शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

ज्याचे कुणी नाही, त्याचे आयएमए

By admin | Updated: May 9, 2016 03:00 IST

खासगी डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेली इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ‘ज्याचे कुणी नाही,

नागपूर : खासगी डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेली इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ‘ज्याचे कुणी नाही, त्याचे आयएमए’ या संकल्पनेला घेऊन आता वाटचाल करणार आहे. शासकीय डॉक्टर जेथे पोहोचत नाहीत, तेथे ‘आयएमए’ने जाण्याची तयारी दर्शवली आहे. नैतिकता आणि पारदर्शकपणाने रुग्णांना सुरक्षित व उत्कृष्ट दर्जाची आरोग्यसेवा देणे हेच आमचे ध्येय आहे, असा विश्वास ‘आयएमए’चे राष्ट्रीय महासचिव पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांनी व्यक्त केला. ‘आयएमए’ नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा रविवारी सायंकाळी थाटात पार पडला. या सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. अजय काटे यांनी डॉ. अविनाश वासे यांच्याकडे अध्यक्षपदाची तर मावळते सचिव डॉ. सरिता उगेमुगे यांनी डॉ. अर्चना कोठारी यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवली.दरम्यान डॉ. अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाध साधला. ते म्हणाले, ‘आयएमए’चे देशात दोन लाख सहा हजार सदस्य आहेत. रुग्णाची काळजी घेणे प्रत्येक डॉक्टरांचे कर्तव्य आहे. नवीन डॉक्टरला पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आता आयएमएने पुढाकार घेतला आहे. गरीब रुग्णांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. (प्रतिनिधी)शासन काही निर्णय चुकीचे घेत आहेडॉ. अग्रवाल म्हणाले, डॉक्टरांजवळ जायचेच कशाला? आपण व्यायाम केल्यास, दररोज दोन कि.मी.पर्यंत चालल्यास, दोन मजली पायऱ्या चढल्यास तसेही आरोग्य सुदृढच राहील. प्रत्येकाने आनंदी व सुदृढ राहावे, असे ‘आयएमए’चे सांगणे आहे. प्रत्येक शहरात, देशात व जगात प्रत्येक आजारावर उपचार आहे. ‘आयएमए’ सरकारसोबत काम करण्यास तयार आहे. परंतु, शासन काही निर्णय चुकीचे घेत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉक्टरांची नव्हे, ‘हेल्दी’ वस्तूंची मागणी कराडॉक्टरांच्या संख्येला घेऊन नेहमीच ओरड होत असते. डॉक्टरांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी करण्यापेक्षा स्वत: निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. शासनाकडे व्यायाम करण्यासाठी उद्याने मागा, सायकली मागा, सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या वस्तूंचा पुरवठा करण्याची मागणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सोयी न देता खेडेगावात कसा जाणार डॉक्टर दिल्लीमध्ये परिचारिकेचे वेतन ६० हजार रुपयांपासून सुरू होते. परंतु ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना केवळ २५ ते ३० हजार मिळतात. यातच शासन सोयीही उपलब्ध करून देत नाही. यामुळे डॉक्टर खेड्यापाड्यात आपली सेवा देण्यास टाळाटाळ करतात. शासनाने यावर विचार करून प्रभावी उपाययोजना अमलात आणणे आवश्यक आहे.