. पुढच्या सात दिवसांत आढावा घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.(प्रतिनिधी)