शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; ‘कोरोना’मुळे शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:50 IST

‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठळक मुद्देमूल्यांकन वेळेत करण्याचे राहणार मोठे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यास काही कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत पुढे ढकललेल्या परीक्षा व नियमित परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर निकालदेखील उशीरा येतील. त्याचा फटका पुढील सत्राच्या प्रवेशप्रक्रियेला बसू शकतो. त्यामुळे एकूणच शैक्षणिक ‘कॅलेंडर’ बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.‘कोरोना’संदर्भात राज्य शासनाच्या निर्देशांनंतर नागपूर विद्यापीठाने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे साधारणत: एक लाख विद्यार्थ्यांच्या १८७ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. १ एप्रिलपासूनचे पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार होते. ३ एप्रिलपासून तर विद्यापीठाचा परीक्षांचा सर्वात मोठ ा टप्पा सुरू होणार होता.. सुमारे २८३परीक्षांना २ लाख १० हजार विद्यार्थी बसणार होते . त्यात बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी. ई., एम.टेक. (पुर वणी) व एम.ए. यांसारख्या प्रमुख व नियमित परीक्षांचा समावेश होता. आता विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. आतापर्यंत एकूण विद्यापीठाने साधारणत: साडेचारशेहून परीक्षा पुढे ढकलल्या असून यात ३ लाख विद्यार्थी सहभागी होणार होते.जर १४ एप्रिलपर्यंत परिस्थिती सुरळीत झाली व ‘लॉकडाऊन’ उठला तरी विद्यापीठाला त्वरित परीक्षा आयोजित करता येणार नाहीत. साधारणत: २३ ते २५ एप्रिलपासूनच परीक्षा घेता येतील. दरवर्षी विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा जुलैपर्यंत चालतात. यंदा त्या जूनपर्यंतच होणार होत्या. त्यामुळे विद्यापीठाकडे एक महिन्याचा ‘बफर’ वेळ होता. परंतु ‘कोरोना’मुळे आता परीक्षा उशीरापर्यंच चालतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मूल्यांकन व पर्यायाने निकालांनादेखील उशीर होईल.विद्यापीठाच्या ‘अ‍ॅकेडॅमिक कॅलेंडर’नुसार शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून सुरुवात होते. तर जुलैमध्ये प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशांना सुरुवात होते. मात्र निकाल उशीरा लागले तर प्रवेशप्रक्रियादेखील लांबेल. अशा स्थितीत त्याचा फटका हिवाळी परीक्षांना बसू शकतो. त्यामुळे संपूर्ण ‘अ‍ॅकेडॅमिक कॅलेंडर’ कोलमडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.मूल्यांकन वेगाने पार पाडण्यावर भरउन्हाळी परीक्षा नेमक्या कधी सुरू होतील हे सर्व ‘लॉकडाऊन’ कधी उठेल यावर अवलंबून आहे. जर १४ एप्रिलला ‘लॉकडाऊन’ उठला तरी लगेच परीक्षा सुरू करणे शक्य नाही. एकूण प्रक्रियेला आठवडाभर वेळ लागेल व २५ एप्रिलनंतरच परीक्षा घेता येतील. मूल्यांकन जास्तीत जास्त वेगाने पार पाडण्याचा आमचा प्रयत्न असेल असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ