शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:36 IST

लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी लागवड करीत आहेत. या कारणामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.फळांचे भाव लॉकडाऊनपूर्वी (कि़ रु.)         लॉकडाऊननंतर (कि़ रु)सफरचंद १८० ते २००                                २०० ते २२०मोसंबी ५० ते ६०                                      ६० ते ८०डाळिंब १४० ते १६०                                   १६० ते १८०संत्री (डझन) ५० ते ७०                            ६० ते ८०पायनॅपल ५० ते ६०                                 ४० ते ५०पपई ४० ते ५०                                        ३० ते ४०केळी (डझन) ४० ते ५०                          ४० ते ५०या कारणांमुळे वाढले भावलॉकडाऊनपूर्वी ठोक बाजारात टोमॅटोची आवक जास्त होती. भाव ५ रुपये किलो होते. किरकोळ बाजारात ७ ते १५ रुपयांपर्यंत विक्री व्हायची. कमी भावामुळे शेतकऱ्यांना टोमॅटोची माल वाहतूक परवडत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतातच नष्ट केला. शिवाय पुन्हा लागवडही केली नाही. लॉकडाऊननंतर आवक अल्पशी असल्याने किरकोळमध्ये भाव ६० ते ७० रुपयांपर्यत पोहोचले आहेत.लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना हक्काचा बाजार उपलब्ध नव्हता. त्यामुळे शहरातच्या विविध बाजारात कमी किमतीत माल विकून शेतकरी गावाकडे परत जायचे. जवळपास अडीच महिने शेतकऱ्यांना तोटा सहन करून भाज्यांची विक्री करावी लागली. आता लागवड कमी असल्याने भाज्यांचे भाव वधारले आहेत.लिंबाच्या भावातही वाढकोरोनावर मात करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबूचा रस रोज पिण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्याने प्रत्येकाने लिंबाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्यामुळे एरवी १० रुपयांत ४ नग मिळणारे लिंबू ५ रु. वा १० रुपये नगाप्रमाणे विकले गेले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.सध्या बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी असल्याने किरकोळ बाजारात भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे महिन्याचे नियोजन कोलमडले आहे.संपदा सोनी, गृहिणी.कोरोनामुळे बाहेरच्या राज्यातून फळांची आवक कमी आहे. त्यामुळे विक्रेत्यांना जास्त भावात खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे फळांचे भाव वाढले आहेत.दुर्गाप्रसाद चौधरी, फळांचे व्यापारी.स्थानिक शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक थांबल्याने कळमन्यातून जास्त भावात भाज्यांची खरेदी करून किरकोळमध्ये विक्री करावी लागत आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत.संतोष लांबट, भाजीपाला विक्रेते.खरीपाच्या हंगामात शेतकरी गुंतल्याने भाज्यांची लागवड कमी केली. आता पेरणी आटोपली असून भाज्यांची लागवड सुरू झाली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये भाज्या बाजारात येतील.कवडू आंबटकर, शेतकरी.मुसळधार पावसाने कोथिंबीर खराबमान्सूनच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कोथिंबीर खराब झाले. त्यामुळे बाजारात आवक अल्प झाल्याने भाव वाढले. २५ ते ३० रुपये किलोचे कोथिंबीर ५० रुपयांवर पोहोचले. नवीन कोथिंबीर येण्यास दोन महिने लागतील. सध्या नाशिक व संगमनेर येथून आवक सुरू आहे.

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई