शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

कोरोनाकाळात वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:11 IST

- नितीन गडकरी : चैताली बांगरे यांच्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे प्रकाशन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०२० हे वर्ष ...

- नितीन गडकरी : चैताली बांगरे यांच्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २०२० हे वर्ष अनेकार्थाने महत्त्वाचे ठरले. या काळात आपण काहीच करू शकत नव्हतो. अखेर ‘आपल्या कोविड १९सोबत जगण्याची कला विकसित करावी लागेल’ या विश्वासावर पोहोचावे लागले. अशा काळात कोरोना योद्ध्यांसह वृत्तपत्रांनी समाजाचे मार्गदर्शन केले. या काळात तर वृत्तपत्रे समाजाचा आत्मविश्वास वाढवित असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

प्रसिद्ध लेखिका चैताली बांगरे यांनी कोरोना व टाळेबंदीच्या काळातील अनुभवांवर लिहिलेल्या ‘दी २०२० क्वॉरंटाईम’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये पार पडला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी नितीन गडकरी व लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा हे आभासी माध्यमाद्वारे सोहळ्यात सहभागी झाले होते तर व्यासपीठावर प्रख्यात अधिवक्ता फिरदौस मिर्झा व चैताली बांगरे उपस्थित होते.

कोरोना ही एक आपत्ती आहे आणि संक्रमणाची गती आणखी वाढायला लागली आहे. अशा स्थितीत आपत्तीचे रूपांतरण इष्टापत्तीत करण्यासाठी प्रचंड चिंतनाची गरज आहे. समस्या उद्भवल्या तर मार्गही शोधावाच लागतो. आपल्याकडे पीपीई किट नव्हत्या तर नागपुरात निर्माणाच्या संधी शोधून त्याचा पुरवठा केला गेला. सॅनिटायझर हजार रुपये लिटर विकले जात होते. तेव्हा नागपूरच्या शुगर कारखान्यातच अल्कोहोलद्वारे सॅनिटायझर निर्माण करवून ते दीडशे रुपये लिटर पर्यंत सर्वसामान्यांना उपलब्ध करता आले. एकमेकांची मदत करण्याची वृत्ती याच काळात दिसून आली. समाजाची ही शक्ती आपल्या जीवनमूल्यांची देण असल्याची भावना नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

या काळाने वेळेचे महत्त्व कळले आणि नातेवाईक, घर आणि जबाबदारीचे महत्त्व सगळ्यांना कळले. कोरोना हे संकट असले तरी या संकटाने आपुलकीची जाणिवही करवून दिली, अशी भावना विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन आरजे नमन यांनी केले तर आभार विनय पाण्डे यांनी मानले.

............

फोटो ओळी :- ‘दी २०२० क्वॉरंटाईम’चे विमोचन आभासी माध्यमाद्वारे करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा तर व्यासपीठावर लेखिका चैताली बांगरे व ॲड. फिरदौस मिर्झा