शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

राष्ट्रीय मिरगी दिन: 'मिरगी लपवू नका, वेळेवर औषधोपचार घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 03:34 IST

चंद्रशेखर मेश्राम यांचा सल्ला, भारतात एक कोटी २० लाख लोक आजाराने पिडीत

नागपूर : ज्युलियस सिझर, चार्ल्स डिकन, नेपोलियन, वॅन गॉग, अल्फ्रेड नोबेल, अगाथा क्रिस्टी, लुई कॅरॉल, टोनी ग्रेग, क्रिकेटर जॉन्टी गेड्स जगातील या प्रसिद्ध लोकांना मिरगीचा (फिट येणे) आजार होता. त्यांनी या आजारावर यशस्वी मात केली. यामुळे मिरगीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. मिरगी किंवा अ‍ॅपिलेप्सी असल्यास किंवा त्याचा संशय असल्यास लपवू नका, योग्य डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्या. नियमीत आणि योग्य औषधोपचार घेतल्यास हा रोग बरा होतो, असा सल्ला प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट व ट्रॉपीकल न्यूरॉलाजीचे जागतिक अध्यक्ष डॉ. मेश्राम यांनी दिला.१७ नोव्हेंबर हा दिवस राष्टÑीय मिरगी दिन म्हणून पाळला जातो, त्या निमित्ताने डॉ. मेश्राम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जगात पाच कोटींपेक्षा जास्त लोक मिरगीच्या आजाराने पिडीत आहेत. दरवर्षी यामध्ये २४ लाख रुग्णांची भर पडते. भारतामध्ये साधारण १ कोटी २० लाख लोक मिरगीने ग्रस्त आहेत. ८० टक्के लोक हे गरीब आणि मध्यम आर्थिक संपन्न असलेल्या देशांमध्ये आढळून येतात. या आजाराचे योग्य निदान होणे अतिशय आवश्यक आहे. कारण, मिरगी सारखी लक्षणे असणारे परंतु मिरगी नसणारेही काही आजार आहेत.परत-परत मिरगीचे अटॅक येण्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. रुग्ण औषध घेत नसेल, किंवा आपला आजार, त्रास कमी झाला असे समजून औषधे घेण्याचे टाळत असेल तर ते धोकादायक ठरू शकते. घरी कार्यक्रम असल्यास किंवा सणवार असल्यास मिरगी असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळीच्या दिवसांत हवा प्रदूषित होते, आवाजाचे प्रदूषण वाढते, आहारात बदल होत असल्यानेही अटॅक येण्याचे शक्यता किंवा प्रमाण वाढते. झोप कमी होण्यामुळे अटॅक येण्याचा धोका वाढतो.योग्य औषधोपचाराने ८० टक्के आजारा बरा होतोमागील काही वर्षांमध्ये बरेच नवीन संशोधन झाले. काही शोध सुरू आहेत. नवीन औषधे आलीत. या औषधांमध्ये ‘साईड इफेक्ट’ही कमी आहेत. ज्या रुग्णांमध्ये झटके थांबत नाही त्यांच्यातील एक व दोन टक्के रुग्णांमध्ये शस्त्रक्रियांचा पर्याय असतो. योग्य डॉक्टराचा सल्ला, योग्य आहार, नियमीत औषधोपचाराने ८० टक्के रुग्णांमध्ये मिरगीचा आजार बरा होऊ शकतो आणि ते सामान्य जीवन जगू शकतात, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.