शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

नागपुरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:36 IST

लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.फळांचे भाव लॉकडाऊनपूर्वी (कि़ रु.)         लॉकडाऊननंतर (कि़ रु)सफरचंद १८० ते २००                                २०० ते २२०मोसंबी ५० ते ६०                                      ६० ते ८०डाळिंब १४० ते १६०                                   १६० ते १८०संत्री (डझन) ५० ते ७०                            ६० ते ८०पायनॅपल ५० ते ६०                                 ४० ते ५०पपई ४० ते ५०                                        ३० ते ४०केळी (डझन) ४० ते ५०                          ४० ते ५०या कारणांमुळे वाढले भावलॉकडाऊनपूर्वी ठोक बाजारात टोमॅटोची आवक जास्त होती. भाव ५ रुपये किलो होते. किरकोळ बाजारात ७ ते १५ रुपयांपर्यंत विक्री व्हायची. कमी भावामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची माल वाहतूक परवडत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतातच नष्ट केला. शिवाय पुन्हा लागवडही केली नाही. लॉकडाऊननंतर आवक अल्पशी असल्याने किरकोळमध्ये भाव ६० ते ७० रुपयांपर्यत पोहोचले आहेत.लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना हक्काचा बाजार उपलब्ध नव्हता. त्यामुळे शहरातच्या विविध बाजारात कमी किमतीत माल विकून शेतकरी गावाकडे परत जायचे. जवळपास अडीच महिने शेतकऱ्यांना तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागली. आता लागवड कमी असल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत.लिंबाच्या भावातही वाढकोरोनावर मात करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबूचा रस रोज पिण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्याने प्रत्येकाने लिंबाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्यामुळे एरवी १० रुपयांत ४ नग मिळणारे लिंबू ५ रु. वा १० रुपये नगाप्रमाणे विकले गेले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.सध्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे नियोजन कोलमडले आहे.संपदा सोनी, गृहिणी.कोरोनामुळे बाहेरच्या राज्यातून फळांची आवक कमी आहे. त्यामुळे विक्रेत्यांना जास्त भावात खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे फळांचे भाव वाढले आहेत.दुर्गाप्रसाद चौधरी, फळांचे व्यापारी.स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक थांबल्याने कळमन्यातून जास्त भावात भाज्यांची खरेदी करून किरकोळमध्ये विक्री करावी लागत आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत.संतोष लांबट, भाजीपाला विक्रेते.खरीपाच्या हंगामात शेतकरी गुंतल्याने भाज्यांची लागवड कमी केली. आता पेरणी आटोपली असून भाज्यांची लागवड सुरू झाली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये भाज्या बाजारात येतील.कवडू आंबटकर, शेतकरी.मुसळधार पावसाने कोथिंबीर खराबमान्सूनच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कोथिंबीर खराब झाले. त्यामुळे बाजारात आवक अल्प झाल्याने भाव वाढले. २५ ते ३० रुपये किलोचे कोथिंबीर ५० रुपयांवर पोहोचले. नवीन कोथिंबीर येण्यास दोन महिने लागतील. सध्या नाशिक व संगमनेर येथून आवक सुरू आहे.

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई