शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

नेपाळातील भूकंपाने मोडला नागपूर पोलिसांचा डाव

By admin | Updated: May 2, 2015 02:19 IST

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले खतरनाक गुन्हेगार नेपाळमध्ये आश्रय घेऊन आहेत.

जगदीश जोशी नागपूरनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले खतरनाक गुन्हेगार नेपाळमध्ये आश्रय घेऊन आहेत. या माहितीने नेपाळकडे निघालेल्या शहर गुन्हे शाखा पोलीस पथकाला विध्वंसक भूकंपामुळे आपली मोहीम सोडून सीमेवरूनच परत फिरावे लागले. शहर पोलिसांची वेगवेगळी पथके तब्बल एक महिन्यांपासून पाचही गुन्हेगारांना हुडकून काढण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. अनेक शहरे त्यांनी पालथी घातली आहेत. परंतु त्यांना अद्यापही यश आलेले नाही. ३१ मार्च २०१५ च्या पहाटे कारागृहातील बडी गोल बराक क्रमांक ६ मधून खतरनाक गँगस्टर राजा गौस याचे साथीदार सत्येंद्र गुप्ता, मोहम्मद शोऐब ऊर्फ शिबू खान, बिसेनसिंग उईके, याच बराकीतील त्यांचे साथीदार आकाश ऊर्फ गोलू ठाकुर आणि प्रेम ऊर्फ नेपाली खत्री, असे पाच जण पळून गेले. या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित आणि कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालक के. एल. बिष्णोई यांच्याकडे सोपविला.सीमेवरही मिळाली नाही खबरसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना भारत आणि नेपाळ सीमेवर पलायन केलेल्या या आरोपींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार होती. फरार आरोपींपैकी खत्री हा नेपाळचा रहिवासी आहे. अचानक भूकंप आला. त्याबरोबरच या पोलिसांना ज्या सूत्रांकडून ही माहिती मिळणार होती, ते धुसर झाले. मोक्का कारवाई अडलीजेल ब्रेक प्रकरणानंतर संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई होणार होती. परंतु ही कारवाई आता अडली आहे. याचसाठी पोलिसांनी गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मोक्का प्रकरणात दोषी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही आरोपी केले जाऊ शकते.