शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

ना अंकुश, ना कारवाई

By admin | Updated: May 11, 2014 01:26 IST

समाज हिताचे उपक्रम राबविण्यासाठी, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि सरकारच्या उपक्रमांना विश्वासू म्हणून हातभार लावण्यासाठी महाराष्ट्रात

नागपूर : समाज हिताचे उपक्रम राबविण्यासाठी, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि सरकारच्या उपक्रमांना विश्वासू म्हणून हातभार लावण्यासाठी महाराष्ट्रात सार्वजनिक विश्वस्त कायद्याखाली बहुउद्देशीय संस्थांची नोंदणी करण्यात येते. मात्र गेल्या काही वर्षात या संस्थांचे उद्देशच बदलले आहेत. अनेक संस्था आर्थिक व्यवहारात गुंतल्या आहेत. काही संस्थांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहे. मात्र या संस्थांवर कुठलीही कारवाई होत नाही. कोणाचाही अंकुश या संस्थांवर राहिलेला नाही. नागपूरच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयात स्वयंसेवी संस्थांची शेकडो प्रकरणे दररोज हाताळली जातात. नागपूर जिल्ह्यात ४० हजारावर स्वयंसेवी संस्था आहेत. या संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयातून नोंदणी करून, शासनाच्या विविध उपक्रमात सहभागी होतात. शासनाच्या उपक्रमाला सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून, त्याचा लाभ मिळवून देतात. बर्‍याच स्वयंसेवी संस्था आजही चांगले विषय हाताळत आहेत. परंतु काही संस्थांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे या संस्थांवरही अविश्वास व्यक्त केला जातो आहे. केंद्र सरकारच्या जनश्री विमा योजनेची चौकशी सुरू असताना शहरातील आठ स्वयंसेवी संस्थांनी करोडो रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या संस्था एकाच व्यक्तीच्या असून त्यातील पदाधिकारी बनावट आढळले आहे. मृत व्यक्तीलाही पदाधिकारी बनविले असल्याचे निदर्शनास आले आहे. अशी अनेक प्रकरणे पुढे येत असली तरी या संस्थांवर धर्मदाय आयुक्तांकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. महाराष्ट्रात सार्वजनिक विश्वस्त कायद्यांतर्गत दरवर्षी संस्थेचा आर्थिक अहवाल धर्मदाय आयुक्तांना सादर करावा लागतो. मात्र अनेक वर्ष संस्थेचे लेखापरीक्षण होत नाही. संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडले की संस्थेच्या कामाची गती कमी होते. सरकारी अनुदाने वा आश्वासने यावर अवलंबून राहून मोठे प्रकल्प हाती घेणे, विविध तरतुदींचे पालन न होणे, संस्थेतील कार्यकर्त्यांचे आर्थिक व्यवहार संशयास्पद होणे अशी अनेक कारण पुढे येत आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडूनही याविषयी अशा संस्थांना मार्गदर्शन, स्मरणपत्र वा तत्सम विशेष पाठपुरावा झाल्याचे आढळत नाही. त्यामुळे संस्थांची मनमानी सुरू आहे. ज्याला वाटेल तो संस्था उभारून सरकारचा पैसा, जनतेचा पैसा लाटत आहे. (प्रतिनिधी)