शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

नेपाळातील भूकंपाने मोडला नागपूर पोलिसांचा डाव

By admin | Updated: May 2, 2015 02:19 IST

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले खतरनाक गुन्हेगार नेपाळमध्ये आश्रय घेऊन आहेत.

जगदीश जोशी नागपूरनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले खतरनाक गुन्हेगार नेपाळमध्ये आश्रय घेऊन आहेत. या माहितीने नेपाळकडे निघालेल्या शहर गुन्हे शाखा पोलीस पथकाला विध्वंसक भूकंपामुळे आपली मोहीम सोडून सीमेवरूनच परत फिरावे लागले. शहर पोलिसांची वेगवेगळी पथके तब्बल एक महिन्यांपासून पाचही गुन्हेगारांना हुडकून काढण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. अनेक शहरे त्यांनी पालथी घातली आहेत. परंतु त्यांना अद्यापही यश आलेले नाही. ३१ मार्च २०१५ च्या पहाटे कारागृहातील बडी गोल बराक क्रमांक ६ मधून खतरनाक गँगस्टर राजा गौस याचे साथीदार सत्येंद्र गुप्ता, मोहम्मद शोऐब ऊर्फ शिबू खान, बिसेनसिंग उईके, याच बराकीतील त्यांचे साथीदार आकाश ऊर्फ गोलू ठाकुर आणि प्रेम ऊर्फ नेपाली खत्री, असे पाच जण पळून गेले. या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित आणि कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालक के. एल. बिष्णोई यांच्याकडे सोपविला.सीमेवरही मिळाली नाही खबरसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना भारत आणि नेपाळ सीमेवर पलायन केलेल्या या आरोपींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार होती. फरार आरोपींपैकी खत्री हा नेपाळचा रहिवासी आहे. अचानक भूकंप आला. त्याबरोबरच या पोलिसांना ज्या सूत्रांकडून ही माहिती मिळणार होती, ते धुसर झाले. मोक्का कारवाई अडलीजेल ब्रेक प्रकरणानंतर संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई होणार होती. परंतु ही कारवाई आता अडली आहे. याचसाठी पोलिसांनी गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मोक्का प्रकरणात दोषी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही आरोपी केले जाऊ शकते.