शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

खरा इतिहास शोधण्याची गरज

By admin | Updated: January 20, 2015 01:19 IST

भारताला बुद्ध संस्कृतीच्या रूपात वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. परंतु यापैकी बहुतांश इतिहास हा जाणीवपूर्व दडपण्यात आला असून भारताच्या वैभवशाली इतिहासाची माहिती करून घ्यायची

रत्नावली प्रवचनमाला : धम्मचारी सुभूती यांचे प्रतिपादन नागपूर : भारताला बुद्ध संस्कृतीच्या रूपात वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. परंतु यापैकी बहुतांश इतिहास हा जाणीवपूर्व दडपण्यात आला असून भारताच्या वैभवशाली इतिहासाची माहिती करून घ्यायची असेल तर भारताचा खरा इतिहास शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इंग्लंडचे रहिवासी असलेले त्रिरत्न बौद्ध महासंघाचे ज्येष्ठ धम्मचारी सुभूती यांनी आज येथे केले. त्रिरत्न बुद्ध महासंघाच्या नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवांतर्गत सोमवारी रत्नावली प्रवचनमालेस सुरुवात करण्यात आली. या प्रवचनमालेतील पहिले पुष्प गुंफतांना धम्मचारी सुभूती यांनी महान बौद्ध विद्वान असंग व वसुबंधू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. मैत्रीवीर नागार्जुन यांनी अनुवाद केला. नागकेतू यांनी भूमिका विषद केली. धम्मचारी सुभूती म्हणाले, प्राचीन भारतात महान बौद्ध आचार्य असंग आणि वसुबंधू होऊन गेलेत. परंतु त्यांच्या जीवनाविषयी भारतीय इतिहासामध्ये फारसे लिहिल्याच गेले नाही. कारण इतिहास केवळ त्याच लोकांनी लिहिले जे जिंकले. बुद्धांची महान संस्कृती अशाच अनुल्लेखाने गाडल्या गेली. त्यामुळेच या दोन्ही महान आचार्यांबाबत आपल्याला फारशी माहिती नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये या महान आचार्यांसंबधी संदर्भ सापडतात. आचार्य असंग आणि वसुबंधू यांच्याबाबत जी काही माहिती आज उपलब्ध आहे, ती त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमुळे. परंतु ते मौलिक ग्रंथ भारतात नसून तिबेट आणि चीनमध्ये त्यांच्या भाषेत भाषांतरित करून जतन करून ठेवण्यात आले आहे. या दोन्ही देशात शेकडो वर्षांपासून हे ग्रंथ आजही सुरक्षित आहेत. भारत मात्र ही मौलिक ग्रंथसंपदा गमावून बसला आहे. असंग आणि वसुबंधू हे चौथ्या शतकात गुप्त काळात होऊन गेलेले महान आचार्य आहेत. तेव्हा समुद्रगुप्त यांचे राज्य होते. समुद्रगुप्ताचे राज्य तेव्हा अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत पसरलेले होते. हे दोन्ही बंधू राजदरबारी होते. परंतु आपल्या मुलांनी बुद्धांच्या संघात सामील व्हावे, अशी तिची इच्छा होती. ती इच्छा तिने पूर्ण केली. दोन्ही बंधू बुद्धाच्या संघात सामील झाले. अनेक वर्षे त्यांनी धम्माचा अभ्यास केला. परंतु केवळ अभ्यासच केला नाही, तर अनेक नवीन गोष्टी सुद्धा निर्माण केल्यात. पुढे हे दोन्ही बंधू आचार्य असंग आणि बसुबंधू हे महान तत्त्वज्ञ म्हणून जगात प्रसिद्ध झाले. त्यांच्या ग्रंथांचे तिबेटी व चीनी भाषेसह अनेक देशांनी आपापल्या भाषेत भाषांतर केले, ते ग्रंथ आजही त्यांनी जपून ठेवले आहेत. तिबेटमध्ये त्यांचे ग्रंथ हे अतिशय पवित्र मानले जातात. परंतु भारतातील या महान आचार्यांबाबत भारतीयांनाच माहिती नाही, ही शोकांतिकाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)