शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

बेड नको, किमान औषध तरी द्या ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST

शरद मिरे भिवापूर - भिवापूर तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील काही गावे भिवापूर शहराला लागून ...

शरद मिरे

भिवापूर - भिवापूर तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील काही गावे भिवापूर शहराला लागून आहेत. त्यामुळे तेथील रुग्ण तपासणी व उपचारासाठी भिवापूरला येतात. मात्र, रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्याला औषध न देता ‘तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जा’ असे सांगत त्यांना परत पाठविले जात आहे. अशात ‘आम्हाला बेड नको, फक्त औषध द्या’ ही रुग्णांची आर्त हाक आरोग्य विभागाच्या माणूसकीवर प्रश्न चिन्ह उठविणारी आहे.

मध्यंतरी भिवापूर तालुकास्थळावरील कोविड सेंटरमध्ये तालुक्याबाहेरील व जिल्हाबाहेरील रुग्ण दाखल करून घेतल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर स्थानिक जनमानसात संताप होता. अशातच ऑक्सिजन बेड अभावी जवराबोडी येथील रुग्णाचा मृत्यू झाल्याने हा संताप अधिकच तीव्र झाला. त्यामुळे आरोग्य विभागाने आता तालुक्याबाहेरील व जिल्ह्याबाहेरील रुग्णांना स्थानिक कोविड सेंटरमध्ये प्रवेश नाकारला आहे. बेड अभावी स्थानिक रुग्णांची होणारी ससेहोलपट लक्षात घेता आरोग्य विभागाचा हा निर्णय काही अंशी योग्य असला तरी गृहविलगीकरणातील रुग्ण कुठलाही असो किमान त्याला औषध देणे आवश्यक आहे. भिवापूर वरून अवघ्या पाच ते दहा किमी अंतरावर चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याच्या सीमा प्रारंभ होतात. चंद्रपूर जिल्ह्यातील साठगाव, कोलारी, शंकरपूर, चिचाळा व भंडारा जिल्ह्यातील निलज, आमगाव, भुयार, मेंढेगाव, काकेपार ही गावे भिवापूर शहराला लागून आहे. याऊलट त्यांची तालुकास्थळे २० ते ४० कि.मी. लांब आहे. त्यामुळे सदर गावातील नागरिक छोट्यामोठ्या कामासाठी भिवापूरला दररोज येतात.

कोरोना संसर्गजन्य परिस्थीतीत तपासणी व उपचारासाठी भिवापूर जवळ असल्यामुळे येथील रुग्ण भिवापूरला येत आहे. तपासणीअंती त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ते स्थानिक कोविड सेंटर मध्ये औषधासाठी येतात. मात्र, येथील डॉक्टर त्यांना ‘तुम्ही तुमच्या तालुक्यात व जिल्ह्यात जा’ असा सल्ला देत आहेत. त्यावर 'आम्हाला बेड नको, किमान औषध तरी द्या. औषध उपलब्ध नसेल, तर किमान औषधोपचार तरी लिहून द्या. आम्ही खाजगी मेडिकलमधून औषध विकत घेऊ’ अशी विनंती हे रुग्ण करीत आहेत.

तपासणी करता, मग औषध का देत नाही?

मध्यंतरी तालुकास्थळावरील कोविड सेंटर मध्ये तालुक्या व जिल्ह्याबाहेरील रुग्ण दाखल केल्याने स्थानिक रुग्णांना बेड मिळत नव्हते. याबाबत तक्रारी झाल्या. त्यामुळे आता बाहेरच्या रुग्णांना येथे दाखल करून घेतले जात नाही. सीमावर्ती भागातील रुग्णांची तपासणी मात्र भिवापूर येथे होत आहे. त्यामुळे तपासणी येथे होत असेल तर, पॉझिटिव्ह रुग्णांना औषधी मिळणे आवश्यक आहे. स्कोअर कमी असलेले असे अनेक रुग्ण गृहविलगीकरणात असतात. त्यांना तुम्ही तुमच्या जिल्ह्यात औषधोपचार घ्या, असे म्हणणे हे कितपत योग्य आहे ?