शहरं
Join us  
Trending Stories
1
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
5
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
6
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
7
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
8
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
9
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
10
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
11
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
12
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
13
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
14
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
15
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
16
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
17
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
18
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
19
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
20
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाला रोखण्यासाठी नवा फॉर्म्युला

By admin | Updated: May 28, 2017 02:05 IST

उपराजधानी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. फुटपाथच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.

दररोजच्या कारवाईचा आढावा : पथकाचा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. फुटपाथच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक कारवाई केल्यानंतर पथक माघारी फिरताच पुन्हा अतिक्रमण केले जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता महापालिके ने नवीन फॉर्म्युला अमलात आणला आहे. यात कारवाईसोबतच दंड स्वरुपात पथकाचा खर्च अतिक्रमण करणाऱ्यांकडून वसूल केला जात आहे. सध्या प्रायोगिक स्वरुपात ही कारवाई सुरू आहे. परंतु या स्वरुपाच्या कारवाईला लवकरच व्यापक स्वरुप दिले जाणार आहे. कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितावर पुन्हा दंड आकारला जाणार आहे. अश्विन मुद्गल यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराच्या विविध भागाचा दौरा केला. फुटपाथ, रस्ता दुभाजक व सार्वजनिक ठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काहींनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील जागेवर अतिक्र मण करून शेड उभारले आहे. यामुळे फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. याची दखल घेत आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर दररोजच्या कारवाईचा अहवाल व वसूलण्यात येणाऱ्या दंडाची माहिती सादर करण्याचे निदेश दिले आहे. अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्याकडे अतिक्रमण विभागाची जबाबदारी सोपविण्या आली आहे. माजी आयुक्त संजीव जयस्वाल व श्याम वर्धने यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक मोठ्या अतिक्रमणांचा सफाया केला होता. अतिक्रमण कारवाईचा दररोज अहवाल मागितला जात आहे. तसेच दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती कुंभारे यांनी दिली. उद्दिष्ट निश्चित करण्याची गरज अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशैलीवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याला कारणेही आहेत. पथक कारवाईसाठी पोहचण्यापूर्वीच अतिक्रमण करणारे बेपत्ता होतात. अतिक्रमण करणारे व पथकातील कर्मचारी यांच्यातील संबंधामुळे हा प्रकार घडतो. वरिष्ठांना याची माहिती नसते. त्यामुळे हा नवीन फॉर्म्युला अमलात आणला जाणार आहे. हा पर्याय प्रभावी ठरू शकतो. परंतु यासाठी प्रत्येक पथकाला उद्दिष्ट देण्याची गरज आहे.