शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

नवीन पाणीपुरवठा योजना रखडली

By admin | Updated: April 17, 2017 02:15 IST

नरखेड तालुक्यातील बेलोना येथील नागरिकांना एप्र्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

बेलोन्यात पाणीसमस्या : आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बेलोना : नरखेड तालुक्यातील बेलोना येथील नागरिकांना एप्र्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. परिणामी, गावात आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बेलोना येथे एकूण पाच वॉर्ड असून, लोकसंख्या सहा हजाराच्या आसपास आहे. पाणीटंचाई बेलोनावासीयांसाठी नवीन नाही. ही समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी वारंवार मागणी केल्याने, दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नवीन योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत करावयाच्या कामांसाठी ९५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली. या कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ते दोन वर्षात पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे या नवीन योजनेचा नागरिकांना उपयोग होत नाही. गावात हॅण्डपंप, सार्वजिक विहिरी व खासगी विहिरी आहेत. परंतु वाढत्या तापमानामुळे गावातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी नळ योजनेवर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतर नाही. पाणीपुरवठ्याच्या विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याने गावाला सध्या आठवड्यातून दोनदा १० ते १५ मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. त्यातच गावातील काही नागरिक नळाला टिल्लूपंप लावत असल्याने, अर्ध्या गावातील नागरिकांना आठवड्यातून दोनदा गुंडभर पाणी मिळत नाही. या प्रकाराबाबत ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या, परंतु कुणीही कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. यावर उपाय म्हणून नागरिकांना शेतातून डोक्यावर किंवा बैलगाडीने पाणी आणावे लागते. (प्रतिनिधी)