शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

ना नोकरीची शाश्वती, ना जीवाची! विवाहाच्या लगबगीला लागतोय ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आधुनिक जगतात विवाह आता दोन जीवांच्या भावी आयुष्याच्या व्यवहाराचा एक भाग झाला आहे आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आधुनिक जगतात विवाह आता दोन जीवांच्या भावी आयुष्याच्या व्यवहाराचा एक भाग झाला आहे आणि याबाबतीत कुणाचेही दुमत नसेलच. कोरोना संक्रमणामुळे मात्र, या लगबगीला ब्रेक लागत असल्याचे चिन्ह आहेत. अनेकांनी आपले विवाह लांबणीवर ढकलले आहेत. शिक्षण कितीही उच्च असले तरी नोकरीची शाश्वती राहिली नाही. कितीही मोठा व्यवसाय असेल तर त्यात सध्या तरी टिकाव लागेल, हे आश्वासन देता येत नाही आणि जीवाची तर शाश्वती तशीही नव्हतीच आणि कोरोनाच्या धास्तीत तर ती आणखीनच देता येत नाही. अशा स्थितीत अनेकांनी विवाह लांबणीवर ढकलल्याचे दिसून येत आहे.

अनेकांच्या अपेक्षा बदलल्या

परमेश्वराने जन्म दिला तर पोट भरण्याची व्यवस्थाही तोच करतो, अशी भाबडी समज सर्वत्र आहे. नेमका हाच दुवा गृहीत धरत अनेकांनी वर्तमान परिस्थतीचा विचार करत आपल्या अपेक्षांना लगाम लावत, केवळ अनुरूप जोडीदार मिळविण्यावर भर दिला आहे. जसे मुलगा अमुक ठिकाणचाच हवा, नोकरीत पगार एवढाच हवा, नोकरीच्या ठिकाणी त्याचे स्वत:चे घर असावे, कार असावी अशा अपेक्षा आता सौम्य झालेल्या दिसतात.

अनेक जण आपल्या अपेक्षांवर अजूनही ठाम

विवाहासाठी अनेक वर-वधू आपल्या अपेक्षांवर अजूनही ठाम आहेत. उच्च शिक्षण, अपेक्षित पगार मिळेपर्यंत लग्न नको असे म्हणताना आधीच वय वाढलेले आहे. त्यात कोरोनामुळे मागे का हटायचे, असा प्रश्न उपस्थित करत उशीर झाला तरी चालेल, अपेक्षित वर-वधू मिळेपर्यंत लग्न नकोच, या विचारावर अनेक जण ठाम आहेत.

वर्क फ्रॉम होम वाले आणखी थांबण्यास इच्छुक

बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले आहे आणि आगामी काळात हा वेळ आणखी वाढविण्याचा मानस व्यक्त केला जात आहे. याच स्थितीत नुकसान झाल्याने अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळे, वर्क फ्रॉम होम करत असलेले कर्मचारी कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे, विवाहाचा विचार करण्यास ते सध्या तरी तयार नाहीत.

विचारांत कोणताच बदल झालेला नाही

कोरोनामुळे अनेक अडचणी, संकटे अनेकांनी भोगल्या आहेत. मात्र, विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यामुळे, त्याबाबत कुणीच तडजोड करण्यास इच्छुक नाहीत. शिक्षण, नोकरी, पगार, कुटुंब, संस्कृती आणि स्थळाबाबत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्वीप्रमाणेच असल्याचे दिसून येते.

- सुप्रिया केकतपुरे, अनुरूप विवाह संस्था, नागपूर

....................