शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

खड्डेमुक्त रस्ते नागपूरकरांचा मूलभूत अधिकार नाही का?

By admin | Updated: May 23, 2015 02:38 IST

खड्डेमुक्त व गुळगुळीत रस्ते उपलब्ध होणे हा राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अनुसार नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.

नागपूर : खड्डेमुक्त व गुळगुळीत रस्ते उपलब्ध होणे हा राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अनुसार नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. तसेच, नागरिकांना खराब रस्त्यांसंदर्भात विविध माध्यमाद्वारे तक्रारी नोंदविता येतील व तक्रारीवर काय कारवाई झाली याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविता येईल अशी यंत्रणा येत्या ३० जूनपर्यंत निर्माण करण्यात यावी असे, निर्देश राज्यातील सर्व महानगरपालिकांना दिले आहेत. परिणामी या आदेशाकडे नागपूर महानगरपालिकेकडे शहरवासीयांचे लक्ष वेधल्या गेले आहे. महापालिकेने मिशन अतिक्रमणासोबतच ‘ आॅपरेशन खड्डे’ ही हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. असा पडला न्यायालयाचा प्रभाव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर जनहित याचिका नसली तरी नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे तीन महामार्गांच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासा या ३७ किलोमीटर रोडचे चौपदरीकरण वन विभागाच्या परवानगीअभावी रखडले होते. न्यायालयाच्या निर्देशामुळे यापैकी सध्या १० किलोमीटर रोडचे चौपदरीकरण सुरू झाले आहे. नागपूर-हैदराबाद महामार्गावरील पांढरकवड्याजवळच्या ३० किलोमीटर खराब रोडची व नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी उड्डाण पुलाची समस्या न्यायालयाच्या आदेशामुळेच सुटली आहे. जुन्या भंडारा रोडच्या रुंदीकरणासाठी दाखल एक जनहित याचिका प्रलंबित आहे. विकास आराखड्यानुसार जुना भंडारा रोड १८ मीटर रुंद आहे. परंतु, या रोडवर ९ मीटरपर्यंत अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. एका याचिकेत सदर उड्डाण पूल, नागनाल्यावरील पूल, शुक्रवारी उड्डाण पूल, हत्तीनाला उड्डाण पूल व मोमीनपुऱ्यातील रेल्वे अंडरब्रिज या रखडलेल्या प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.काय आहे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयानुसार नवीन यंत्रणेमध्ये लेखी तक्रार नोंदविण्यासाठी केंद्र, एसएमएसद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक व वेबसाईट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. वेबसाईटवर नागरिकांना खराब रस्ते व खड्ड्यांची छायाचित्रे संगणकासह मोबाईलद्वारेही अपलोड करता आली पाहिजे. तसेच, याच वेबसाईटद्वारे तक्रारीवर काय कारवाई झाली याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तक्रारी नोंदविण्याचे हे सर्व मार्ग वर्षभर सुरू ठेवावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. महानगरपालिका या निर्देशांचे किती काटेकोर पालन करते हे पाहण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.