शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सदर उड्डाणपुलावर घाबरण्याची गरज नाही : तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:26 IST

सदर उड्डाणपुलावरील खडबडीत रस्त्यामुळे वाहन चालविताना चालक घाबरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, चालकांना घाबरण्याची गरज नाही. खडबडीत रस्ता हा वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच आवश्यक आहे.

ठळक मुद्देखडबडीत रस्ता वाहनचालकांच्या सुरक्षेसाठीच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर उड्डाणपुलावरील खडबडीत रस्त्यामुळे वाहन चालविताना चालक घाबरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, चालकांना घाबरण्याची गरज नाही. खडबडीत रस्ता हा वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच आवश्यक आहे. अशा रस्त्यावर धावणारी वाहने रस्त्याला पकडून असतात, त्यामुळे वाहन घसरण्याच्या घटना कमी होतात. यासंदर्भात लोकमतने शहरातील तज्ज्ञांशी चर्चा केली. यात तज्ज्ञांनी उड्डाणपुलामुळे होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येवरही काही सल्ले दिले.खडबडीत रस्त्याच्या संदर्भात एमएसआरडीसीचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता जीवन निकोसे म्हणाले की, वाहनांची रस्त्यावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी असे रस्ते बनविले जातात. ते म्हणाले, आरबीआयजवळ होत असलेल्या वाहतुकीच्या समस्येवर माझ्याकडे परफेक्ट सोल्यूशन आहे. पण एनएचएआय, पीडब्ल्यूडी, महामेट्रो, मनपा, महावितरण व वाहतूक पोलीस यांनी साईटवर माझ्यासोबत संयुक्त भेट घ्यावी. एलआयसी चौक ते आरबीआयदरम्यान रस्त्यावरील फूटपाथ तोडल्यास रस्ता मोठा होईल. त्याचबरोबर सिग्नल व्यवस्था करून एलआयसी व आरबीआय चौकातील सिग्नलसोबत सिंक्रोनाईज्ड केल्या जावे. त्यासाठी महावितरणच्या उपकेंद्राच्या काही जागेची गरज पडू शकते. रस्ता अनेक वर्षे मजबूत राहतोवाहन घसरू नये म्हणून खडबडीत रस्ते बनविण्यात येतात. हे रस्ते अनेक वर्षे मजबूत राहतात. गरमीमध्येही या रस्त्यावर वाहनाची पकड चांगली राहते, असे मत व्हीएनआयटीचे ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंगचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विश्रुत लांडगे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, शहरात बनणारे उड्डाणपूल अथवा अन्य विकासकामांमध्ये सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्बन मास ट्रान्सपोर्ट अथॉरिटी बनविण्याची गरज आहे. त्यात मनपा, पीडब्ल्यूडी, एनएचएआय, महामेट्रो, महावितरण, एनएमआरडीएचे अधिकारी सहभागी असावेत. दर महिन्यात बैठक घेऊन अडचणी व समस्यांवर चर्चा होऊ शकते. त्यातून भविष्यात निर्माण होणाºया समस्या सोडविल्या जाऊ शकतात. आरबीआयजवळ उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर बोलताना म्हणाले की, कस्तुरचंद पार्कच्या तीनही बाजूला वन-वे करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या सोडविली जाऊ शकते. वन-वे मुळे वाहनचालकांना फेरा पडेल, मात्र अपघात आणि वाहतुकीचा खोळंबा टाळता येईल. डिझाईनमध्ये फॉल्ट आहेसदर उड्डाणपुलाच्या डिझाईनमध्ये पूर्णत: फॉल्ट आहे. उड्डाणपूल बनविण्यापूर्वी येणाºया समस्यांवर विचार करणे गरजेचे होते. आज वाहतुकीची अडचण निर्माण झाली आहे. कायमस्वरूपी पर्याय शोधण्याची गरज आहे. त्यासाठी पुलाच्या निर्माणापूर्वी वाहतुकीचा सर्व्हे करणे आवश्यक होते. मला वाटते संपूर्ण शहरात वाहतुकीचा सर्व्हे होणे आवश्यक आहे. कारण भविष्यात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. सदर उड्डाणपुलाची समस्या सोडविण्यासाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी व तज्ज्ञांनी संयुक्त बैठक घेऊन पुलाला भेट देणे आवश्यक आहे. अशोक मोखा, आर्किटेक्टवाहतुकीचे नियम पाळल्यास समस्या सुटेलआरबीआयकडून एलआयसी चौकाकडे सरळ न जाता उड्डाणपुलाच्या खालून जात, एलआयसी चौकातून वळण घेतल्यास वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. परंतु वाहन चालक उड्डाणपुलावर चढून यू-टर्न घेऊन एलआयसी चौकाकडे जात आहे. हे चुकीचे आहे, त्यामुळे अपघातही होऊ शकतो. तसेच महामेट्रोद्वारे जयस्तंभ चौक ते आर्मी गेटदरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यासाठी कस्तूरचंद पार्कचे तीन रस्ते वन-वे करणे प्रस्तावित आहे, त्यावर विचार करण्यात येत आहे.चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर