शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
4
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
5
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
6
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
7
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
8
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
9
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
10
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
11
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
12
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
13
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
14
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
15
पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट
16
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
17
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
18
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
19
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
20
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचपट मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहनघाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याचा विचार करता, एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीच्या जवळपास पाचपट अंत्यसंस्कार शहरातील घाटावर करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्यात नागपूर शहरात कोरोनामुळे १,२०३ लोकांचा मृत्यू झाल्याची मनपाकडे नोंद आहे. परंतु शहरातील १४ घाटांवर तब्बल ७,५०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर एप्रिल २०२० मध्ये शहरातील दहनघाटावर १,५२७ अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल महिन्यात ५,९७३ अधिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

दर महिन्याला नागपूर शहरातील घाटावर सरासरी १,५०० ते १,६०० अंत्यसंस्कार केले जातात. मात्र एप्रिल २०२१ मध्ये कोरोना संक्रमणाचा प्रकोप सुरू असताना तब्बल ७,५०० अंत्यसंस्कार करण्यात आले. दर महिन्याची अंत्यसंस्काराची सरासरी विचारात घेतली तर एप्रिल महिन्यात अंत्यसंस्काराचा उच्चांक होता. मात्र मनपाकडे कोविडमुळे १,२०३ मृत्यूची नोंद आहे. परंतु दर महिन्याला नैसर्गिक व आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांची १,५०० ते १,६०० आहे. ४,७७० मृत्यू कोविड की नॉन कोविड, असा प्रश्न कायम आहे.

१५ दिवसात चार हजाराहून अधिक अंत्यसंस्कार

कोरोना प्रकोपामुळे शहरात दररोज २५० हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. यात रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूसोबतच गृहविलगीकरणात असलेल्यांचाही समावेश होता. एप्रिलच्या १५ दिवसात चार हजाराहून अधिक अंत्यसंस्कार करण्यात आले. गृहविलगीकरणातील असलेल्यांची नोंद होत नसल्याने त्यांचा कोविड मृत्यूत समावेश होत नसल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच नागपुरातील रुग्णालयात परप्रांतीय व बाहेरील जिल्ह्यातील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याची नोंद होत नसल्याने मृतांचा आकडा अधिक असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

चार प्रमुख घाटावर ५,२३५ अंत्यसंस्कार

एप्रिल महिन्यात शहरातील १४ घाटावर ७,५०० अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील ५,२३५ अंत्यसंस्कार चार घाटावर करण्यात आले. यात सर्वाधिक १,६५९ अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले. मोक्षधाम घाटावर १,४१२, मानेवाडा घाटावर १,१०० तर अंबाझरी घाटावर १,०६४ अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्य १० घाटावर २,२६५ अंत्यसंस्कार करण्यात आले. यात दिघारी-वाठोडा, शांतिनगर, सहकारनगर, वैशालीनगर, मानकापूर, नारा, भरतवाडा, पुनापूर, पारडी आदी घाटांचा समावेश आहे.

....

....................

एप्रिल महिन्यात प्रमुख घाटावरील अंत्यविधी

घाट अंत्यविधी

सहकारनगर ३६५

मानेवाडा १,१००

मोक्षधाम १,४१२

अंबाझरी घाट १,०५४

दिघोरी-वाठोडा ७०३

गंगाबाई १,६५९

शांतिनगर २००