शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डासाठी अधिसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:04 IST

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्ड स्थापन करण्यासाठी २९ जुलैला अधिसूचना काढली आहे.

ठळक मुद्देकिरकोळ व्यापाऱ्यांना फायदा बोर्डाने व्यापारी संघटनांशी संवाद साधावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्ड स्थापन करण्यासाठी २९ जुलैला अधिसूचना काढली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या घोषणेचे कन्फेडरेशन आॅफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) स्वागत करताना शासनाचे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले आहे. बोर्डाच्या माध्यमातून देशातील सात कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, अधिसूचनेनुसार बोर्ड व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना व व्यापाऱ्यांना लागू होणारे अधिनियम आणि नियमांच्या सुलभीकरणासाठी सूचना देणार आहे. तसेच व्यापाऱ्यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची आणि व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी विमा, पेन्शन, आरोग्य सेवा जसे सामाजिक सुरक्षेसंदर्भात बोर्ड शिफारस करणार आहे.बोर्डाचे अध्यक्ष बिगर शासकीय, पाच बिगर शासकीय सदस्य आणि व्यापारी संघटनांचे १० प्रतिनिधी राहणार आहे. आठ मंत्रालय आणि नीती आयोगाच्या प्रतिनिधींना बैठकीत आमंत्रित करण्यात येणार आहे. बोर्डाची प्रत्येक तिमाहीत किमान एकदा बैठक होणार आहे.वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत विभागाद्वारे बोर्डाला सचिवालयातर्फे मदत देण्यात येईल. नवी दिल्ली येथे १९ एप्रिल २०१९ ला झालेल्या कॅटच्या व्यापारी रॅलीत मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाची स्थापना करण्याची घोषणा केली होती, हे विशेष. त्यानुसार पंतप्रधानांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोत्तम पाऊल उचलल्याचे भरतीया यांनी सांगितले. देशातील सात कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापाऱ्यांचे कल्याण, कर आधारित व्यापार बनविणे आणि सर्वोत्तम व्यवसाय प्रथांचा अवलंब करण्यासाठी बोर्ड रचनात्मक प्रयत्न करणार आहे. देशातील व्यापारी संघटनांशी थेट संवाद साधून, त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा बोर्डाचा प्रयत्न राहणार आहे. भरतीया म्हणाले, स्थापनेनंतर बोर्डाने देशातील व्यावसायिक समूहाचे एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण करावे. एका सर्वेक्षणानुसार सध्या देशात दरवर्षी किरकोळ व्यवसाय जवळपास ४५ लाख कोटींचा असून, बिगर कॉर्पोरेट क्षेत्राच्या जीडीपीमध्ये ४५ टक्के योगदान आहे.या तुलनेत कॉर्पोरेट क्षेत्राचे केवळ १५ टक्के योगदान आहे. त्यामुळे देशात किरकोळ व्यापारी क्षेत्राचे सक्षमीकरण आणि वाढविण्याची गरज आहे. बोर्डाने घरगुती व्यवसाय सुव्यवस्थित करण्यासाठी काम करावे आणि किरकोळ व्यावसायिक क्षेत्राच्या वाढीसाठी व्यावसायिक समूदायाची क्षमता वाढवावी. याशिवाय महिला उद्योजिकांना प्रोत्साहन आणि व्यापाऱ्यांतर्फे अन्य देशांमध्ये निर्यात वाढीवर बोर्डाने भर द्यावा.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार