शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

२०० विद्यार्थ्यांसाठी धावली ‘एनटीपीसी’

By admin | Updated: August 14, 2015 03:18 IST

शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस पुरामुळे तारसा जॉर्इंट येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अडकून पडली होती.

पालकमंत्र्यांचा पुढाकार : विद्यार्थ्यांना काढण्यासाठी केला रेल्वे इंजिनचा वापरनागपूर : शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस पुरामुळे तारसा जॉर्इंट येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अडकून पडली होती. याबाबत पालकमंत्र्यांना माहिती मिळताच त्यांनी मौदा एनटीपीसीच्या महाप्रबंधकांना सूचना केली. पुरामुळे कोणतेही वाहन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची शाश्वती नसताना एनटीपीसीने चक्क रेल्वे इंजिनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत अधिकारी पोहोचले. सुमारे तासाभरातच २०० विद्यार्थ्यांना तेथून काढण्यात यश आले. त्या सर्व विद्यार्थ्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था एनटीपीसीने केली. मौदा येथील दोन शाळांमध्ये रामटेक आणि परिसरातील विद्यार्थी येतात. नेहमीप्रमाणे गुरुवारीही विद्यार्थी शाळेत आले. शाळा सुटल्यानंतर २०० विद्यार्थी परत जाण्यासाठी बसमध्ये चढले. ही बस तेथून पुढे निघाली. मात्र मौदा-रामटेक मार्गावरील तारसा जॉर्इंटनजीक येताच रस्त्यावर पाणी असल्याने बस पुढे जाऊ शकली नाही. परत जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी होते. त्यामुळे तेथेच बस अडकून पडली. त्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे धडकी भरली. २०० विद्यार्थी तारसा जॉर्इंटजवळ बसमध्ये अडकून पडल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळताच त्यांनी जिल्हा प्रशासनासह एनटीपीसीचे महाव्यवस्थापक व्ही. थंगापंडियन यांना मदत करण्याचे निर्देश दिले. मात्र सर्वच रस्ते पुरामुळे बंद झाले होते. त्या रस्त्यांवर पाणीच पाणी होते. परिणामी कोणतेच वाहन तेथे पोहोचण्याची शक्यता नव्हती. अशात थंगापंडियन यांनी विद्यार्थ्यांना तेथून आणण्यासाठी रेल्वे इंजिनचा आधार घेण्याचे ठरविले. त्यानुसार रेल्वे इंजिन चाचेरपर्यंत नेले. सायंकाळी ६ वाजतापासून ते विद्यार्थी तेथेच अडकून होते. साधारणत: तासाभरातच त्या सर्व २०० विद्यार्थ्यांना रेल्वेच्या इंजिनवर चारही बाजूने बसवून एनटीपीसी मौदा येथे आणण्यात आले. सायंकाळी ७ वाजतापर्यंत हे अभियान एनटीपीसीने राबविले. एनटीपीसी येथील भवन्स विद्यालयात त्यांची भोजन आणि निवास व्यवस्था करण्यात आली. जवळपास ५० विद्यार्थ्यांच्या पालकांनी आतापर्यंत तेथून विद्यार्थ्यांना नेले. उर्वरित १५० विद्यार्थी अजूनही भवन्समध्येच आहेत, अशी माहिती महाव्यवस्थापक थंगापंडियन यांनी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले. यासाठी महाव्यवस्थापक थंगापंडियन यांच्यासह सहायक महाव्यवस्थापक प्रवीण गर्ग, परिहार, प्रशांत तसेच इतर अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. (जिल्हा प्रतिनिधी)