शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नर्सरी, केजीचे लाखो चिमुकले या वर्षीही राहणार घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाचे अनेक वाईट परिणाम पुढे येत आहेत. शिक्षणाचे क्षेत्र कोसळल्यागतच झाले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाची पुरती ...

नागपूर : कोरोनाचे अनेक वाईट परिणाम पुढे येत आहेत. शिक्षणाचे क्षेत्र कोसळल्यागतच झाले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाची पुरती वाट लागली आहे. नर्सरी व केजीमध्ये शिकत असलेले जिल्ह्यातील जवळपास लाखावर विद्यार्थी या वर्षीही कोरोनामुळे घरातच राहणार आहेत.

नागपूर जिल्ह्यात नर्सरी ते केजीच्या जवळपास हजारावर शाळा आहेत. या शाळांमधून लाखोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. नर्सरी ते केजी-टूपर्यंतचे चिमुकले मागील वर्षी घरातच राहिले. या वर्षी कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे चिमुकले घरातच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नर्सरी ते केजी शाळा चालविणाऱ्या अनेक संस्था चालकांमध्ये चिंतायुक्त वातावरण पसरले आहे. सर्वांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यातील नर्सरीच्या शाळा - १,०५८

विद्यार्थी संख्या - १,१८,०००

वर्षभर कुलूप यंदा काय होणार?

- गेल्या वर्षभरापासून शाळा कुलूपबंद आहेत. तिसऱ्या लाटेमुळे येणारे वर्षीही शाळा कुलूपबंदच राहणार आहे. शाळाच बंद असल्याने, आम्ही मुलांची फीही माफ केली, पण शाळेचे मेंटनन्स, शिक्षकांचे वेतन याशिवाय अनेक बाबींवर पैसा खर्च होत असतो. शाळांची देखरेख पैशाअभावी रखडली आहे. कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसला आहे.

नीलेश सोनटक्के, प्राचार्य, श्री सत्यसाई विद्या मंदिर व कॉन्व्हेंट

२) मार्च, २०२० पासून नर्सरी केजीच्या शाळा बंद आहे. प्री-प्रायमरी शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाचा पाया आहे. ऑनलाइन शिक्षण हा पर्याय लहान मुलांच्या बाबतीत शक्य नाही. यामुळे शाळांना फीस नाही. आर्थिक अडचण खूप वाढली आहे. सध्या तरी शिक्षण सुरू होईल हे निश्चित नाही, शिवाय शिक्षकांचा पगार व मेंटेनन्सचा खर्च आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.

कपिल उमाळे, संचालक, राहुल उमाळे कॉन्व्हेंट

३) सलग दोन सत्र शाळा बंद राहणार असल्याने, आमच्या डोळ्यासमोर अंधार दिसत आहे. शाळा चालवायची की बंद करायची, असा प्रश्न आम्हाला भेडसावतो आहे. किती दिवसपर्यंत असे चालणार, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. अतिशय बिकट परिस्थिती आली आहे. काय करावे, हेच कळत नाही.

- रंजना सुरजुसे सोमकुवर, ब्ल्यू ड्रीम कॉन्व्हेंट, खापरी

१) वर्षभरापासून चिमुकले घरातच आहेत. घरात कितीही प्रयत्न केला, तरी मुले शिकत नाहीत. त्यांच्या शैक्षणिक सत्राबाबत थोडीशी चिंता वाटते. वयाने लहान असली, तरी त्यांचा मूलभूत अभ्यासक्रम कच्चा राहू नये, याची आम्हाला काळजी वाटते.

संदीप बन्सोड, पालक

२) लहानग्यांना शिस्त लागावी, म्हणूनच प्री-प्रायमरी शाळेत टाकावे लागते. शाळा त्यांच्याकडून आवश्यक त्या सर्व गोष्टी करूनही घेतात. दीड वर्षांपासून मुले घरातच आहे. शाळा सुरू होईल की नाही, काहीच सांगता येत नाही. त्यामुळे पुढच्या वर्गात जेव्हा ते जातील, ते कसे शिकतील? अवघडच आहे.

अंजली पाध्ये, पालक

- ही परिस्थिती मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांचे आरोग्य टिकविण्याची आहे. मोठमोठ्या लोकांनाच कोरोनाने घाम फोडला, त्यात लहानग्यांचे काय अस्तित्व आहे. अभ्यास बुडला, तरी चालेल. कोरोना गेल्यानंतरच बघू शिक्षणाचे काय व्हायचे ते.

सुनीता बालपांडे, पालक

- पालक-मुलांमध्ये संवाद वाढवा

दोन ते सहा वर्षे वयोगटांतील मुले अनेकांचे अनुकरण करतात. शाळाच बंद असल्याने ते गेल्या दीड वर्षांपासून घरातच आहे. त्यामुळे त्यांच्या सवयीत अनेक बदल झाले आहे. अशा वेळी पालकांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी. ते घरातच असल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालकांचा मुलांसोबत संवाद अधिक वाढविणे गरजेचे आहे.

डॉ.मनिष ठाकरे, मानसोपचार तज्ज्ञ