शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल

By admin | Updated: March 3, 2017 02:23 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पुरातत्व विभागात झालेल्या चोरीप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अखेर नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला.

प्रदीर्घ चौकशी : विद्यापीठातील नाणे चोरी प्रकरण नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पुरातत्व विभागात झालेल्या चोरीप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अखेर नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. विद्यापीठातर्फे विनोद राधेश्याम इलमे (वय ४८) यांनी बुधवारी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागात ठेवलेल्या २६३३ पुरातत्व वस्तू आणि २२४ विष्णुकुंडीय नाणी १० मे २०१६ ला चोरीला गेल्या. चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. या प्रकरणात बरीच उलटसुलट चर्चा झाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी विद्यापीठाने या सर्व मौल्यवान चीजवस्तू गहाळ झाल्याचा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. अंबाझरी पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर गहाळ वस्तूंबाबत गुन्हा कसा दाखल करावा, असा प्रश्न उपस्थित झाला. चौकशीत या वस्तू चोरीला गेल्या असाव्या किंवा कुणी त्याची परस्पर गैरमार्गाने विल्हेवाट लावली असावी, असा संशय निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाला ठोस भूमिका घेण्याची सूचना केली. त्यासंबंधाने पोलिसांकडून विस्तृत पत्रव्यवहार झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे बुधवारी रात्री इलमे यांनी अंबाझरी ठाण्यात चोरीची तक्रार दिली. चोरीला गेलेल्या नाण्यांसोबत उत्खणनात सापडलेल्या प्राचिन चीजवस्तूंचा (मूर्ती, भांडी, हत्यार, विविध वस्तू) समावेश आहे. या तक्रारीवरून ठाणेदार प्रसाद सबनीस यांनी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल झाला. सहायक निरीक्षक सुरोसे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)