शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

नागपुरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:36 IST

लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.फळांचे भाव लॉकडाऊनपूर्वी (कि़ रु.)         लॉकडाऊननंतर (कि़ रु)सफरचंद १८० ते २००                                २०० ते २२०मोसंबी ५० ते ६०                                      ६० ते ८०डाळिंब १४० ते १६०                                   १६० ते १८०संत्री (डझन) ५० ते ७०                            ६० ते ८०पायनॅपल ५० ते ६०                                 ४० ते ५०पपई ४० ते ५०                                        ३० ते ४०केळी (डझन) ४० ते ५०                          ४० ते ५०या कारणांमुळे वाढले भावलॉकडाऊनपूर्वी ठोक बाजारात टोमॅटोची आवक जास्त होती. भाव ५ रुपये किलो होते. किरकोळ बाजारात ७ ते १५ रुपयांपर्यंत विक्री व्हायची. कमी भावामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची माल वाहतूक परवडत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतातच नष्ट केला. शिवाय पुन्हा लागवडही केली नाही. लॉकडाऊननंतर आवक अल्पशी असल्याने किरकोळमध्ये भाव ६० ते ७० रुपयांपर्यत पोहोचले आहेत.लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना हक्काचा बाजार उपलब्ध नव्हता. त्यामुळे शहरातच्या विविध बाजारात कमी किमतीत माल विकून शेतकरी गावाकडे परत जायचे. जवळपास अडीच महिने शेतकऱ्यांना तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागली. आता लागवड कमी असल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत.लिंबाच्या भावातही वाढकोरोनावर मात करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबूचा रस रोज पिण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्याने प्रत्येकाने लिंबाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्यामुळे एरवी १० रुपयांत ४ नग मिळणारे लिंबू ५ रु. वा १० रुपये नगाप्रमाणे विकले गेले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.सध्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे नियोजन कोलमडले आहे.संपदा सोनी, गृहिणी.कोरोनामुळे बाहेरच्या राज्यातून फळांची आवक कमी आहे. त्यामुळे विक्रेत्यांना जास्त भावात खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे फळांचे भाव वाढले आहेत.दुर्गाप्रसाद चौधरी, फळांचे व्यापारी.स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक थांबल्याने कळमन्यातून जास्त भावात भाज्यांची खरेदी करून किरकोळमध्ये विक्री करावी लागत आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत.संतोष लांबट, भाजीपाला विक्रेते.खरीपाच्या हंगामात शेतकरी गुंतल्याने भाज्यांची लागवड कमी केली. आता पेरणी आटोपली असून भाज्यांची लागवड सुरू झाली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये भाज्या बाजारात येतील.कवडू आंबटकर, शेतकरी.मुसळधार पावसाने कोथिंबीर खराबमान्सूनच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कोथिंबीर खराब झाले. त्यामुळे बाजारात आवक अल्प झाल्याने भाव वाढले. २५ ते ३० रुपये किलोचे कोथिंबीर ५० रुपयांवर पोहोचले. नवीन कोथिंबीर येण्यास दोन महिने लागतील. सध्या नाशिक व संगमनेर येथून आवक सुरू आहे.

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई