शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

नवीन पाणीपुरवठा योजना रखडली

By admin | Updated: April 17, 2017 02:15 IST

नरखेड तालुक्यातील बेलोना येथील नागरिकांना एप्र्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

बेलोन्यात पाणीसमस्या : आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बेलोना : नरखेड तालुक्यातील बेलोना येथील नागरिकांना एप्र्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. परिणामी, गावात आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बेलोना येथे एकूण पाच वॉर्ड असून, लोकसंख्या सहा हजाराच्या आसपास आहे. पाणीटंचाई बेलोनावासीयांसाठी नवीन नाही. ही समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी वारंवार मागणी केल्याने, दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नवीन योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत करावयाच्या कामांसाठी ९५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली. या कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते दोन वर्षात पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे या नवीन योजनेचा नागरिकांना उपयोग होत नाही. गावात हॅण्डपंप, सार्वजिक विहिरी व खासगी विहिरी आहेत. परंतु वाढत्या तापमानामुळे गावातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी नळ योजनेवर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नाही. पाणीपुरवठ्याच्या विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावाला सध्या आठवड्यातून दोनदा १० ते १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. त्यातच गावातील काही नागरिक नळाला टिल्लूपंप लावत असल्याने, अर्ध्या गावातील नागरिकांना आठवड्यातून दोनदा गुंडभर पाणी मिळत नाही. या प्रकाराबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या, परंतु कुणीही कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. यावर उपाय म्हणून नागरिकांना शेतातून डोक्यावर किंवा बैलगाडीने पाणी आणावे लागते. (प्रतिनिधी)