शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२०० विद्यार्थ्यांसाठी धावली ‘एनटीपीसी’

By admin | Updated: August 14, 2015 03:18 IST

शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस पुरामुळे तारसा जॉर्इंट येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अडकून पडली होती.

पालकमंत्र्यांचा पुढाकार : विद्यार्थ्यांना काढण्यासाठी केला रेल्वे इंजिनचा वापरनागपूर : शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस पुरामुळे तारसा जॉर्इंट येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अडकून पडली होती. याबाबत पालकमंत्र्यांना माहिती मिळताच त्यांनी मौदा एनटीपीसीच्या महाप्रबंधकांना सूचना केली. पुरामुळे कोणतेही वाहन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची शाश्वती नसताना एनटीपीसीने चक्क रेल्वे इंजिनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत अधिकारी पोहोचले. सुमारे तासाभरातच २०० विद्यार्थ्यांना तेथून काढण्यात यश आले. त्या सर्व विद्यार्थ्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था एनटीपीसीने केली. मौदा येथील दोन शाळांमध्ये रामटेक आणि परिसरातील विद्यार्थी येतात. नेहमीप्रमाणे गुरुवारीही विद्यार्थी शाळेत आले. शाळा सुटल्यानंतर २०० विद्यार्थी परत जाण्यासाठी बसमध्ये चढले. ही बस तेथून पुढे निघाली. मात्र मौदा-रामटेक मार्गावरील तारसा जॉर्इंटनजीक येताच रस्त्यावर पाणी असल्याने बस पुढे जाऊ शकली नाही. परत जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी होते. त्यामुळे तेथेच बस अडकून पडली. त्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे धडकी भरली. २०० विद्यार्थी तारसा जॉर्इंटजवळ बसमध्ये अडकून पडल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळताच त्यांनी जिल्हा प्रशासनासह एनटीपीसीचे महाव्यवस्थापक व्ही. थंगापंडियन यांना मदत करण्याचे निर्देश दिले. मात्र सर्वच रस्ते पुरामुळे बंद झाले होते. त्या रस्त्यांवर पाणीच पाणी होते. परिणामी कोणतेच वाहन तेथे पोहोचण्याची शक्यता नव्हती. अशात थंगापंडियन यांनी विद्यार्थ्यांना तेथून आणण्यासाठी रेल्वे इंजिनचा आधार घेण्याचे ठरविले. त्यानुसार रेल्वे इंजिन चाचेरपर्यंत नेले. सायंकाळी ६ वाजतापासून ते विद्यार्थी तेथेच अडकून होते. साधारणत: तासाभरातच त्या सर्व २०० विद्यार्थ्यांना रेल्वेच्या इंजिनवर चारही बाजूने बसवून एनटीपीसी मौदा येथे आणण्यात आले. सायंकाळी ७ वाजतापर्यंत हे अभियान एनटीपीसीने राबविले. एनटीपीसी येथील भवन्स विद्यालयात त्यांची भोजन आणि निवास व्यवस्था करण्यात आली. जवळपास ५० विद्यार्थ्यांच्या पालकांनी आतापर्यंत तेथून विद्यार्थ्यांना नेले. उर्वरित १५० विद्यार्थी अजूनही भवन्समध्येच आहेत, अशी माहिती महाव्यवस्थापक थंगापंडियन यांनी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले. यासाठी महाव्यवस्थापक थंगापंडियन यांच्यासह सहायक महाव्यवस्थापक प्रवीण गर्ग, परिहार, प्रशांत तसेच इतर अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. (जिल्हा प्रतिनिधी)