शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

नागपूर रात्रभर जागणार!

By admin | Updated: July 1, 2016 03:05 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नाईटलाईफला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार नवीन आदर्श गुमास्ता कायद्यांतर्ग

थिएटर, हॉटेल्स, दुकाने, बँका अहोरात्र खुली राहणार : व्यावसायिकांचा फायदानागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी नाईटलाईफला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार नवीन आदर्श गुमास्ता कायद्यांतर्गत थिएटर, हॉटेल्स, दुकाने, बँकांना अहोरात्र उघडी ठेवण्यात मुभा मिळणार आहे. या निर्णयामुळे रस्त्यांवर चहलपहल वाढून नागपूर रात्रभर जागणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची उलाढाल वाढून तरुण-तरुणींसाठी रोजगाराच्या अनेकविध संधी उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाचे विविध सामाजिक संघटना आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे.शासनाच्या महसुलात वाढ होणारसर्व प्रतिष्ठाने अहोरात्र सुरू राहणार असल्यामुळे व्यावसायिकांची उलाढाल वाढून शासनाच्या तिजोरीत कर स्वरूपातील महसुलात वाढ होईल. त्याचा राज्याच्या विकासात हातभार लागणार आहे. एवढेच नव्हे तर विजेची मागणी वाढल्यामुळे महावितरणला फायदा होणार आहे. एकंदरीत पाहता या निर्णयामुळे उलाढालीच्या आधारावर शासनाचा महसूल वाढणार आहे. पोलिसांची जबाबदारी वाढणारप्रत्येक घडामोडीला चांगली अन् वाईट अशा दोन बाजू असतात. काही नुकसान होते तर काही फायदेही होतात. रात्रभर दुकाने, मॉल्स, बँका तसेच इतर आस्थापना उघड्या राहिल्याने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध असतील. मात्र, सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित होईल. पोलिसांना अधिक सतर्कपणे काम करावे लागेल, असे मत निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. अंकुश धनविजय यांनी व्यक्त केले. अनेकदा रस्त्यावर वर्दळ दिसली की गुन्हेगार गुन्हा करण्याची हिंमत दाखवत नाही. ‘नाईट लाईफ’मुळे रस्त्यावर वर्दळ वाढेल. रोजगाराच्या नवीन संधीकेंद्राच्या निर्णयामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. दोन पाळीत काम करून अनेकांना उत्पन्न वाढविता येणार आहे. याशिवाय तरुण-तरुणींना शिक्षणासोबतच उत्पन्नासाठी रोजगाराची द्वारे खुली होणार आहे. तरुणांना रेस्टॉरंट, दुकाने, थिएटर, मॉल या ठिकाणी रात्री १० ते सकाळी ६ आणि फावल्या वेळात रोजगार मिळणार आहे. व्यावसायिकांची उलाढाल वाढणाररेस्टॉरंट, दुकाने, मॉल रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. पण आता आदर्श गुमास्ता कायद्यामुळे सर्व प्रतिष्ठाने अहोरात्र सुरू राहतील. त्यामुळे व्यावसायिकांची उलाढाल वाढणार आहे. एखाद्याला दुपारी खरेदी शक्य न झाल्यास त्याला रात्री खरेदी करता येईल. त्यामुळे मॉल संस्कृती वाढणार असून त्याचा ग्राहकांना निश्चितच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे गोदामे आणि पॅकेजिंगचे काम चालणाऱ्या ठिकाणी रात्रीच्या वेळात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. महिलांनाही रात्रपाळीत काम करता येणार आहे.