शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

अतिक्रमणाला रोखण्यासाठी नवा फॉर्म्युला

By admin | Updated: May 28, 2017 02:05 IST

उपराजधानी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. फुटपाथच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.

दररोजच्या कारवाईचा आढावा : पथकाचा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. फुटपाथच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक कारवाई केल्यानंतर पथक माघारी फिरताच पुन्हा अतिक्रमण केले जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता महापालिके ने नवीन फॉर्म्युला अमलात आणला आहे. यात कारवाईसोबतच दंड स्वरुपात पथकाचा खर्च अतिक्रमण करणाऱ्यांकडून वसूल केला जात आहे. सध्या प्रायोगिक स्वरुपात ही कारवाई सुरू आहे. परंतु या स्वरुपाच्या कारवाईला लवकरच व्यापक स्वरुप दिले जाणार आहे. कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितावर पुन्हा दंड आकारला जाणार आहे. अश्विन मुद्गल यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराच्या विविध भागाचा दौरा केला. फुटपाथ, रस्ता दुभाजक व सार्वजनिक ठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काहींनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील जागेवर अतिक्र मण करून शेड उभारले आहे. यामुळे फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. याची दखल घेत आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर दररोजच्या कारवाईचा अहवाल व वसूलण्यात येणाऱ्या दंडाची माहिती सादर करण्याचे निदेश दिले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्याकडे अतिक्रमण विभागाची जबाबदारी सोपविण्या आली आहे. माजी आयुक्त संजीव जयस्वाल व श्याम वर्धने यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक मोठ्या अतिक्रमणांचा सफाया केला होता. अतिक्रमण कारवाईचा दररोज अहवाल मागितला जात आहे. तसेच दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती कुंभारे यांनी दिली. उद्दिष्ट निश्चित करण्याची गरज अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशैलीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याला कारणेही आहेत. पथक कारवाईसाठी पोहचण्यापूर्वीच अतिक्रमण करणारे बेपत्ता होतात. अतिक्रमण करणारे व पथकातील कर्मचारी यांच्यातील संबंधामुळे हा प्रकार घडतो. वरिष्ठांना याची माहिती नसते. त्यामुळे हा नवीन फॉर्म्युला अमलात आणला जाणार आहे. हा पर्याय प्रभावी ठरू शकतो. परंतु यासाठी प्रत्येक पथकाला उद्दिष्ट देण्याची गरज आहे.