शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

परीक्षा विभागावर आता कुलगुरूंचा ‘कंट्रोल’

By admin | Updated: March 20, 2017 02:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गाडी रुळावर आणण्याचे श्रेय प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात येत आहे.

परीक्षा संचालकांकडून प्र-कुलगुरूंकडे फायली जाणार नाहीत : परीक्षा विभागाचे काय होणार? योगेश पांडे   नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गाडी रुळावर आणण्याचे श्रेय प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात येत आहे. मात्र डॉ. येवले यांचा परीक्षा विभागावरील ‘कंट्रोल’ कुलगुरूंच्या हाती येणार आहे. परीक्षा व मूल्यमापन संचालकांना विविध फायली प्र-कुलगुरूंना न पाठवता थेट कुलगुरुंना पाठवाव्या लागणार आहेत. कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिवांनी यासंदर्भात परिपत्रकच जारी केले आहे. डॉ. येवले परीक्षेच्या कामापासून दूर झाले तर परीक्षा व मूल्यमापन विभागाचे काय होणार, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंवर संपूर्ण विद्यापीठाचीच जबाबदारी असते व त्यांची कार्यकक्षा व्यापक असते. कामाचा भार लक्षात घेता. जुन्या विद्यापीठ कायदा अस्तित्वात असेपर्यंत नागपूर विद्यापीठात परीक्षेचा भार हा प्र-कुलगुरूंवरच होता. नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर प्र-कुलगुरूंच्या कार्यकक्षेतदेखील बदल झाला आहे. जारी झालेल्या परिपत्रकानुसार प्र-कुलगुरूंकडे ‘बीसीयूडी’ची मोठी जबाबदारी राहणार आहे. नवीन कायद्यात ‘बीसीयूडी’ संचालकांचे पदच नाही. या पदाची बहुतांश कर्तव्ये व अधिकार प्र-कुलगुरूंना प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत परीक्षा विभागातून प्र-कुलगुरूंकडे फायली यायच्या. यामुळे अनेक गैरप्रकारदेखील कमी झाले होते. मात्र यापुढे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना परीक्षा व मूल्यमापन विभागातील सर्व फायली थेट कुलगुरूंच्या अंतिम मान्यतेसाठी सादर कराव्या लागणार आहेत. यामुळे प्र-कुलगुरुंऐवजी थेट कुलगुरुंचाच परीक्षा विभागावर ‘कंट्रोल’ राहणार आहे. नियमानुसार जबाबदारीचे वाटप यासंदर्भात कुलसचिव पूरण मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता नव्या विद्यापीठ कायद्यातील नियमांनुसार अधिकाऱ्यांच्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्र-कुलगुरूंकडे परीक्षा विभागाचे काम होते. मात्र आता त्यांच्याकडे ‘बीसीयूडी’चे ९५ टक्के काम आले आहे. शिवाय ‘बीसीयूडी’, महाविद्यालयीन शाखा व विकास शाखा यांचा मिळून ‘महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग’ तयार झाला आहे. त्याची पूर्ण जबाबदारी प्र-कुलगुरूंकडे राहणार आहे. परीक्षा विभागातील ज्या समित्यांवर प्र-कुलगुरुंचा सहभाग आहे, त्याचे काम ते निश्चित बघतील. शिवाय कुलगुरूदेखील आवश्यकतेनुसार प्र-कुलगुरूंचा सल्ला घेऊ शकतील, असे मेश्राम यांनी सांगितले. परीक्षा विभागाला फटका बसणार ? विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गाडी रुळावर आणण्यात प्र-कुलगुरूंचा मौलिक वाटा असल्याचे कुलगुरूंनीदेखील अनेकदा म्हटले आहे. त्यांच्याच पुढाकारामुळे परीक्षा विभागाचे अत्याधुनिकीकरण होत असून निकालांचा वेगदेखील वाढला. शिवाय ‘पीएचडी’च्या बजबजपुरीलादेखील त्यांनी कात्री लावत दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. परीक्षा विभागातील दैनंदिन कारभारावर त्यांचे लक्ष होते. बहुतांश फायली त्यांच्याच नजरेखालून पुढे आवश्यकतेनुसार कुलगुरूंकडे जात होत्या. अशा स्थितीत ते परीक्षेच्या कामापासून दूर झाल्यास परीक्षा विभागाचा वेग मंदावेल की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान नव्या विद्यापीठ कायद्यातील कलम १३ अनुसार प्र-कुलगुरूंकडेची कार्यकक्षा संपूर्ण विद्यापीठ असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. इतर काही कलमांनुसारदेखील परीक्षा विभागाशी संबंधित अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.