शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांकडून हलगर्जी; निकालांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बहुतांश उन्हाळी परीक्षा आटोपली असून, काही अभ्यासक्रमांतील ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बहुतांश उन्हाळी परीक्षा आटोपली असून, काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना तर अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा आहे. ‘ऑनलाइन’ परीक्षा होऊनदेखील महाविद्यालयांच्या हलगर्जीमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. काही महाविद्यालयांकडून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठविण्यास उशीर होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर विद्यापीठाने साडेपाचशेहून अधिक अभ्यासक्रमांच्या थेट वेबबेस्ड परीक्षा घेतल्या. यात विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश होता. काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळ्यांमुळे नियोजित कालावधीत पेपर देता आले नाही. त्यांच्यासाठी विद्यापीठाने फेरपरीक्षादेखील घेतल्या. ‘ऑनलाइन’ परीक्षा झाल्याने लवकर निकाल लागतील, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती; मात्र काही अभ्यासक्रमांतील विद्यार्थी प्रतीक्षेतच आहेत.

साडेपाचशेपैकी विद्यापीठाने आतापर्यंत ७१ निकालच घोषित केले आहेत. यात बहुतांश निकाल हे अंतिम सत्र किंवा अंतिम वर्षांचे आहेत. निकालांना नेमका उशीर का होत आहे, याची चाचपणी केली असता महाविद्यालयांच्या वेळकाढूपणाचा फटका बसल्याची बाब समोर आली. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सत्रातील एकूण कामगिरीवरून अंतर्गत मूल्यमापन करायचे होते. यात सेशनल परीक्षा तसेच तोंडी परीक्षांची कामगिरीदेखील विचारात घ्यायची होती. हे गुण विद्यापीठाला ‘ऑनलाइन’ माध्यमातूनच पाठवायचे होते; परंतु काही महाविद्यालयांनी ‘ऑनलाइन’ गुण विद्यापीठाला पाठविलेच नाही. त्यामुळे ‘ऑनलाइन’ परीक्षेचे गुण असूनदेखील विद्यापीठाला निकाल लावता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिकारी करत आहेत विनंती

यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना संपर्क केला असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिला. काही महाविद्यालयांकडून वेळेत गुण येत नसल्याने अडचण होत आहे. परीक्षा विभागातील अधिकारी महाविद्यालयांना व्यक्तिश: संपर्क करून अक्षरश: गुण पाठविण्याची विनंती करत असल्याची माहिती त्यांनी दिली. अंतिम सत्र व अंतिम वर्षाचे निकाल लावणे अत्यावश्यक आहे. जर वेळेत निकाल लागले नाही तर विद्यार्थ्यांची उच्चशिक्षण किंवा रोजगाराची संधी हातातून निसटण्याची शक्यता आहे.