शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नंदलाल कमिटीची पुन्हा टांगती तलवार : नागपूर मनपा प्रशासनात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 20:56 IST

भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याची प्रक्रिया करणारी कंपनी हंजर बायोटेकची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता २० वर्षांपूर्वी मनपात झालेल्या क्रीडा साहित्य घोटाळ्याच्या संबंधी नंदलाल कमिटीच्या चौकशीनंतर काय पावले उचलण्यात आली, याची माहिती मागवण्यात आली आहे.

ठळक मुद्देविधानसभेतील लक्षवेधीने हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकामागोमाग एक झटके देत आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याची प्रक्रिया करणारी कंपनी हंजर बायोटेकची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता २० वर्षांपूर्वी मनपात झालेल्या क्रीडा साहित्य घोटाळ्याच्या संबंधी नंदलाल कमिटीच्या चौकशीनंतर काय पावले उचलण्यात आली, याची माहिती मागवण्यात आली आहे.विधानसभा सदस्य राजुऱ्याचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्यासह इतर काही सदस्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारा हा मुद्दा उपस्थित केला आहे. नागपूर महापालिकेत १९९७ ते २००० या कालावधीत क्रीडा साहित्य घोटाळा झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यावेळच्या राज्य सरकारने २००१ मध्ये नंदलाल कमिटी स्थापन केली होती. या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर होते. सध्या ते विधानसभेत विरोधी पक्ष नेते आहेत. २७ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून सुभाष धोटे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यानुसार प्रश्न विचारले आहे. लक्षवेधी सूचनेमध्ये काँग्रेस सदस्यांमार्फत असे आरोप लावण्यात आले आहे की, क्रीडा घोटाळ्यात नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी झाली आहे. दोषी अधिकारी व नगरसेवकांवर कारवाई केली नाही. तसेच संबंधितांकडून निधीसुद्धा वसूल केलेला नाही. यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, २० वर्षांपूर्वी झालेल्या या प्रकरणाची चौकशी झाली आहे. २००१ ते २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस सत्तेत होते. तेव्हा त्यांनी कारवाई करायला हवी होती. आता हे प्रकरण पुन्हा उकरून काढणे म्हणजे खालच्या पातळीचे राजकारण करणे होय.१०२ नगरसेवक ठरले होते दोषी१९९७ ते २००० या कालावधीत नगरसेवकांनी क्रीडा साहित्य खरेदी करून ते वितरित केले होते. यातील बहुतांश साहित्यांचे वाटप केवळ कागदांवरच झाले होते. या प्रकरणात घोटाळ्याचा आरोप झाला होता. तेव्हा तत्कालीन राज्य सरकारने मनपातील तत्कालीन भाजप सरकारला बरखास्त करून प्रशासक नियुक्त केले होते. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी नंदलाल कमिटी गठित केली होती. कमिटीने चौकशी केली. चौकशीत १०२ नगरसेवकांना दोषी ठरवण्यात आले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते तुरुंगातही गेले होते. कमिटीने ५० इंजिनियर्सलाही दोषी ठरवले होते. संबंधितांकडून ८ कोटी रुपयांची वसुली करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले होते. विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लसक्षवेधी सूचनेद्वारा समितीने केलेल्या सिफारशीनुसार कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार