शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात योजनांच्या नावावर धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:08 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात योजनांच्या नावावर अक्षरश: धूळफेक करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या अर्जावर निर्णयच नाही फाईल्स समोर सरकतच नाहीत

आशिष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात योजनांच्या नावावर अक्षरश: धूळफेक करण्यात येत आहे. विद्यार्थी कल्याणअंतर्गत विद्यापीठात १३२ हून अधिक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र विद्यार्थी विकास मंडळाच्या असंवेदनशीलतेमुळे यातील एकाही योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, अगोदर विद्यार्थ्यांना कागदपत्रांसाठी चकरा मारायला लावल्या जातात. सर्व दस्तावेज सादर केल्यानंतरदेखील अनेक वर्ष अर्जांवर काहीच निर्णय घेण्यात येत नाही. काही काळाने फाईल्स धूळ खात असल्याचे दिसून येते. पालक-विद्यार्थ्यांनी विचारपूस केली तर समितीची बैठक झाली नसल्याचे कारण देत परत पाठविण्यात येते. अशा स्थितीमुळे विद्यार्थीच अर्ज करण्यासाठी कचरत आहेत. वास्तविकपणे योजना राबविण्यात व त्याची अंमलबजावणी करण्यात हलगर्जीपणा दाखविल्या जातो. त्यामुळेच अर्जांवर वर्षानुवर्षे निर्णय होऊ शकत नाही.नियमांनुसार अर्ज आल्यानंतर मंडळाने लगेच त्यावर निर्णय घेणे अभिप्रेत आहे. मात्र असे होत नाही. अर्ज कार्यालयातच दोन ते तीन महिने पडला असतो. निर्णय घेणाऱ्या समितीची बैठक बोलविण्यातदेखील विलंब लावला जातो. समितीचा निर्णय झाल्यानंतर फाईल योजनेनुसार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येते. मात्र फाईल तेथेदेखील धूळ खात पडली असते. उर्वरित वित्त व लेखा अधिकारी कार्यालयाकडून पूर्ण करण्यात येते. अनेक विद्यार्थ्यांच्या तर फाईल्सच गायब झाल्या आहेत. याबाबतीत प्रतिक्रियेसाठी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

विद्यापीठाची अशीही असंवेदनशीलताविद्यापीठ विद्यार्थी कल्याण योजनेत विद्यार्थ्यांना वैद्यकीय साहाय्यता निधीदेखील समाविष्ट आहे. मात्र यासाठी येणाºया अर्जांबाबत तर असंवेदनशीलतेचा कळसच गाठण्यात येतो. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रिंकू बंगाले हिची तब्येत खराब झाली. त्यामुळे तिला इस्पितळात दाखल करण्यात आले. विद्यार्थिनीकडून योजनेसाठी एप्रिलमध्ये अर्ज करण्यात आला. आतापर्यंत निर्णय झालेला नाही. तिचे वडील रवींद्र बंगाले एका दुकानात काम करतात. रिंकूचा अद्यापही उपचार सुरू आहे. आतापर्यंत अडीच लाख रुपयांचा खर्च झाला आहे. याचप्रमाणे धनवटे नॅशनल महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैदेही बांते हिचीदेखील तब्येत बिघडली. तिच्यावर उपचारांसाठी लाखोंचा खर्च आला. पालकांनी वैद्यकीय साहाय्यता निधीसाठी आॅगस्टमध्ये अर्ज केला. मात्र अद्यापही निर्णय आलेला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे वैदेही आता या जगात नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ