शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता शहरातील रस्त्यावर खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST

आकांक्षा कनोजिया नागपूर : वसंत ऋतूची चाहूल लागली आहे, पानगळ सुरू झाली आहे. या काळात रस्त्यांवर पानांचा खच पडलेला ...

आकांक्षा कनोजिया

नागपूर : वसंत ऋतूची चाहूल लागली आहे, पानगळ सुरू झाली आहे. या काळात रस्त्यांवर पानांचा खच पडलेला दिसत असतो. सकाळी सफाई कर्मचारी रस्त्यावरील पानांचा कचरा गोळा करून आगी लावून त्याची वाट लावतात. आता महापालिका प्रशासनाने वसंत ऋतूतील पानगळीचा वापर खतनिर्मितीसाठी केला आहे. शहरातील काही रस्त्यांवर लोखंडी कठडे तयार करून त्यात रस्त्यावरील कचरा टाकला जात आहे. यापासून निर्माण होणारे खत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तर रस्त्याच्या दुभाजकांवर लावलेल्या झाडांसाठी सुद्धा या खतांचा उपयोग होणार आहे.

- दररोज ३० ते ४० टन कचऱ्यापासून खत निर्मिती

मुख्य स्वच्छता अधिकारी दीनदयाल टिंबाडे यांनी सांगितले की, पूर्वी ३ ते ४ टन कचरा खत बनविण्यासाठी भांडेवाडीत पाठविला जात होता. परंतु या उपक्रमामुळे ३० ते ४० टन कचऱ्यापासून रस्त्यावरच खताची निर्मिती केली जात आहे. पूर्वीपेक्षा जास्त कचऱ्याचा वापर या प्रक्रियेमुळे होत आहे.

- १३ ठिकाणी लागले कम्पोस्ट पिट

वाळलेली पाने गोळा करण्यासाठी शहरातील १३ ठिकाणी कम्पोस्ट पिट लावण्यात आले आहे. धरमपेठ झोन अंतर्गत सिव्हील लाईनमध्ये ५, अंबाझरीमध्ये ८ कम्पोस्ट पिट लावले आहे. जैविक खत बनविण्यासाठी साधारणत: ४० दिवसांचा कालावधी लागतो. ४० दिवसानंतर खत तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना देण्यात येईल. दीनदयाल टिंबाडे म्हणाले की रस्त्यावर पसरलेली पानगळ रोज उचलून भांडेवाडीत पाठविणे शक्य नाही. त्यामुळे शहरात जिथे जास्त वृक्ष आहे, तिथे कम्पोस्ट पिट लावून खत बनविण्यात येत आहे.

- दररोज १०० किलो खताची निर्मिती

प्रायोगिक तत्वावर १३ कम्पोस्ट पिट लावण्यात आले आहे. शहरातील कचऱ्यापासून कमी खर्चात खत निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. कम्पोस्ट पिट लावल्याने वाळलेल्या पानांपासून दररोज १०० ते १२५ किलो खत होम कम्पोस्टींग केले जात आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्चही वाचला आहे.

-डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त, घन कचरा व्यवस्थापन